शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

२३ पथकांद्वारे निवडणूक प्रक्रियेवर ‘वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 17:05 IST

जिल्हा प्रशासनाने मनपा निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण केली असून, निवडणूक शांततेत व पारदर्शक वातावरणात होण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन खबरदारी घेत आहे. पुढील तीन दिवस एकूण २३ पथकांद्वारे आचारसंहितेची कडक अंमलबजावणी केली जाईल

अहमदनगर : जिल्हा प्रशासनाने मनपा निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण केली असून, निवडणूक शांततेत व पारदर्शक वातावरणात होण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन खबरदारी घेत आहे. पुढील तीन दिवस एकूण २३ पथकांद्वारे आचारसंहितेची कडक अंमलबजावणी केली जाईल. त्यासाठी रात्रं-दिवस शहरात पथकांचा वॉच असणार आहे. मतदारांनीसुद्धा गैरप्रकारांना थारा न देता १०० टक्के मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले.शुक्रवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक तयारीचा आढावा सादर केला. येत्या रविवारी (दि. ९) रोजी मतदान होत असून यासाठी ३३७ मतदान केंद्र आहेत. १ नोव्हेंबरपासून आदर्श आचारसंहिता लागू केली असून आचारसंहिता कक्षाद्वारे नेमलेली पथके योग्य ती कार्यवाही करत आहेत. आतापर्यंत ६ भरारी पथके तैनात होती. परंतु शुक्रवारपासून मतमोजणीपर्यंत अजून १७ पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. याशिवाय ६ चेक पोस्ट पथक, ६ व्हिडिओ सर्व्हेलियन्स पथक, १ छायाचित्रण तपासणी पथक कार्यरत आहेत. याशिवाय २ हजार निवडणूक कर्मचारी व २ हजार पोलीस कर्मचारी नियुक्त असून, कोणत्याही स्थितीत कायदा व सुव्यवस्था भंग होणार नाही याची काळजी घेतली जात आहे.निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक संनियंत्रण समिती, रेडिओ, टीव्ही, जाहिरात साहित्य तपासणी समिती, पेड न्यूज समिती, तसेच तहसीलदार यांची समिती कार्यरत आहे. मतदारांना प्रलोभन दाखवण्याचे प्रकार रोखण्यासाठी भरारी पथक असून आतापर्यंत आचारसंहिता कक्षाकडे १२ तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यातील सर्वांवर कार्यवाही झाली असून २ तक्रारींवर थेट गुन्हे दाखल झाले आहेत.शनिवारी, तसेच मतदानाच्या दिवशी ही पथके आणखी गतिमान होतील. उमेदवारांकडून पैसे वाटण्याचे, तसेच दहशतीचे प्रकार होत असतील तर त्वरित आचारसंहिता कक्षाकडे तक्रार करावी, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले. शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता जाहीर प्रचार संपलेला असून सार्वजनिक ठिकाणी राजकीय पक्षांनी, उमेदवारांनी लावलेले बॅनर काढावेत, अन्यथा त्यांच्यावर गुन्हेदाखल होतील, असेही द्विवेदी म्हणाले.आज कर्मचारी होणार बूथवर रवानानिवडणुकीसाठी नियुक्त असणा-या २ हजार कर्मचा-यांना शनिवारी दुपारपर्यंत मतदान साहित्याचे वाटप होऊन हे कर्मचारी सायंकाळपर्यत संबंधित मतदान केंद्रावर पोहोचतील, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरूण आनंदकर यांनी दिली.मतमोजणी भवानीनगर (आनंदधामजवळ) येथील वखार महामंडळाच्या गोदामात सोमवारी (दि.१०) सकाळी दहा वाजेपासून सुरू होईल. सर्व १७ प्रभागांची मोजणी एकाच वेळी सुरू होणार आहे. एका प्रभागासाठी स्वतंत्र तीन टेबल असतील. जेथे मतदानकेंद्र कमी असतील, तेथील निकाल आधी लागेल. साधारण बारा वाजेपर्यंत पहिला निकाल हाती येऊ शकतो. त्यानंतर पुढील निकाल गतीने लागतील. तांत्रिक अचडणी आल्या नाहीत, तर दुपारी एक वाजेपर्यंत मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता जिल्हाधिकाºयांनी वर्तवली.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर