शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

शेवगाव तालुक्यातील तेरा गावांना बोंडअळीच्या अनुदानाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 18:14 IST

बोंडअळीमुळे गेल्यावर्षी कपाशीचे नुकसान झालेल्या शेवगाव तालुक्यातील १३ गावांमधील शेतकरी सरकारी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.

बालमटाकळी : बोंडअळीमुळे गेल्यावर्षी कपाशीचे नुकसान झालेल्या शेवगाव तालुक्यातील १३ गावांमधील शेतकरी सरकारी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. तालुक्यातील बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३३ कोटी रूपये मंजूर झाले आहेत.गेल्यावषी बोंडे येण्याच्या वेळी कपाशी पिकावर अचानकपणे बोंडअळीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेवगाव तालुक्यातील शेतकºयांच्या कपाशी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे या भागातील कपाशी पिकाचे तलाठी, ग्रामसेवक, कृषी विभाग यांच्या संयुक्त पथकामार्फत पंचनामे करण्यात आले. त्यानुसार शेतकºयांना बोंडअळीचे अनुदान मिळण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आल्यानंतर शेवगाव तालुक्यासाठी ३३ कोटी रूपये अनुदान मंजूर झाले. या मंजूर रकमेचे ३ टप्प्यात वाटप होणार असे जाहीर करण्यात आले होते. तालुक्यातील एकूण ११३ गावांपैकी पहिल्या टप्प्यात ५३ गावांसाठी ८ कोटी ७५ लाख रूपयांचे बोंडअळी अनुदान तहसीलमार्फत वाटप करण्यात आले. दुसºया टप्प्यामध्ये ५२ गावांमधील शेतकºयांना १३ कोटी १२ लाखाचे अनुदान वाटप करण्यात आले. आता तिसºया टप्प्यासाठी १३ गावातील शेतकºयांना सरकारकडून अनुदान प्राप्त होताच ते शेतकºयांना वाटप करण्यात येईल, अशी माहिती नायब तहसीलदार मयूर बेरड यांनी दिली आहे.‘‘तालुक्यातील ११३ गावांपैकी १०५ गावांना पहिल्या व दुसºया टप्प्यांमध्ये २१ कोटी ९५ लाख रूपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. उर्वरित कांबी, राणेगाव, कोनोशी, शोभानगर, शिंगोरी, नागलवाडी, गोळेगाव, शेकटे खुर्द, एरंडगाव, लाखेफळ, खामगाव, जोहरापूर, हिंगणगाव ने या १३ गावांना तिसºया टप्प्यात वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी ६ कोटी ७५ लाख रूपयांची तहसील कार्यालयाकडून वरिष्ठांकडे मागणी करण्यात आली आल्याचे नायक तहसीलदार मयूर बेरड यांनी सांगितले.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShevgaonशेवगाव