शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

लालफितीत अडकली ३२ गावांची पाणी योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अकोले : गेल्या पंधरा वर्षांपासून तालुक्यातील ३२ गावांच्या पाणीपुरवठा योजनेचे काम सरकारी लालफितीच्या कारभारात अडकले आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोले : गेल्या पंधरा वर्षांपासून तालुक्यातील ३२ गावांच्या पाणीपुरवठा योजनेचे काम सरकारी लालफितीच्या कारभारात अडकले आहे. चार वर्षे झाली तरी या योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली नाही. त्यामुळे योजनेचे काम ९५ टक्के पूर्ण होऊनही योजना कार्यान्वित झाली नाही.

ही योजना पूर्ण झाली आहे. केवळ दोन-तीन ठिकाणी किरकोळ पाईपलाईन जोडणे बाकी आहे. गेली चार वर्षे सुप्रमा प्रस्ताव दाखल आहेत. योजना चाचणीसाठी अडीच लाख रुपयांची वीज खर्च झाली. ती भरण्यासही जलसंपदा विभाग तयार आहे. दरम्यान, ठेकेदाराचे पैसे अडकल्याने योजना कार्यान्वित होण्यास दिरंगाई होत आहे. यामुळे ३२ गावांची तहान भागणार कधी? ३० कोटींच्या या योजनेला २००९ साली प्रशासकीय मान्यता मिळाली. अकरा वर्षांत ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. यात निळवंडे धरण हा उद्बोध धरुन थेट धरणात विहीर घेऊन संप, पंप, पाणी शुद्धीकरण यंत्रणा, सर्व गावांना जोडणारी नळयोजना जवळपास पूर्ण झाली आहे. काही ठिकाणी किरकोळ नळ सांधे जोडणीचे काम बाकी आहे. काही भागात पाणी योजनेची चाचणीही घेण्यात आली आहे. या चाचणीसाठी अडीच-तीन लाख रुपयांची वीज खर्च झाली आहे. या योजनेचे काम करणाऱ्या ठेकेदाराला ३० कोटी रुपये अदा झाले आहेत. अधिकच्या कामाचे ४ कोटी ३५ लाख रुपये ठेकदाराला सरकारकडून येणे बाकी आहेत. या योजनेचे काम सध्या बंद असून, योजनेची किंमत वाढल्याने ४४ कोटी ५० लाख रुपयांच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव शासन दरबारी पडून आहे.

....

३२ गावांच्या पिण्याच्या पाणी योजनेबाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी निळवंडे भेटीत चर्चा झाली. सुप्रमा संदर्भात मंत्री पातळीवर लवकर बैठक होईल. येत्या काही दिवसात योजना कार्यान्वित होईल.

- आमदार डाॅ. किरण लहामटे, अकोले.

...

फोटो-२१अकोले पाणी योजना

..

ओळी-अकोले तालुक्यातील ३२ गावांच्या पाणीपुरवठा योजनेचे काम गेल्या १५ वर्षांपासून सरकारी लालफितीच्या कारभारात अडकले आहे.