शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कोपरगाव तालुक्यात पाणी टंचाईचा झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 12:21 IST

तालुक्यातील रांजणगाव देशमुखसह परिसरातील धोंडेवाडी, मानेगांव, वेस, सोयगांव व बहादपूर या गावांना सध्या पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असून गावातील उद्भव आटल्याने पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. किमान आठवड्यातून ५०० रुपये खर्च करण्याची वेळ ग्रामस्थांवर आले आहे. टँकरचे प्रस्ताव देवूनही टँकर सुरू होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

ठळक मुद्देरांजणगाव देशमुखसह पाच गावात पाणी टंचाई

रोहित टेकेकोपरगाव : तालुक्यातील रांजणगाव देशमुखसह परिसरातील धोंडेवाडी, मानेगांव, वेस, सोयगांव व बहादपूर या गावांना सध्या पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असून गावातील उद्भव आटल्याने पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. किमान आठवड्यातून ५०० रुपये खर्च करण्याची वेळ ग्रामस्थांवर आले आहे. टँकरचे प्रस्ताव देवूनही टँकर सुरू होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

या सर्व गावात उन्हाळ्यात मोठ्या दुष्काळाला सामोरे जावे लागते. प्रत्येक कुटुंबाला दैनंदिन वापरासाठी व पशुधनासाठी पाण्याची गरज भासत आहे. पाणी मिळविण्यासाठी कुटुंबातील महिलांना व पुरुषांनाही भटकंती करावी लागत आहे. तसेच वेळ पडल्यास पाण्यासाठी पैसेही मोजावे लागत आहे. रांजणगाव देशमुखसह परिसरातील पाच गावांना पिण्याचे पाणी पुरवठा करण्यासाठी पोहेगाव येथून गेलेल्या पाटाचे पाणी पाईपलाईनद्वारे धोंडेवाडी येथील तलावात आणण्याची योजना आहे. मात्र वीजपंपाला लागणाऱ्या विजेचे सुमारे ३० लाख रुपये बिल थकल्याने वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती थांबणार तरी कधी? असा सवाल ग्रामस्थ विचारीत आहेत. यासंदर्भात कोपरगाव तहसीलदार यांच्याशी प्रस्तुत प्रतिनिधीने भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही.

एक-दीड महिन्यापासून परिसरात टँकर सुरू करावे, या मागणीचा प्रस्ताव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे दिला आहे, परंतु यावर अद्यापपर्यंत कोणतीच कार्यवाही झालेली नाही. सध्या ग्रामस्थ भिषण पाणी टंचाईचा सामना करीत आहे. मागणी करून महिना उलटून गेला तरी कोणतीच कार्यवाही न झाल्याणे शासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे असा आमचा आरोप आहे. - संदीप रणधीर, सरपंच, रांजणगावसदर गावचा टँकर मागणीचा प्रस्ताव गेल्या आठ दिवसापूर्वी मला मिळाला आहे. त्याची आमच्यास्तरावरील सर्व पूर्तता करीत तहसीलदार यांच्याकडे पाठवला आहे. त्यामुळे हा विषय त्यांच्या स्तरावर आहे. - कपीलनाथ कलोडे, गटविकास अधिकारी,पंचायत समिती, कोपरगाव .

सध्या ग्रामस्थांना पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत आहे. अनेक वेळा पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. किमान आठवड्याला ५०० रूपयांचे पाणी विकत घ्यावे लागते. त्यामुळे सामान्य नागरिकांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. प्रशासनाने तत्काळ टँकर सुरु करावा. - गोरक्षनाथ वर्पे, नागरिक रांजणगाव देशमुख, ता.कोपरगाव. देशमुख, ता.कोपरगाव.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगाव