शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

विखे, थोरातांचा कारखाना करणार ऑक्सिजनची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:20 IST

अहमदनगर : खा. डॉ. सुजय विखे व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अधिपत्याखालील सहकारी साखर कारखान्यांनी तातडीने ऑक्सिजन निर्मिती ...

अहमदनगर : खा. डॉ. सुजय विखे व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अधिपत्याखालील सहकारी साखर कारखान्यांनी तातडीने ऑक्सिजन निर्मिती करणारे प्रकल्प उभारण्याची तयारी दर्शविली आहे. प्रकल्प उभारणीचे काम सुरू केल्याचे या दोन कारखान्यांनी सहकार आयुक्त कार्यालयास कळविले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

कोरोनाने जिल्ह्यात कहर माजविला आहे. गंभीर रुग्णांची संख्या दिवसेंदवस वाढत आहे. गंभीर रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. दररोज ६० मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी रुग्णालयांकडून केली जात आहे. मात्र मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत नसल्याने जिल्ह्यातच ऑक्सिजन निर्मितीचे प्रकल्प उभे करण्याच्या हालचाली सुरू आहेत. जिल्हा रुग्णालयात हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारा प्रकल्प उभारण्यात आला असून, सहकार आयुक्त कार्यालयाने जिल्ह्यातील साखर कारखान्यांना ऑक्सिजनचे प्रकल्प उभारण्याचे आवाहन केले होते. जिल्ह्यात एकूण साखर कारखान्यांची संख्या २३ आहे. यापैकी २२ साखर कारखान्यांनी चालूवर्षी गाळप केले. यापैकी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील व सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प उभारण्याची तयारी दर्शविली आहे. या दोन्ही कारखान्यांनी तसे पत्र सहकार आयुक्त कार्यालयास दिले असून, प्रकल्प उभारण्याचे कामही हाती घेतले आहे. उर्वरित सहकारी साखर कारखान्यांनी मात्र सहकार खात्याचा आवाहनाला प्रतिसाद दिला नाही. जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या अधिपत्याखालील सहकारी कारखान्यांची संख्या मोठी आहे; परंतु या कारखान्यांनी ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याची तयारी दर्शविली नाही. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काेरोनाच्या संकट काळात कारखान्यांनी पुढे येऊन मदत करावी. सध्या ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला असून, कारखान्यांनी स्वत:चे ऑक्सिजन निर्मितीचे प्रकल्प उभारावेत, असे आवाहन केले होते; परंतु राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला नसल्याने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

....

दिवसभरात ५३ मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध

जिल्ह्याला सोमवारी दिवसभरात विविध प्रकल्पांमधून ५३ मेट्रिक ऑक्सिजन उपलब्ध झाला आहे. हा ऑक्सिजन रुग्णालयांना समप्रमाणात वाटप करण्यात आला आहे. ऑक्सिजन वाटपासाठी उपजिल्हाधिकाऱ्यांसह तहसीलदार, नायब तहसीलदारांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे. हे पथक प्रकल्पांवर चोवीस तास ठाण मांडून आहे. त्यांच्या नियंत्रणाखाली ऑक्सिजनचे वाटप होत असल्याने गेल्या दोन दिवसांत तक्रारींचे प्रमाण कमी झाले असल्याचे प्रशासानाकडून सांगण्यात आले.