शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
2
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
3
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
4
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
5
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
6
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
7
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
8
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
9
"सरकार निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचे काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
10
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
11
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
12
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
13
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
14
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
15
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
16
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
17
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
19
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
20
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री

राळेगणसिद्धी ‘ऊर्जा’ देणारे गाव; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 00:08 IST

ज्या राळेगणसिद्धीतून देशाला विकासाची ऊर्जा मिळाली, त्याच ऐतिहासिक गावातून आता शेतकºयांना खरी ‘ऊर्जा’ मिळणार आहे. सौरऊर्जा प्रकल्प व ग्रामरक्षक दल या देशाला पथदर्शी ठरणाºया दोन योजनांचा प्रारंभ अण्णा हजारेंच्या राळेगणसिद्धीमधून होत असल्याने हा ऐतिहासिक दिवस असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

अहमदनगर : ज्या राळेगणसिद्धीतून देशाला विकासाची ऊर्जा मिळाली, त्याच ऐतिहासिक गावातून आता शेतकºयांना खरी ‘ऊर्जा’ मिळणार आहे. सौरऊर्जा प्रकल्प व ग्रामरक्षक दल या देशाला पथदर्शी ठरणाºया दोन योजनांचा प्रारंभ अण्णा हजारेंच्या राळेगणसिद्धीमधून होत असल्याने हा ऐतिहासिक दिवस असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.राळेगणसिद्धी (ता. पारनेर) येथे शनिवारी ‘मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी प्रकल्पा’चे भूमिपूजन, ग्रामरक्षक दलाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ‘सरपंच मेळावा’ झाला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे होते. ऊर्जा व राज्य उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री म्हणाले, सौरउर्जा प्रकल्प आणि ग्रामसुरक्षा दल कायद्याची अंमलबजावणी देशात राळेगणसिद्धीतूनच प्रथम होत आहे. अण्णा हजारे आणि पोपटराव पवार यांच्या रूपाने देशाला ग्रामविकासाची दिशा मिळाली. तीन महिन्यांत राळेगणसिद्धीतील सौरप्रकल्प पूर्ण होईल. त्यामुळे शेतकºयांना दिवसा १२ तास वीज मिळणार आहे. ग्रामसुरक्षा दल कायद्याची अंमलबजावणीची जबाबदारी ही कायद्यापेक्षा ग्रामस्थांवर अधिक आहे. अवैध दारूबाबत जनजागृती करण्याबाबत गावोगावी फिरणार असल्याचे अण्णांनी आश्वस्त केले आहे.आतापर्यंत विहीर पुनर्भरण व्हायचे, परंतु आता अख्ख्या पाणलोटाचेच पुनर्भरण हा अण्णांचा मंत्र घेऊन भविष्यात राज्यातील २० हजार गावे दुष्काळमुक्त करण्याचे नियोजन असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. हजारे म्हणाले, गावागावांतील व्यसनाधीनता संपवायची असेल, तर अवैध दारूविक्री रोखली पाहिजे. अधिकारी आणि ग्रामस्थांच्या समन्वयाने हे शक्य होईल. ग्रामरक्षक दल कायद्याबाबत छत्तीसगड आणि मध्यप्रदेश राज्यांनीही माहिती मागवून घेतली आहे.सभेत गोंधळसभा सुरू असताना एक अपंग तरुण रोजगार मिळत नसल्याबाबतचे निवेदन घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी आला होता. मात्र पोलिसांनी अटकाव केल्याने त्याने सुरक्षाकडे तोडून व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांकडे जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यामुळे काही वेळ सभेत गोंधळ झाला. सभेनंतर संबंधित तरुणाची पोलिसांनी चौकशी केली. त्याचे निवेदन घेऊन त्याला सोडून दिले.