शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

अक्षतांऐवजी झाली धुलाई : नवरदेवासह करवलेही झाले तर्रर्र..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 19:51 IST

कोतूळ येथून पंधरा किलोमीटरवरील दुर्गम भागातील केळी गारवाडीत हरिश्चंद्रगड परिसरातील नवरदेवाचे मंगळवारी लग्न होते. मात्र नवरदेव व त्याच्या मित्रांनी दारू पिऊन राडा केल्याने नवरीकडील लोकांनी नवरदेवासह व-हाडाची चांगलीच धुलाई केली. त्यामुळे हे लग्न मोडलेच होते, पण पोलीस व सामाजिक कार्यकर्त्यांनी हा वाद मिटवून लग्न लावून दिले.

ठळक मुद्देमोडलेले लग्न पोलिसांनी पुन्हा जुळविले

अकोले : कोतूळ येथून पंधरा किलोमीटरवरील दुर्गम भागातील केळी गारवाडीत हरिश्चंद्रगड परिसरातील नवरदेवाचे मंगळवारी लग्न होते. मात्र नवरदेव व त्याच्या मित्रांनी दारू पिऊन राडा केल्याने नवरीकडील लोकांनी नवरदेवासह व-हाडाची चांगलीच धुलाई केली. त्यामुळे हे लग्न मोडलेच होते, पण पोलीस व सामाजिक कार्यकर्त्यांनी हा वाद मिटवून लग्न लावून दिले.तर्र झालेला नवरदेव, त्याच्या बरोबर वीस पंचवीस करवले. तरूण देखील यथेच्छ पिलेले. नवरदेव लग्न लावण्यासाठी मिरवणूक निघाली. लग्न मुहूर्त टळून गेला, तरीही नवरदेवासह त्याचे मित्र नाचण्याचे थांबत नव्हते. त्यामुळे नवरीकडील काही मंडळींनी त्यांची विनवणी केली, मात्र नशेत तर्र नवरदेवाने नवरीकडील चार पाच लोकांना बुट, लाथा बुक्क्यांनी मारहाण करीत शिव्यांची लाखोली वाहिली. मात्र नवरीकडील लोकांचा संयम सुटल्याने नवरदेव व त्याच्या वीस पंचवीस मित्रांना यथेच्छ चोप दिला. नवरदेवाच्या मुंडावळ्या काढून घेत त्याचे लग्नाचे नवे कपडे देखील फाडून टाकले. बेदम हाणामारी पाहून गावातील पोलीस पाटलाने पाच किलोमीटर अंतरावर मोबाईल रेंज असलेल्या ठिकाणाहून कोतूळ पोलीस ठाण्यात सहायक फौजदार सुनील साळवे यांना माहिती दिली. साळवे यांनी आदिवासी सेवक पांडुरंग कचरे यांना घेऊन केळी गारवाडी गाठली. त्यांनी बैठक घेऊन दोन्ही बाजूची समजूत घातली. मात्र नवरी देखील लग्नाला तयार होत नव्हती. शेवटी नवरदेवाने नवरीची माफी मागितल्यानंतर वाद मिटला तोपर्यंत पोलिसांना पाहून डिजे व भटजी पळून गेले. केवळ दोनचार मंगलाष्टके घेत आदिवासी सेवक पांडुरंग कचरे यांनी भटजींची भूमिका वठवित हा सोहळा पार पाडला.

 

 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले