शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
3
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
4
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
5
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
6
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
7
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
8
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
9
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
10
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
11
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
12
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
13
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
14
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
15
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
16
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
17
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
18
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
19
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
20
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
Daily Top 2Weekly Top 5

मांडवगणमधील पाणीपातळी ३०० वरून ३० फुटावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 11:26 IST

मांडवगण. श्रीगोंदा तालुक्यातील सुमारे १० हजार लोकवस्तीचं गाव. येथील वैशिष्ट्य म्हणजे जवळपास प्रत्येकाच्या दारात स्वत:चा आड. गेल्या दोन-तीन वर्षांपर्यंत या आडातून मोठ्या मुश्किलीने घरगुती वापरासाठी दहा-बारा हंडे पाणी निघायचे. परंतु अलिकडेच गावात झालेल्या जलसंधारणाच्या कामामुळे हे आड पूर्ण क्षमेतेने भरले आहेत.

ठळक मुद्दे जलयुक्तची यशोगाथा जनकल्याण, लोकसहभागातून पाण्याची मिळकत

चंद्रकांत शेळकेअहमदनगर : मांडवगण. श्रीगोंदा तालुक्यातील सुमारे १० हजार लोकवस्तीचं गाव. येथील वैशिष्ट्य म्हणजे जवळपास प्रत्येकाच्या दारात स्वत:चा आड. गेल्या दोन-तीन वर्षांपर्यंत या आडातून मोठ्या मुश्किलीने घरगुती वापरासाठी दहा-बारा हंडे पाणी निघायचे. परंतु अलिकडेच गावात झालेल्या जलसंधारणाच्या कामामुळे हे आड पूर्ण क्षमेतेने भरले आहेत. शेतातही ३०० फुटांवरील पाणीपातळी चक्क ३०-४० फुटांवर आली आहे. विहिरी, कुपनलिका आजही भरलेल्या आहेत. शासनाचे जलयुक्त शिवार, जनकल्याण संस्था व लोकसहभाग या त्रिसूत्रीच्या मेहनतीने आज गाव पाणीदार झाले आहे.श्रीगोंद्यापासून उत्तरेला सुमारे ३० किलोमीटरवर मांडवगणचा सहा ते सात हजार हेक्टरचा भौगोलिक पसारा आहे. त्यात चार हजार हेक्टर लागवडीयोग्य क्षेत्र आहे. श्रीगोंदा तालुका सधन मानला जात असला तरी मांडवगणला कोणत्याही जलसिंचनाची सोय नाही. गाव केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने पावसाळी पिके केवळ हाती लागायची. उन्हाळ्यात नेहमीप्रमाणेच टँकर ठरलेला. गाव टंचाईग्रस्त असल्याने शासनाने २०१४-१५मध्ये जलयुक्त शिवारमध्ये गावचा समावेश केला. लोकांनाही पाण्याचे महत्व समजल्याने जलसंधारणाच्या कामात श्रमदान वाढले. जनकल्याण खासगी संस्थेने गावाला मदत केली. या सर्वांनी मिळून गावचे दुष्काळी चित्र केवळ बदललेच नाही, तर गावाला पुन्हा दुष्काळ शिवणार नाही, याची तजवीज केली. गावातून जाणाऱ्या नदीवर सुमारे २२ फूट खोलवर बंधारे गावकºयांनी उकरले. जि. प. लघूसिंचनाद्वारे सिमेंट नालाबांधमधील गाळ गाढल्याने पाणीसाठवण क्षमता वाढली. या सर्व कामांमुळे सुमारे ८०० टीसीएम नवीन पाणी उपलब्ध झाले. सध्या गावात लिंबू, डाळिंबाच्या बागा, ऊस, तसेच इतर नगदी पिकांसाठी पाणी उपलब्ध आहे.‘‘जलसंधारणाच्या कामांमुळे गावाला नवीन दिशा मिळाली. गेल्या अनेक वर्षांपासूनची पाण्याची समस्या चुटकीसरशी सुटली. केवळ पावसावर अवलंबून असणारी बाजरी, मूग, हुलगा, मटकी ही पिके जाऊन आता रब्बीतील ज्वारी, मका, कांदा, ऊस ही पिके, तसेच फळबागा लोकांना पहायला मिळत आहेत.’’- प्रताप चव्हाण, ग्रामस्थ, मांडवगण‘‘जलयुक्त शिवार, जनकल्याण व लोकसहभागातून एकेकाळी असणारा दुष्काळी गाव हा शिक्का गावाने पुसला आहे. गावात पूर्वी ३०० फूट कुलनलिका घेतली तरी कोरडी जायची, आज तिथेच केवळ ३०-४० फुटांपर्यंत पाणी आहे. एकूणच सिंचन क्षेत्र वाढले आहे. अजूनही गावातील दोन नद्यांवर बंधाºयांची संख्या वाढवता येऊ शकते. ’’- सुरेश लांडगे, उपसरपंच, मांडवगण‘‘गावात १२ वाड्यांचा समावेश असून काही बाजूंनी डोंगर आहे. आतापर्यंत पावसाचे पाणी वाहून जायचे. फेब्रुवारी, मार्चमध्ये टँकरने पाणीपुरवठा ठरलेला होता. मात्र यंदा टँकरची गरजच लागणार नाही. सर्वांचे आड, विहिरी, कुपनलिका, बंधाºयांत समाधानकारक पाणीसाठा आहे.’’- विनोद देशमुख, ग्रामस्थ, मांडवगणजलयुक्तमधून झालेली कामेकंपार्टमेंट बंडिंग (बांधबंदिस्ती) १६६० हेक्टरवर.सिमेंट नालाबांध - १०शेततळे - २गॅबीयन बंधारे - ५वनराई बंधारे -६खोल सलग समतल चर - ८०लोकसहभाग गाळ काढणे -२पाझर तलाव दुरूस्ती - १विहीर पुनर्भरण - ३

टॅग्स :AhmednagarअहमदनगरWaterपाणी