शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

VIDEO : नगरच्या भुईकोट किल्ल्यात होता पंडित नेहरूंचा अडीच वर्ष मुक्काम

By admin | Updated: May 26, 2017 21:29 IST

- आॅनलाइन लोकमत/योगेश गुंड अहमदनगर, दि.26 -  भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासह इतर राष्ट्रीय नेत्यांना नगर येथील ...

- आॅनलाइन लोकमत/योगेश गुंड

अहमदनगर, दि.26 -  भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासह इतर राष्ट्रीय नेत्यांना नगर येथील भुईकोट किल्ल्यात बंदिवासात ठेवण्यात आले होते. पंतप्रधान होण्याच्या आधी दहा वर्षे म्हणजे १९४२ च्या स्वातंत्र्य चळवळीत त्यांचा सुमारे अडीच वर्षांचा काळ या किल्ल्यात गेला.बंदिवासाच्या काळातच नेहरू यांनी जगप्रसिद्ध ‘डिस्कवरी आॅफ इंडिया’ हा ग्रंथ भुईकोट किल्ल्यात शब्दबद्ध केला. त्या ग्रंथाची १ हजार पाने त्यांनी येथे लिहिली. त्याच्या काही प्रती ते ज्या खोलीत बंदिवासात होते, तेथे जतन करण्यात आल्या आहेत. याचबरोबर त्यांनी दैनंदिन वापरलेल्या वस्तू, खुर्ची, टेबल, बिछाना, काही भांडी, त्यांनी लिहिलेली पत्रे येथे पहावयास मिळतात.सकाळी ७.३० ते ८ नाश्ता, दुपारी वाचन व लेखन, जेवणानंतर दुपारी बॅडमिंटन खेळणे, त्यानंतर पुन्हा वाचन व लेखन, व्यायाम, रात्री साडेआठला जेवण व नऊ वाजता झोपणे असा पंडितजींचा त्या वेळचा दिनक्रम होता.पंडित नेहरुंना नगरच्या किल्ल्यात बागकाम करण्याची आवड जडली. फुलांची आवड असल्याने ते सर्वात आधी उठून बागकामात रंगून जात. किल्ल्यातील अनेक झाडांचे त्यांनी जतन केले. नगरची बासुंदी आणि आंबेमोहोर तांदळाची त्यांना आवड होती. येथील मोतीलाल फिरोदिया हे त्यावेळी पंडितजींचे यजमान होते. ते पंडितजींसाठी ‘बंबईवाला’ यांची बासुंदी, तर भिंगार येथील मिश्रीलाल भंडारी यांच्या रेशनच्या दुकानांतील आंबेमोहोर तांदूळ किल्ल्यात पाठवत असत.

पंतप्रधान झाल्यानंतर दोनदा किल्ल्याला भेटआपल्या जीवनातील अडीच वर्षांचा काळ ज्या किल्ल्यात घालवला त्याच्या आठवणी पंडितजींच्या मनात कायम राहिल्या, म्हणूनच पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी १९५२ आणि १९६१ अशा दोन वेळी नगरला भेट दिली. या आपल्या भेटीत त्यांनी आवर्जून किल्ल्याला भेट देऊन आपली खोली, आपण घालवलेल्या ठिकाणची पाहणी करून जुन्या आठवणींना उजाळा दिला.