शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

मांडव्यात विकतही मिळेना पाणी

By admin | Updated: July 11, 2024 18:01 IST

अहमदनगर : जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला असला तरी नगर तालुका त्यास अपवाद आहे.

अहमदनगर : जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला असला तरी नगर तालुका त्यास अपवाद आहे. तालुक्यातील अनेक गावांत तीव्र पाणीटंचाई भेडसावत असून सरासरी पावसाच्या सरकारी आकडेवारीच्या आधारे शासनाने सुरू असलेले टँकर बंद करून लोकांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. मांडवा (ता. नगर) येथे पावसाअभावी विहिरी, तलाव कोरडे असल्याने ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. जिल्ह्यात चांगला पाऊस झाला असला तरी नगर तालुक्यातील काही गावे पावसाळा संपत आला, पण कोरडीच आहेत. असे असले तरी शासनाने सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याचा साक्षात्कार झाल्यागत टंचाईग्रस्त गावांचे टँकर बंद करून टाकले. चिचोंडी पाटील गटातील मांडवा परिसरात पावसाने पाठ दाखवल्याने तेथील विहिरी, तलाव कोरडेठाक आहेत. प्रशासनाने पिण्याच्या पाण्याचे जलस्त्रोत उपलब्ध आहेत की नाही याची कोणतीही शहानिशा न करता सरसकट टँकर बंद केल्याने गावाला सध्या तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे. परिसरातही कुठे मुबलक पाणीसाठा नसल्याने विकतही पाणी उपलब्ध होत नाही. परिणामी ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुन्हा टँकर सुरू करण्याची जोरदार मागणी होत आहे. ग्रामपंचायतने टँकर सुरू करण्याबाबत प्रस्ताव पाठवला आहे. मात्र निवडणुकांच्या कामकाजात कर्मचारी व्यस्त असल्याने तो केव्हा मंजूर होतो, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.(प्रतिनिधी)