शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

मांडवगणमधील पाणीपातळी ३०० वरून ३० फुटावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 11:26 IST

मांडवगण. श्रीगोंदा तालुक्यातील सुमारे १० हजार लोकवस्तीचं गाव. येथील वैशिष्ट्य म्हणजे जवळपास प्रत्येकाच्या दारात स्वत:चा आड. गेल्या दोन-तीन वर्षांपर्यंत या आडातून मोठ्या मुश्किलीने घरगुती वापरासाठी दहा-बारा हंडे पाणी निघायचे. परंतु अलिकडेच गावात झालेल्या जलसंधारणाच्या कामामुळे हे आड पूर्ण क्षमेतेने भरले आहेत.

ठळक मुद्दे जलयुक्तची यशोगाथा जनकल्याण, लोकसहभागातून पाण्याची मिळकत

चंद्रकांत शेळकेअहमदनगर : मांडवगण. श्रीगोंदा तालुक्यातील सुमारे १० हजार लोकवस्तीचं गाव. येथील वैशिष्ट्य म्हणजे जवळपास प्रत्येकाच्या दारात स्वत:चा आड. गेल्या दोन-तीन वर्षांपर्यंत या आडातून मोठ्या मुश्किलीने घरगुती वापरासाठी दहा-बारा हंडे पाणी निघायचे. परंतु अलिकडेच गावात झालेल्या जलसंधारणाच्या कामामुळे हे आड पूर्ण क्षमेतेने भरले आहेत. शेतातही ३०० फुटांवरील पाणीपातळी चक्क ३०-४० फुटांवर आली आहे. विहिरी, कुपनलिका आजही भरलेल्या आहेत. शासनाचे जलयुक्त शिवार, जनकल्याण संस्था व लोकसहभाग या त्रिसूत्रीच्या मेहनतीने आज गाव पाणीदार झाले आहे.श्रीगोंद्यापासून उत्तरेला सुमारे ३० किलोमीटरवर मांडवगणचा सहा ते सात हजार हेक्टरचा भौगोलिक पसारा आहे. त्यात चार हजार हेक्टर लागवडीयोग्य क्षेत्र आहे. श्रीगोंदा तालुका सधन मानला जात असला तरी मांडवगणला कोणत्याही जलसिंचनाची सोय नाही. गाव केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने पावसाळी पिके केवळ हाती लागायची. उन्हाळ्यात नेहमीप्रमाणेच टँकर ठरलेला. गाव टंचाईग्रस्त असल्याने शासनाने २०१४-१५मध्ये जलयुक्त शिवारमध्ये गावचा समावेश केला. लोकांनाही पाण्याचे महत्व समजल्याने जलसंधारणाच्या कामात श्रमदान वाढले. जनकल्याण खासगी संस्थेने गावाला मदत केली. या सर्वांनी मिळून गावचे दुष्काळी चित्र केवळ बदललेच नाही, तर गावाला पुन्हा दुष्काळ शिवणार नाही, याची तजवीज केली. गावातून जाणाऱ्या नदीवर सुमारे २२ फूट खोलवर बंधारे गावकºयांनी उकरले. जि. प. लघूसिंचनाद्वारे सिमेंट नालाबांधमधील गाळ गाढल्याने पाणीसाठवण क्षमता वाढली. या सर्व कामांमुळे सुमारे ८०० टीसीएम नवीन पाणी उपलब्ध झाले. सध्या गावात लिंबू, डाळिंबाच्या बागा, ऊस, तसेच इतर नगदी पिकांसाठी पाणी उपलब्ध आहे.‘‘जलसंधारणाच्या कामांमुळे गावाला नवीन दिशा मिळाली. गेल्या अनेक वर्षांपासूनची पाण्याची समस्या चुटकीसरशी सुटली. केवळ पावसावर अवलंबून असणारी बाजरी, मूग, हुलगा, मटकी ही पिके जाऊन आता रब्बीतील ज्वारी, मका, कांदा, ऊस ही पिके, तसेच फळबागा लोकांना पहायला मिळत आहेत.’’- प्रताप चव्हाण, ग्रामस्थ, मांडवगण‘‘जलयुक्त शिवार, जनकल्याण व लोकसहभागातून एकेकाळी असणारा दुष्काळी गाव हा शिक्का गावाने पुसला आहे. गावात पूर्वी ३०० फूट कुलनलिका घेतली तरी कोरडी जायची, आज तिथेच केवळ ३०-४० फुटांपर्यंत पाणी आहे. एकूणच सिंचन क्षेत्र वाढले आहे. अजूनही गावातील दोन नद्यांवर बंधाºयांची संख्या वाढवता येऊ शकते. ’’- सुरेश लांडगे, उपसरपंच, मांडवगण‘‘गावात १२ वाड्यांचा समावेश असून काही बाजूंनी डोंगर आहे. आतापर्यंत पावसाचे पाणी वाहून जायचे. फेब्रुवारी, मार्चमध्ये टँकरने पाणीपुरवठा ठरलेला होता. मात्र यंदा टँकरची गरजच लागणार नाही. सर्वांचे आड, विहिरी, कुपनलिका, बंधाºयांत समाधानकारक पाणीसाठा आहे.’’- विनोद देशमुख, ग्रामस्थ, मांडवगणजलयुक्तमधून झालेली कामेकंपार्टमेंट बंडिंग (बांधबंदिस्ती) १६६० हेक्टरवर.सिमेंट नालाबांध - १०शेततळे - २गॅबीयन बंधारे - ५वनराई बंधारे -६खोल सलग समतल चर - ८०लोकसहभाग गाळ काढणे -२पाझर तलाव दुरूस्ती - १विहीर पुनर्भरण - ३

टॅग्स :AhmednagarअहमदनगरWaterपाणी