शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

२३ पथकांद्वारे निवडणूक प्रक्रियेवर ‘वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 17:05 IST

जिल्हा प्रशासनाने मनपा निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण केली असून, निवडणूक शांततेत व पारदर्शक वातावरणात होण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन खबरदारी घेत आहे. पुढील तीन दिवस एकूण २३ पथकांद्वारे आचारसंहितेची कडक अंमलबजावणी केली जाईल

अहमदनगर : जिल्हा प्रशासनाने मनपा निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण केली असून, निवडणूक शांततेत व पारदर्शक वातावरणात होण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन खबरदारी घेत आहे. पुढील तीन दिवस एकूण २३ पथकांद्वारे आचारसंहितेची कडक अंमलबजावणी केली जाईल. त्यासाठी रात्रं-दिवस शहरात पथकांचा वॉच असणार आहे. मतदारांनीसुद्धा गैरप्रकारांना थारा न देता १०० टक्के मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले.शुक्रवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक तयारीचा आढावा सादर केला. येत्या रविवारी (दि. ९) रोजी मतदान होत असून यासाठी ३३७ मतदान केंद्र आहेत. १ नोव्हेंबरपासून आदर्श आचारसंहिता लागू केली असून आचारसंहिता कक्षाद्वारे नेमलेली पथके योग्य ती कार्यवाही करत आहेत. आतापर्यंत ६ भरारी पथके तैनात होती. परंतु शुक्रवारपासून मतमोजणीपर्यंत अजून १७ पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. याशिवाय ६ चेक पोस्ट पथक, ६ व्हिडिओ सर्व्हेलियन्स पथक, १ छायाचित्रण तपासणी पथक कार्यरत आहेत. याशिवाय २ हजार निवडणूक कर्मचारी व २ हजार पोलीस कर्मचारी नियुक्त असून, कोणत्याही स्थितीत कायदा व सुव्यवस्था भंग होणार नाही याची काळजी घेतली जात आहे.निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक संनियंत्रण समिती, रेडिओ, टीव्ही, जाहिरात साहित्य तपासणी समिती, पेड न्यूज समिती, तसेच तहसीलदार यांची समिती कार्यरत आहे. मतदारांना प्रलोभन दाखवण्याचे प्रकार रोखण्यासाठी भरारी पथक असून आतापर्यंत आचारसंहिता कक्षाकडे १२ तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यातील सर्वांवर कार्यवाही झाली असून २ तक्रारींवर थेट गुन्हे दाखल झाले आहेत.शनिवारी, तसेच मतदानाच्या दिवशी ही पथके आणखी गतिमान होतील. उमेदवारांकडून पैसे वाटण्याचे, तसेच दहशतीचे प्रकार होत असतील तर त्वरित आचारसंहिता कक्षाकडे तक्रार करावी, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले. शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता जाहीर प्रचार संपलेला असून सार्वजनिक ठिकाणी राजकीय पक्षांनी, उमेदवारांनी लावलेले बॅनर काढावेत, अन्यथा त्यांच्यावर गुन्हेदाखल होतील, असेही द्विवेदी म्हणाले.आज कर्मचारी होणार बूथवर रवानानिवडणुकीसाठी नियुक्त असणा-या २ हजार कर्मचा-यांना शनिवारी दुपारपर्यंत मतदान साहित्याचे वाटप होऊन हे कर्मचारी सायंकाळपर्यत संबंधित मतदान केंद्रावर पोहोचतील, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरूण आनंदकर यांनी दिली.मतमोजणी भवानीनगर (आनंदधामजवळ) येथील वखार महामंडळाच्या गोदामात सोमवारी (दि.१०) सकाळी दहा वाजेपासून सुरू होईल. सर्व १७ प्रभागांची मोजणी एकाच वेळी सुरू होणार आहे. एका प्रभागासाठी स्वतंत्र तीन टेबल असतील. जेथे मतदानकेंद्र कमी असतील, तेथील निकाल आधी लागेल. साधारण बारा वाजेपर्यंत पहिला निकाल हाती येऊ शकतो. त्यानंतर पुढील निकाल गतीने लागतील. तांत्रिक अचडणी आल्या नाहीत, तर दुपारी एक वाजेपर्यंत मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता जिल्हाधिकाºयांनी वर्तवली.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर