शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

२३ पथकांद्वारे निवडणूक प्रक्रियेवर ‘वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 17:05 IST

जिल्हा प्रशासनाने मनपा निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण केली असून, निवडणूक शांततेत व पारदर्शक वातावरणात होण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन खबरदारी घेत आहे. पुढील तीन दिवस एकूण २३ पथकांद्वारे आचारसंहितेची कडक अंमलबजावणी केली जाईल

अहमदनगर : जिल्हा प्रशासनाने मनपा निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण केली असून, निवडणूक शांततेत व पारदर्शक वातावरणात होण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन खबरदारी घेत आहे. पुढील तीन दिवस एकूण २३ पथकांद्वारे आचारसंहितेची कडक अंमलबजावणी केली जाईल. त्यासाठी रात्रं-दिवस शहरात पथकांचा वॉच असणार आहे. मतदारांनीसुद्धा गैरप्रकारांना थारा न देता १०० टक्के मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले.शुक्रवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक तयारीचा आढावा सादर केला. येत्या रविवारी (दि. ९) रोजी मतदान होत असून यासाठी ३३७ मतदान केंद्र आहेत. १ नोव्हेंबरपासून आदर्श आचारसंहिता लागू केली असून आचारसंहिता कक्षाद्वारे नेमलेली पथके योग्य ती कार्यवाही करत आहेत. आतापर्यंत ६ भरारी पथके तैनात होती. परंतु शुक्रवारपासून मतमोजणीपर्यंत अजून १७ पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. याशिवाय ६ चेक पोस्ट पथक, ६ व्हिडिओ सर्व्हेलियन्स पथक, १ छायाचित्रण तपासणी पथक कार्यरत आहेत. याशिवाय २ हजार निवडणूक कर्मचारी व २ हजार पोलीस कर्मचारी नियुक्त असून, कोणत्याही स्थितीत कायदा व सुव्यवस्था भंग होणार नाही याची काळजी घेतली जात आहे.निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक संनियंत्रण समिती, रेडिओ, टीव्ही, जाहिरात साहित्य तपासणी समिती, पेड न्यूज समिती, तसेच तहसीलदार यांची समिती कार्यरत आहे. मतदारांना प्रलोभन दाखवण्याचे प्रकार रोखण्यासाठी भरारी पथक असून आतापर्यंत आचारसंहिता कक्षाकडे १२ तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यातील सर्वांवर कार्यवाही झाली असून २ तक्रारींवर थेट गुन्हे दाखल झाले आहेत.शनिवारी, तसेच मतदानाच्या दिवशी ही पथके आणखी गतिमान होतील. उमेदवारांकडून पैसे वाटण्याचे, तसेच दहशतीचे प्रकार होत असतील तर त्वरित आचारसंहिता कक्षाकडे तक्रार करावी, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले. शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता जाहीर प्रचार संपलेला असून सार्वजनिक ठिकाणी राजकीय पक्षांनी, उमेदवारांनी लावलेले बॅनर काढावेत, अन्यथा त्यांच्यावर गुन्हेदाखल होतील, असेही द्विवेदी म्हणाले.आज कर्मचारी होणार बूथवर रवानानिवडणुकीसाठी नियुक्त असणा-या २ हजार कर्मचा-यांना शनिवारी दुपारपर्यंत मतदान साहित्याचे वाटप होऊन हे कर्मचारी सायंकाळपर्यत संबंधित मतदान केंद्रावर पोहोचतील, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरूण आनंदकर यांनी दिली.मतमोजणी भवानीनगर (आनंदधामजवळ) येथील वखार महामंडळाच्या गोदामात सोमवारी (दि.१०) सकाळी दहा वाजेपासून सुरू होईल. सर्व १७ प्रभागांची मोजणी एकाच वेळी सुरू होणार आहे. एका प्रभागासाठी स्वतंत्र तीन टेबल असतील. जेथे मतदानकेंद्र कमी असतील, तेथील निकाल आधी लागेल. साधारण बारा वाजेपर्यंत पहिला निकाल हाती येऊ शकतो. त्यानंतर पुढील निकाल गतीने लागतील. तांत्रिक अचडणी आल्या नाहीत, तर दुपारी एक वाजेपर्यंत मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता जिल्हाधिकाºयांनी वर्तवली.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर