शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

कोपरगाव तालुक्यात पाणी टंचाईचा झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 12:21 IST

तालुक्यातील रांजणगाव देशमुखसह परिसरातील धोंडेवाडी, मानेगांव, वेस, सोयगांव व बहादपूर या गावांना सध्या पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असून गावातील उद्भव आटल्याने पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. किमान आठवड्यातून ५०० रुपये खर्च करण्याची वेळ ग्रामस्थांवर आले आहे. टँकरचे प्रस्ताव देवूनही टँकर सुरू होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

ठळक मुद्देरांजणगाव देशमुखसह पाच गावात पाणी टंचाई

रोहित टेकेकोपरगाव : तालुक्यातील रांजणगाव देशमुखसह परिसरातील धोंडेवाडी, मानेगांव, वेस, सोयगांव व बहादपूर या गावांना सध्या पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असून गावातील उद्भव आटल्याने पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. किमान आठवड्यातून ५०० रुपये खर्च करण्याची वेळ ग्रामस्थांवर आले आहे. टँकरचे प्रस्ताव देवूनही टँकर सुरू होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

या सर्व गावात उन्हाळ्यात मोठ्या दुष्काळाला सामोरे जावे लागते. प्रत्येक कुटुंबाला दैनंदिन वापरासाठी व पशुधनासाठी पाण्याची गरज भासत आहे. पाणी मिळविण्यासाठी कुटुंबातील महिलांना व पुरुषांनाही भटकंती करावी लागत आहे. तसेच वेळ पडल्यास पाण्यासाठी पैसेही मोजावे लागत आहे. रांजणगाव देशमुखसह परिसरातील पाच गावांना पिण्याचे पाणी पुरवठा करण्यासाठी पोहेगाव येथून गेलेल्या पाटाचे पाणी पाईपलाईनद्वारे धोंडेवाडी येथील तलावात आणण्याची योजना आहे. मात्र वीजपंपाला लागणाऱ्या विजेचे सुमारे ३० लाख रुपये बिल थकल्याने वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती थांबणार तरी कधी? असा सवाल ग्रामस्थ विचारीत आहेत. यासंदर्भात कोपरगाव तहसीलदार यांच्याशी प्रस्तुत प्रतिनिधीने भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही.

एक-दीड महिन्यापासून परिसरात टँकर सुरू करावे, या मागणीचा प्रस्ताव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे दिला आहे, परंतु यावर अद्यापपर्यंत कोणतीच कार्यवाही झालेली नाही. सध्या ग्रामस्थ भिषण पाणी टंचाईचा सामना करीत आहे. मागणी करून महिना उलटून गेला तरी कोणतीच कार्यवाही न झाल्याणे शासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे असा आमचा आरोप आहे. - संदीप रणधीर, सरपंच, रांजणगावसदर गावचा टँकर मागणीचा प्रस्ताव गेल्या आठ दिवसापूर्वी मला मिळाला आहे. त्याची आमच्यास्तरावरील सर्व पूर्तता करीत तहसीलदार यांच्याकडे पाठवला आहे. त्यामुळे हा विषय त्यांच्या स्तरावर आहे. - कपीलनाथ कलोडे, गटविकास अधिकारी,पंचायत समिती, कोपरगाव .

सध्या ग्रामस्थांना पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत आहे. अनेक वेळा पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. किमान आठवड्याला ५०० रूपयांचे पाणी विकत घ्यावे लागते. त्यामुळे सामान्य नागरिकांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. प्रशासनाने तत्काळ टँकर सुरु करावा. - गोरक्षनाथ वर्पे, नागरिक रांजणगाव देशमुख, ता.कोपरगाव. देशमुख, ता.कोपरगाव.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगाव