शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

सोनई-करजगावसह 18 गावाचे ग्रामस्थ बसले नगरला उपोषणाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 17:17 IST

सोनई - करजगाव सह 18 गावांची पाणी योजना तातडीने सुरू करावी. ती योजना सुरु होण्यापर्यंत या सर्व गावात पाण्याचे टँकर चालू करावी, कामे पूर्ण झाली नसतांना ठेकेदाराला दिलेल्या बिलाची चौकशी करावी.

अहमदनगर : सोनई - करजगाव सह 18 गावांची पाणी योजना तातडीने सुरू करावी. ती योजना सुरु होण्यापर्यंत या सर्व गावात पाण्याचे टँकर चालू करावी, कामे पूर्ण झाली नसतांना ठेकेदाराला दिलेल्या बिलाची चौकशी करावी. योजनेचे काम पूर्ण करून 1 वर्ष योजना प्राधिकरणाने चालवावी या मागणीसाठी माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ नगर येथील जीवन प्राधिकरणाच्या आॅफिस समोर उपोषणाला बसले आहेत.या सर्व प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १ जुलै 2019 पासून बंद केलेली पाणी योजना पुन्हा सुरू करण्यासाठी गडाख यांच्या समवेत अठरा गावचे सरपंच व ग्रामस्थांनी सोनई येथे रस्ता रोको आंदोलन केले होते. त्यात जीवन प्राधिकरणाच्या अधिका-यांनी याबाबत लेखी दिले होते परंतु यावर काहीही कारवाई झाली नाही. त्यामुळे हे सर्व ग्रामस्थ नगर येथे उपोषणाला बसलेले आहेत. या मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे.प्राधिकरणाच्या आॅफिसमध्ये उपोषणकर्ते आले त्यांनी तेथे ठिय्या मांडला व टाळ, मृदंगसह जप चालू केला. अधिकारी, ठेकेदार व नेवाशाचे आमदार यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पंचायत समितीच्या सभापती कल्पना पंडित, दगडुभाई इनामदार, सुभाष जाधव, बाळासाहेब वायभासे, केशव औटी, रमेश पुंड, गोरख माकोने, चंद्रकांत टेमक, अण्णासाहेब मकोने, 18 गावातील सरपंच, उपसरपंच, क्रांतिकारी पक्षाचे सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते .राहुरी तालुक्यातील 3 गावांना दिलेले अनधिकृतपणे कनेक्शन दिल्यामुळे नेवासा तालुक्यातील 18 गावांची पाणी योजना अडचणीत आली आहे. तसेच पूर्ण दाबाने पाणी येत नाही व टाक्या भरत नाही राहुरीचे गावे जोडण्यासाठी नेवशाच्या लोकप्रतिनिधींनी लेखी समंती दिली आहे. या योजनेचे छोटे मोठे कामे अपूर्ण असतांनाही ठेकेदाराला पेमेंट दिले गेले आहे यात मोठा भ्रष्टाचार झाला असून याची चवकशी करण्याची मागणी आहे. कामे अपूर्ण असतांना योजना हस्ततारण करण्याचा घाट घातला जात असल्याचे माजी आमदार शंकरराव गडाख यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासा