शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
9
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
10
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
11
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
12
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
13
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

मांडव्यात विकतही मिळेना पाणी

By admin | Updated: July 11, 2024 18:01 IST

अहमदनगर : जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला असला तरी नगर तालुका त्यास अपवाद आहे.

अहमदनगर : जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला असला तरी नगर तालुका त्यास अपवाद आहे. तालुक्यातील अनेक गावांत तीव्र पाणीटंचाई भेडसावत असून सरासरी पावसाच्या सरकारी आकडेवारीच्या आधारे शासनाने सुरू असलेले टँकर बंद करून लोकांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. मांडवा (ता. नगर) येथे पावसाअभावी विहिरी, तलाव कोरडे असल्याने ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. जिल्ह्यात चांगला पाऊस झाला असला तरी नगर तालुक्यातील काही गावे पावसाळा संपत आला, पण कोरडीच आहेत. असे असले तरी शासनाने सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याचा साक्षात्कार झाल्यागत टंचाईग्रस्त गावांचे टँकर बंद करून टाकले. चिचोंडी पाटील गटातील मांडवा परिसरात पावसाने पाठ दाखवल्याने तेथील विहिरी, तलाव कोरडेठाक आहेत. प्रशासनाने पिण्याच्या पाण्याचे जलस्त्रोत उपलब्ध आहेत की नाही याची कोणतीही शहानिशा न करता सरसकट टँकर बंद केल्याने गावाला सध्या तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे. परिसरातही कुठे मुबलक पाणीसाठा नसल्याने विकतही पाणी उपलब्ध होत नाही. परिणामी ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुन्हा टँकर सुरू करण्याची जोरदार मागणी होत आहे. ग्रामपंचायतने टँकर सुरू करण्याबाबत प्रस्ताव पाठवला आहे. मात्र निवडणुकांच्या कामकाजात कर्मचारी व्यस्त असल्याने तो केव्हा मंजूर होतो, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.(प्रतिनिधी)