शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
4
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
5
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
6
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
7
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
8
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
9
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
11
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
12
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
13
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
14
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
15
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
16
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
17
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
18
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
19
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी

परप्रांतीय ६०० कामगारांनी गाठले गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:22 IST

अहमदनगर : कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर परप्रांतीय कामगार परतले होते. मात्र, कोरोनाची दुसरी लाट येऊन धडकली. सरकारने कडक निर्बंध ...

अहमदनगर : कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर परप्रांतीय कामगार परतले होते. मात्र, कोरोनाची दुसरी लाट येऊन धडकली. सरकारने कडक निर्बंध लागू केल्याने सहाशेहून अधिक कामगारांनी गावचा रस्ता धरला. याशिवाय नोंद नसलेले अनेक कामगार बस, चारचाकी, दुचाकीने गावी निघून गले आहेत.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत कामगारांचे हाल झाले. अचानक लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे कामगारांची धावपळ झाली होती. वाहतूक बंद होती. जीव मुठीत धरून कामगारांनी गाव गाठले. कोरोनाची लाट ओसरल्यानंतर हाॅटेल, बांधकाम, फर्निचर, विविध कारखान्यांमध्ये काम करणारे कामगार परत आले होते. परंतु, कोरोनाची दुसरी लाट येताच कामगारांनी कामावर जाणे बंद केले. काहीजण रेल्वेने आपल्या गावी निघून गेले. कामगारांना परत न जाण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. मागील लॉकडाऊनचा अनुभव वाईट होता. त्यामुळे त्यांनी यावेळी मालकांचेही एकले नाही. ते गावाकडे निघून गले. रेल्वेने जाणाऱ्या कामगारांची कामगार विभागाकडून माहिती घेतली गेली. या विभागाच्या अहवालानुसार आतापर्यंत ६०९ कामगार गावी निघून गेलेले आहेत. याशिवाय बस, दुचाकी, चारचाकी, अवजड वाहनांतून गेलेल्या कामगारांची संख्याही मोठी आहे. सकाळच्या वेळेत दुचाकीवरून अनेक कामगार गावाकडे निघालेले पहायला मिळतात.

......

कामगारांसाठी नियंत्रण कक्ष सुरू

सरकारने कामगार गावी परत न जाण्याचे आवाहन करीत त्यांच्यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. या काळातील कामगारांचे वेतन, आरोग्याच्या सुविधा, कामावरून कमी करणे यासह इतर समस्यांबाबत हा कक्ष कार्यरत आहे. कामगारांनी तक्रार दिल्यानंतर संबंधितांवर तत्काळ कारवाई करण्यात येणार असल्याचे सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले.