शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

मांडव्यात विकतही मिळेना पाणी

By admin | Updated: July 11, 2024 18:01 IST

अहमदनगर : जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला असला तरी नगर तालुका त्यास अपवाद आहे.

अहमदनगर : जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला असला तरी नगर तालुका त्यास अपवाद आहे. तालुक्यातील अनेक गावांत तीव्र पाणीटंचाई भेडसावत असून सरासरी पावसाच्या सरकारी आकडेवारीच्या आधारे शासनाने सुरू असलेले टँकर बंद करून लोकांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. मांडवा (ता. नगर) येथे पावसाअभावी विहिरी, तलाव कोरडे असल्याने ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. जिल्ह्यात चांगला पाऊस झाला असला तरी नगर तालुक्यातील काही गावे पावसाळा संपत आला, पण कोरडीच आहेत. असे असले तरी शासनाने सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याचा साक्षात्कार झाल्यागत टंचाईग्रस्त गावांचे टँकर बंद करून टाकले. चिचोंडी पाटील गटातील मांडवा परिसरात पावसाने पाठ दाखवल्याने तेथील विहिरी, तलाव कोरडेठाक आहेत. प्रशासनाने पिण्याच्या पाण्याचे जलस्त्रोत उपलब्ध आहेत की नाही याची कोणतीही शहानिशा न करता सरसकट टँकर बंद केल्याने गावाला सध्या तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे. परिसरातही कुठे मुबलक पाणीसाठा नसल्याने विकतही पाणी उपलब्ध होत नाही. परिणामी ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुन्हा टँकर सुरू करण्याची जोरदार मागणी होत आहे. ग्रामपंचायतने टँकर सुरू करण्याबाबत प्रस्ताव पाठवला आहे. मात्र निवडणुकांच्या कामकाजात कर्मचारी व्यस्त असल्याने तो केव्हा मंजूर होतो, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.(प्रतिनिधी)