शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

लालफितीत अडकली ३२ गावांची पाणी योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अकोले : गेल्या पंधरा वर्षांपासून तालुक्यातील ३२ गावांच्या पाणीपुरवठा योजनेचे काम सरकारी लालफितीच्या कारभारात अडकले आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोले : गेल्या पंधरा वर्षांपासून तालुक्यातील ३२ गावांच्या पाणीपुरवठा योजनेचे काम सरकारी लालफितीच्या कारभारात अडकले आहे. चार वर्षे झाली तरी या योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली नाही. त्यामुळे योजनेचे काम ९५ टक्के पूर्ण होऊनही योजना कार्यान्वित झाली नाही.

ही योजना पूर्ण झाली आहे. केवळ दोन-तीन ठिकाणी किरकोळ पाईपलाईन जोडणे बाकी आहे. गेली चार वर्षे सुप्रमा प्रस्ताव दाखल आहेत. योजना चाचणीसाठी अडीच लाख रुपयांची वीज खर्च झाली. ती भरण्यासही जलसंपदा विभाग तयार आहे. दरम्यान, ठेकेदाराचे पैसे अडकल्याने योजना कार्यान्वित होण्यास दिरंगाई होत आहे. यामुळे ३२ गावांची तहान भागणार कधी? ३० कोटींच्या या योजनेला २००९ साली प्रशासकीय मान्यता मिळाली. अकरा वर्षांत ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. यात निळवंडे धरण हा उद्बोध धरुन थेट धरणात विहीर घेऊन संप, पंप, पाणी शुद्धीकरण यंत्रणा, सर्व गावांना जोडणारी नळयोजना जवळपास पूर्ण झाली आहे. काही ठिकाणी किरकोळ नळ सांधे जोडणीचे काम बाकी आहे. काही भागात पाणी योजनेची चाचणीही घेण्यात आली आहे. या चाचणीसाठी अडीच-तीन लाख रुपयांची वीज खर्च झाली आहे. या योजनेचे काम करणाऱ्या ठेकेदाराला ३० कोटी रुपये अदा झाले आहेत. अधिकच्या कामाचे ४ कोटी ३५ लाख रुपये ठेकदाराला सरकारकडून येणे बाकी आहेत. या योजनेचे काम सध्या बंद असून, योजनेची किंमत वाढल्याने ४४ कोटी ५० लाख रुपयांच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव शासन दरबारी पडून आहे.

....

३२ गावांच्या पिण्याच्या पाणी योजनेबाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी निळवंडे भेटीत चर्चा झाली. सुप्रमा संदर्भात मंत्री पातळीवर लवकर बैठक होईल. येत्या काही दिवसात योजना कार्यान्वित होईल.

- आमदार डाॅ. किरण लहामटे, अकोले.

...

फोटो-२१अकोले पाणी योजना

..

ओळी-अकोले तालुक्यातील ३२ गावांच्या पाणीपुरवठा योजनेचे काम गेल्या १५ वर्षांपासून सरकारी लालफितीच्या कारभारात अडकले आहे.