शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

थर्ड डिग्रीच्या दहशतीखाली गाव

By admin | Updated: October 29, 2014 23:57 IST

पाथर्डी : तालुक्यातील जवखेडे खालसा येथील दलीत कुटुंबातील तीघांच्या हत्या प्रकरणात पोलीस विनाकारण गावातील व्यक्तींना रात्री अपरात्री उचलतात व थर्ड डिग्री लावून अमानुषपणे मारहाण करतात

पाथर्डी : तालुक्यातील जवखेडे खालसा येथील दलीत कुटुंबातील तीघांच्या हत्या प्रकरणात पोलीस विनाकारण गावातील व्यक्तींना रात्री अपरात्री उचलतात व थर्ड डिग्री लावून अमानुषपणे मारहाण करतात या प्रकाराबाबत गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त करीत याचा त्रास महिलांना मोठ्या प्रमाणात होत आहे, अशी कैफियत गावकऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांसमोर मांडली़ ग्रामस्थांची चौकशी गावातच करावी, अशी मागणी केली़ जवखेडे खालसा येथे मागील आठवड्यात जाधव या कुटुंबातील तीघांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली़ याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले. दलीत चळवळीतील कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी तसेच विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जवखेडे खालसा येथे भेट देवून आरोपींना तात्काळ अटक करा, अशी मागणी करीत पोलिसांवर दबाव आणला़ त्यामुळे पोलिसांनी गावातील संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली़ पोलिसांनी गावातील सुमारे ५० संशयितांना ताब्यात घेतले़ पोलिसांकडून मारहाण होत असल्याच्या तक्रारीनंतर ग्रामस्थांनी बुधवारी (दि़२९) महादेव मंदिरात बैठक घेतली़ यावेळी ज्येष्ठ नेते उध्ववराव वाघ, अ‍ॅड.वैभव आंधळे, चारूदत्त वाघ, अमोल वाघ, सुरेश वाघ आदींसह सुमारे दोनशे ग्रामस्थ उपस्थित होते़ यामध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती.बैठकीत ग्रामस्थांनी सांगितले की, पोलीस रात्री-अपरात्री येऊन ताब्यात घेतात, मारहाण करतात, थर्ड डिग्री लावण्याचा दम देतात़ त्यामुळे गावकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण आहे़ या घटनेचा तपास लवकरात लवकर लावावा, अशी आमची इच्छा आहे व मागणीही आहे. परंतु गावकऱ्यांना पोलीस अमानुषपणे मारहान करीत आहेत़ त्याबद्दल ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला़ महिलांनीही तीव्र शब्दात उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्यासमोर व्यथा मांडल्या. यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे शशीराज पाटोळे, पो.नि.सुभाष अनमुलवार आदी उपस्थित होते. यापुढे ग्रामस्थांची चौकशी गावातच होईल, तसेच आमच्या परवानगीशिवाय कोणालाही ताब्यात घेतले जाणार नाही, याची दक्षता घेण्याचे आश्वासन उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांनी ग्रामस्थांना दिले. (तालुका प्रतिनिधी)