शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : नगरच्या भुईकोट किल्ल्यात होता पंडित नेहरूंचा अडीच वर्ष मुक्काम

By admin | Updated: May 26, 2017 21:29 IST

- आॅनलाइन लोकमत/योगेश गुंड अहमदनगर, दि.26 -  भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासह इतर राष्ट्रीय नेत्यांना नगर येथील ...

- आॅनलाइन लोकमत/योगेश गुंड

अहमदनगर, दि.26 -  भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासह इतर राष्ट्रीय नेत्यांना नगर येथील भुईकोट किल्ल्यात बंदिवासात ठेवण्यात आले होते. पंतप्रधान होण्याच्या आधी दहा वर्षे म्हणजे १९४२ च्या स्वातंत्र्य चळवळीत त्यांचा सुमारे अडीच वर्षांचा काळ या किल्ल्यात गेला.बंदिवासाच्या काळातच नेहरू यांनी जगप्रसिद्ध ‘डिस्कवरी आॅफ इंडिया’ हा ग्रंथ भुईकोट किल्ल्यात शब्दबद्ध केला. त्या ग्रंथाची १ हजार पाने त्यांनी येथे लिहिली. त्याच्या काही प्रती ते ज्या खोलीत बंदिवासात होते, तेथे जतन करण्यात आल्या आहेत. याचबरोबर त्यांनी दैनंदिन वापरलेल्या वस्तू, खुर्ची, टेबल, बिछाना, काही भांडी, त्यांनी लिहिलेली पत्रे येथे पहावयास मिळतात.सकाळी ७.३० ते ८ नाश्ता, दुपारी वाचन व लेखन, जेवणानंतर दुपारी बॅडमिंटन खेळणे, त्यानंतर पुन्हा वाचन व लेखन, व्यायाम, रात्री साडेआठला जेवण व नऊ वाजता झोपणे असा पंडितजींचा त्या वेळचा दिनक्रम होता.पंडित नेहरुंना नगरच्या किल्ल्यात बागकाम करण्याची आवड जडली. फुलांची आवड असल्याने ते सर्वात आधी उठून बागकामात रंगून जात. किल्ल्यातील अनेक झाडांचे त्यांनी जतन केले. नगरची बासुंदी आणि आंबेमोहोर तांदळाची त्यांना आवड होती. येथील मोतीलाल फिरोदिया हे त्यावेळी पंडितजींचे यजमान होते. ते पंडितजींसाठी ‘बंबईवाला’ यांची बासुंदी, तर भिंगार येथील मिश्रीलाल भंडारी यांच्या रेशनच्या दुकानांतील आंबेमोहोर तांदूळ किल्ल्यात पाठवत असत.

पंतप्रधान झाल्यानंतर दोनदा किल्ल्याला भेटआपल्या जीवनातील अडीच वर्षांचा काळ ज्या किल्ल्यात घालवला त्याच्या आठवणी पंडितजींच्या मनात कायम राहिल्या, म्हणूनच पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी १९५२ आणि १९६१ अशा दोन वेळी नगरला भेट दिली. या आपल्या भेटीत त्यांनी आवर्जून किल्ल्याला भेट देऊन आपली खोली, आपण घालवलेल्या ठिकाणची पाहणी करून जुन्या आठवणींना उजाळा दिला.