शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

आंदोलनातही एसटीवर ‘विठ्ठलकृपा’

By चंद्रकांत शेळके | Updated: August 2, 2018 15:41 IST

राज्यात विविध ठिकाणी आंदोलनात एसटी बस लक्ष्य होत असताना नगर विभागावर मात्र विठ्ठलकृपा झाली आहे. आषाढी यात्रेसाठी पंढरपूरला सोडलेल्या जादा बसगाड्यांमुळे आठवडाभरात एसटी महामंडळाच्या नगर विभागाला दीड कोटीचे उत्पन्न मिळाले आहे.

चंद्रकांत शेळकेअहमदनगर : राज्यात विविध ठिकाणी आंदोलनात एसटी बस लक्ष्य होत असताना नगर विभागावर मात्र विठ्ठलकृपा झाली आहे. आषाढी यात्रेसाठी पंढरपूरला सोडलेल्या जादा बसगाड्यांमुळे आठवडाभरात एसटी महामंडळाच्या नगर विभागाला दीड कोटीचे उत्पन्न मिळाले आहे. विशेष म्हणजे मागील वर्षीपेक्षा कमी फेऱ्या होऊनही साडेअकरा लाखांचा अतिरिक्त फायदा एसटीला झाला आहे.आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरातून पंढरपूरला लाखो भाविक विठ्ठल दर्शनासाठी येत असतात. यासाठी राज्यातील एसटीच्या बहुतांश विभागांतून जादा बस सोडल्या जातात. यंदा नगरमधून पंढरपूर यात्रेसाठी २० ते २७ जुलैदरम्यान २१६ जादा बस सोडल्या होत्या. २३ जुलैला आषाढी एकादशी झाल्यानंतर २४ जुलैपासून मराठा आरक्षणासाठी राज्यात तीव्र आंदोलने सुरू झाली. ठिकठिकाणी रास्ता रोको, बंद पाळण्यात आला.तसेच काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने एसटी महामंडळाच्या बसगाड्यांना मोठ्या प्रमाणावर लक्ष्य करण्यात आले. बसवर दगडफेक करण्यापासून थेट गाड्या पेटवून दिल्याने एसटी वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांत बस बंद ठेवण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला.परंतु नगर विभाग मात्र याला अपवाद ठरले. नगर विभागामधून सोडण्यात आलेल्या सर्व २१६ जादा गाड्यांचे व्यवस्थित नियोजन झाल्याने यंदाची पंढरपूर यात्रा यशस्वी ठरली. नगर-सोलापूर मार्गावरही आंदोलनाचे सावट होते. परंतु नगर विभागाने योग्य नियोजन, पोलिसांची मदत घेत प्रवाशांना सुखरूप घरी पोहोचवले. खासगी वाहतुकीपेक्षा भाविकांनी एसटी महामंडळावर विश्वास दाखवला.या सात दिवसांत २१६ गाड्यांनी पंढरपूरसाठी १५७० फेºया करत ३ लाख ४० हजार १७७ किलोमीटर प्रवास केला. यात प्रवाशी भारमान ८१ टक्के होते. तर ८५ हजार प्रवाशांनी प्रवास केला.मागील वर्षी एवढ्याच जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे यंदा मागील वर्षीपेक्षा ४० हजार किलोमीटर प्रवास घटला असूनही उत्पन्न साडेअकरा लाखांनी वाढले आहे. जिल्ह्यातील ११ आगारांपैकी सर्वाधिक ३३६ फेºया तारकपूर आगाराने केल्या.यंदा आषाढी यात्रेवर आंदोलनाचे सावट होते. आमच्या बसवर बºयाच ठिकाणी दगडफेक झाली. परंतु भाविकांच्या सोईसाठी एकही बस बंद ठेवली नाही. पोलीस बंदोबस्तात पंढरपूरहून बस आणल्या. प्रसंगी चालक-वाहक व एसटी अधिकाºयांनी वर्गणी करून प्रवाशांच्या जेवणाची व्यवस्था केली आणि भाविकांना सुखरूप घरी पोहोचवले. योग्य नियोजन केल्यानेच आमचे उत्पन्न यंदा वाढले आहे.- विजय गिते, विभाग नियंत्रक, अहमदनगर विभाग 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरstate transportएसटी