शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

१५ एप्रिलपासून विसापूरचे शेतीसाठी आवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:20 IST

श्रीगोंदा : विसापूर तलावातून १५ एप्रिलपासून शेतीसाठी आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कालवा सल्लागार समितीची बैठक ...

श्रीगोंदा : विसापूर तलावातून १५ एप्रिलपासून शेतीसाठी आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कालवा सल्लागार समितीची बैठक सोमवारी कुकडी प्रकल्प विभाग क्रमांक २ चे कार्यकारी अभियंता स्वप्निल काळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

कुकडीच्या बैठकीस आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार राहुल जगताप, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनःशाम शेलार, जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष आण्णासाहेब शेलार, गणपतराव काकडे तसेच २७ पाणी वापर संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. विसापूर तलावातून २५ दिवस आवर्तन सोडण्यात येणार आहे. हे आवर्तन शेतीसाठी देण्यात येणार आहे. आवर्तन सोडण्यापूर्वी पाणी वापर संस्थांकडील नऊ लाखांची थकीत पाणीपट्टी भरणे आवश्यक आहे. या आवर्तनाचा बेलवंडी, घारगाव, पिसोरे, चिंभळे, शिरसगाव बोडखा, लोणीव्यंकनाथ या गावांना फायदा होणार आहे.

९ एप्रिलला कुकडी कालवा सल्लागार समितीची पुण्यात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. या बैठकीत कुकडीचे पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.