शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

राळेगणसिद्धी ‘ऊर्जा’ देणारे गाव; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 00:08 IST

ज्या राळेगणसिद्धीतून देशाला विकासाची ऊर्जा मिळाली, त्याच ऐतिहासिक गावातून आता शेतकºयांना खरी ‘ऊर्जा’ मिळणार आहे. सौरऊर्जा प्रकल्प व ग्रामरक्षक दल या देशाला पथदर्शी ठरणाºया दोन योजनांचा प्रारंभ अण्णा हजारेंच्या राळेगणसिद्धीमधून होत असल्याने हा ऐतिहासिक दिवस असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

अहमदनगर : ज्या राळेगणसिद्धीतून देशाला विकासाची ऊर्जा मिळाली, त्याच ऐतिहासिक गावातून आता शेतकºयांना खरी ‘ऊर्जा’ मिळणार आहे. सौरऊर्जा प्रकल्प व ग्रामरक्षक दल या देशाला पथदर्शी ठरणाºया दोन योजनांचा प्रारंभ अण्णा हजारेंच्या राळेगणसिद्धीमधून होत असल्याने हा ऐतिहासिक दिवस असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.राळेगणसिद्धी (ता. पारनेर) येथे शनिवारी ‘मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी प्रकल्पा’चे भूमिपूजन, ग्रामरक्षक दलाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ‘सरपंच मेळावा’ झाला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे होते. ऊर्जा व राज्य उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री म्हणाले, सौरउर्जा प्रकल्प आणि ग्रामसुरक्षा दल कायद्याची अंमलबजावणी देशात राळेगणसिद्धीतूनच प्रथम होत आहे. अण्णा हजारे आणि पोपटराव पवार यांच्या रूपाने देशाला ग्रामविकासाची दिशा मिळाली. तीन महिन्यांत राळेगणसिद्धीतील सौरप्रकल्प पूर्ण होईल. त्यामुळे शेतकºयांना दिवसा १२ तास वीज मिळणार आहे. ग्रामसुरक्षा दल कायद्याची अंमलबजावणीची जबाबदारी ही कायद्यापेक्षा ग्रामस्थांवर अधिक आहे. अवैध दारूबाबत जनजागृती करण्याबाबत गावोगावी फिरणार असल्याचे अण्णांनी आश्वस्त केले आहे.आतापर्यंत विहीर पुनर्भरण व्हायचे, परंतु आता अख्ख्या पाणलोटाचेच पुनर्भरण हा अण्णांचा मंत्र घेऊन भविष्यात राज्यातील २० हजार गावे दुष्काळमुक्त करण्याचे नियोजन असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. हजारे म्हणाले, गावागावांतील व्यसनाधीनता संपवायची असेल, तर अवैध दारूविक्री रोखली पाहिजे. अधिकारी आणि ग्रामस्थांच्या समन्वयाने हे शक्य होईल. ग्रामरक्षक दल कायद्याबाबत छत्तीसगड आणि मध्यप्रदेश राज्यांनीही माहिती मागवून घेतली आहे.सभेत गोंधळसभा सुरू असताना एक अपंग तरुण रोजगार मिळत नसल्याबाबतचे निवेदन घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी आला होता. मात्र पोलिसांनी अटकाव केल्याने त्याने सुरक्षाकडे तोडून व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांकडे जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यामुळे काही वेळ सभेत गोंधळ झाला. सभेनंतर संबंधित तरुणाची पोलिसांनी चौकशी केली. त्याचे निवेदन घेऊन त्याला सोडून दिले.