शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE अभ्यासक्रमात छत्रपती शिवरायांचा इतिहास फक्त ६८ शब्दांत, सत्यजीत तांबेंचा विधानसभेत संताप
2
भारतात येत असताना...! विनफास्ट अमेरिकेत डीलरशीप बंद करू लागली; संख्या दोन डझनांखाली आली...
3
मुंबईतील ७० टक्के मुस्लीम बहुल भागात एकनाथ शिंदेंना पसंती; भाजपाच्या सर्व्हेतून काय आलं समोर?
4
टेस्लाला मोठा झटका! जागतिक विक्री ४ वर्षांतील नीचांकी पातळीवर; भारतात तर डोकेही वर निघेना...
5
इंडिगोचं विमान ऐनवेळी रद्द, मुलाची परीक्षा चुकू नये म्हणून वडिलांनी रात्रभर चालवली कार, अखेरीस... 
6
"ज्येष्ठ नेते शिवराज पाटील यांच्या निधनाने अनुभवी, अभ्यासू व सुसंकृत नेतृत्व हरपले’’,  हर्षवर्धन सपकाळ यांनी वाहिली श्रद्धांजली
7
Garud Puran: गरुड पुराणानुसार विवाह बाह्य संबंध ठेवणाऱ्यांना मिळते 'ही' भयानक शिक्षा!
8
या अभिनेत्रीचे वडील उरीमध्ये दहशतवाद्यांशी लढताना झाले होते शहीद, ८०० कोटींच्या सिनेमातून रातोरात झाली लोकप्रिय
9
नात्याला काळीमा! इस्रायलचं स्वप्न, विम्याच्या रकमेसाठी लेक झाला हैवान; वडिलांचा काढला काटा
10
मोठी बातमी! वेनेझुएलावर अमेरिकेने हल्ला केलाच, रशिया संरक्षण करणार; मादुरो यांना पुतीन यांचा फोन गेला...
11
नोकरीचं राहुद्या आता अमेरिकेत फिरायला जाणेही कठीण! ट्रम्प म्हणाले 'या' हेतूने येणाऱ्यांना पर्यटन व्हिसा नाही
12
लूथरा बंधूंच्या मागे आता ईडी देखील हात धुवून लागणार; दिल्लीतील एकाच पत्त्यावर ४२ बनावट कंपन्या...
13
११ वर्षांच्या यशस्वी मोहिमेनंतर NASA च्या 'MAVEN' मार्स ऑर्बिटरशी अचानक संपर्क तुटला; वैज्ञानिक चिंतेत
14
Astro Tips: तिन्ही सांजेला 'या' ५ चुका करणे म्हणजे घरी आलेली लक्ष्मी परतावून लावणे!
15
इंडिगो संकटाची मोठी किंमत! DGCAची कठोर कारवाई, निष्काळजीपणा आढळताच ४ अधिकारी निलंबित
16
Vaibhav Suryavanshi : षटकार-चौकारांची 'बरसात'! वादळी शतकासह वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
17
बँक खाते, पेन्शन, टॅक्स स्लॅब ते GST बदल... २०२५ मध्ये पैशांसंबंधी झाले ७ मोठे बदल; तुम्हाला किती फायदा?
18
ब्रह्मोसपेक्षा वेगवान; भारताला मिळणार 300 रशियन R-37M क्षेपणास्त्रे, सुखोई विमानात बसवले जाणार
19
Shashi Tharoor: "पत्नीच्या संमतीशिवाय संबंध ठेवणे वैवाहिक बलात्कारच, पतीला सूट का द्यावी?"- शशी थरूर
20
"शिवराज पाटील यांची अलीकडेच भेट झाली होती, ते..." PM नरेंद्र मोदींनी दिला आठवणींना उजाळा
Daily Top 2Weekly Top 5

राळेगणसिद्धी ‘ऊर्जा’ देणारे गाव; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 00:08 IST

ज्या राळेगणसिद्धीतून देशाला विकासाची ऊर्जा मिळाली, त्याच ऐतिहासिक गावातून आता शेतकºयांना खरी ‘ऊर्जा’ मिळणार आहे. सौरऊर्जा प्रकल्प व ग्रामरक्षक दल या देशाला पथदर्शी ठरणाºया दोन योजनांचा प्रारंभ अण्णा हजारेंच्या राळेगणसिद्धीमधून होत असल्याने हा ऐतिहासिक दिवस असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

अहमदनगर : ज्या राळेगणसिद्धीतून देशाला विकासाची ऊर्जा मिळाली, त्याच ऐतिहासिक गावातून आता शेतकºयांना खरी ‘ऊर्जा’ मिळणार आहे. सौरऊर्जा प्रकल्प व ग्रामरक्षक दल या देशाला पथदर्शी ठरणाºया दोन योजनांचा प्रारंभ अण्णा हजारेंच्या राळेगणसिद्धीमधून होत असल्याने हा ऐतिहासिक दिवस असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.राळेगणसिद्धी (ता. पारनेर) येथे शनिवारी ‘मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी प्रकल्पा’चे भूमिपूजन, ग्रामरक्षक दलाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ‘सरपंच मेळावा’ झाला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे होते. ऊर्जा व राज्य उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री म्हणाले, सौरउर्जा प्रकल्प आणि ग्रामसुरक्षा दल कायद्याची अंमलबजावणी देशात राळेगणसिद्धीतूनच प्रथम होत आहे. अण्णा हजारे आणि पोपटराव पवार यांच्या रूपाने देशाला ग्रामविकासाची दिशा मिळाली. तीन महिन्यांत राळेगणसिद्धीतील सौरप्रकल्प पूर्ण होईल. त्यामुळे शेतकºयांना दिवसा १२ तास वीज मिळणार आहे. ग्रामसुरक्षा दल कायद्याची अंमलबजावणीची जबाबदारी ही कायद्यापेक्षा ग्रामस्थांवर अधिक आहे. अवैध दारूबाबत जनजागृती करण्याबाबत गावोगावी फिरणार असल्याचे अण्णांनी आश्वस्त केले आहे.आतापर्यंत विहीर पुनर्भरण व्हायचे, परंतु आता अख्ख्या पाणलोटाचेच पुनर्भरण हा अण्णांचा मंत्र घेऊन भविष्यात राज्यातील २० हजार गावे दुष्काळमुक्त करण्याचे नियोजन असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. हजारे म्हणाले, गावागावांतील व्यसनाधीनता संपवायची असेल, तर अवैध दारूविक्री रोखली पाहिजे. अधिकारी आणि ग्रामस्थांच्या समन्वयाने हे शक्य होईल. ग्रामरक्षक दल कायद्याबाबत छत्तीसगड आणि मध्यप्रदेश राज्यांनीही माहिती मागवून घेतली आहे.सभेत गोंधळसभा सुरू असताना एक अपंग तरुण रोजगार मिळत नसल्याबाबतचे निवेदन घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी आला होता. मात्र पोलिसांनी अटकाव केल्याने त्याने सुरक्षाकडे तोडून व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांकडे जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यामुळे काही वेळ सभेत गोंधळ झाला. सभेनंतर संबंधित तरुणाची पोलिसांनी चौकशी केली. त्याचे निवेदन घेऊन त्याला सोडून दिले.