शहरं
Join us  
Trending Stories
1
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
2
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
युक्रेन युद्धादरम्यान रशियाने केली धोकादायक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी, ‘स्टॉर्म शॅडो क्रूज’ ला रोखणे अशक्य
4
गृहकर्ज घेताय? 'या' सरकारी आणि खासगी बँका देत आहेत सर्वात स्वस्त दरात होम लोन; लगेच तपासा व्याजदर
5
"त्या वेळचे फोटो, व्हिडीओ पोलिसांनी परिवाराला दाखवले नाहीत..."; आमदार धस यांनी व्यक्त केला संशय
6
2016 चौकार...! एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक चौकार लगावणारे ७ फलंदाज, कितव्या क्रमांकावर रोहित आणि विराट?
7
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण; गुन्हा दाखल एकीकडे, आरोपी PSI बदने हजर दुसरीकडे!
8
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
9
इंग्लंड दौऱ्यानंतर गंभीर, आगरकरने काढलं संघाबाहेर, त्याच फलंदाजाने कुटल्या १७४ धावा, केली चौकार, षटकारांची बरसात
10
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
11
गुंतवणूकदारांना बंपर भेट! 'ही' आयटी कंपनी देणार प्रति शेअर १३० रुपये लाभांश; रेकॉर्ड डेट कधी? लगेच तपासा
12
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
13
"तो आनंदी होता, आम्ही ४० मिनिटं व्हिडीओ कॉलवर बोलला..."; लेकाच्या मृत्यूने वडिलांना धक्का
14
विमानातून उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका, ठुमके पाहून मलेशियाचे पंतप्रधानही चकित झाले; बघा Video
15
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
16
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
17
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
18
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
19
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
20
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?

बळीराजाची शोकांतिका

By अनिल लगड | Updated: February 7, 2019 19:51 IST

निवडणुका जवळ आल्या की शेतकऱ्यांचा राजकारण्यांना कळवळा येतो. परंतु निवडणुका संपल्या पाच वर्षात कधी शेतक-यांची आठवण येत नाही.

अनिल लगडअहमदनगर : निवडणुका जवळ आल्या की शेतकऱ्यांचा राजकारण्यांना कळवळा येतो. परंतु निवडणुका संपल्या पाच वर्षात कधी शेतक-यांची आठवण येत नाही. असे चक्र गेल्या ५० वर्षापासून चालत आले आहे. याला कोणताच राजकीय पक्ष अपवाद राहिलेला नाही. अनेक सरकारे आली अन् गेली. पण शेतकºयांच्या शेतीमालाचा प्रश्न कधी सुटला नाही.देशातल्या शेतक-याने आपल्या राज्यकर्त्यांचे काय घोडे मारले आहे हे कळत नाही. स्वातंत्र्यानंतर शेतक-यांनी देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी बनविले. परंतु आजपर्यंत शेतक-याला कोणी स्वावलंबी बनू शकले नाही, ही आपल्या देशातील खरी शोकांतिका आहे. एकीकडे आपला देश कृषिप्रधान आहे असे म्हणायचे शेतक-यांना मात्र वा-यावर सोडायचे अशीच स्थिती शेतक-यांची आहे. यंदा महाराष्टÑातील मराठवाड्यासह अर्धा महाराष्टÑ दुष्काळाने होरपळून निघत आहे. याला कारण यंदा कमी पाऊस पडला. मागील वर्षी शेतक-यांनी कांद्याला चांगला भाव असल्याने उत्पन्न घेतले. खरीप (उन्हाळी) कांद्याची साठवणूक केली. आज भाव येईल, उद्या भाव येईल असे म्हणून शेतक-यांचा कांदा चाळीतच सडून गेला. एकरी ५० हजार खर्च करुन कांद्यापोटी उत्पन्न शून्य झाले. यंदा कमी पावसावर शेतक-यांनी लाल कांद्याचे उत्पादन घेतले. परंतु त्यालाही भाव नसल्याने तोही शेतक-यांना मातीमोल भावाने विकावा लागला. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. अजूनही कांद्याला भाव नाही. आता लाल कांदा संपत आला आहे. खरीप कांदा बाजारात येणार आहे. परंतु खरीप कांदा फक्त सिंचन क्षेत्रात असलेल्या शेतक-यांकडेच आहे. दुष्काळी भागात तर यंदा पिकांचा प्रश्न राहिला नाही. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि जनावरे कसे जगवायची हा प्रश्न आहे. एकंदारीत दुष्काळी भागातील शेतक-यांची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची आणि गरीबीची बनली आहे. एसीत बसून गप्पा मारीत दिवसभर मोबाईल चाळीत बसणा-या कामचुकारांना सातवा वेतन आयोग. साधू संतांना, असंघटीत कामगारांना सरकारने नुकतीच पेन्शन जाहीर केली. मात्र उन्हातान्हात काम करणा-या शेतक-यांना फक्त ५०० रुपये महिना पेन्शन देऊन शेतक-यांची उपेक्षा आहे. आतापर्यंत सत्ता भोगणा-या आणि सध्या सत्ता भोगत असलेल्या भूमिपुत्रांनी आपल्या मनाला विचारुन बघावं की आपण खरोखरच शेतक-यांच्या औलादी आहोत का? यांच्या डोक्यात इतके दिवस बटाटे भरले होते का? असं म्हणणे देखील शेतक-यांशी इमान राखणा-या कांदा, बटाट्यांचा देखील अपमान आहे. फक्त शेतक-यांच्या जीवावर मोठे व्हायचे आणि त्याला पायदळी तुडवून वाºयावर सोडून द्यायचे हेच काम स्वातंत्र्यापासून भूमिपुत्रांनी केले म्हणून ही वेळ आज शेतक-यांवर आली आहे.शाब्बास भूमिपुत्रांनो! शेतीमालाचे भाव वाढले की, मीडियावाले धावलेच समजा. लगेच चॅनेलवर शहरातील महिलांच्या मुलाखती सुरू. पण, शहरातील नोकरदारांना सातवा वेतन आयोग दिसत नाही. परंतु शेतीमालाच्या किमती वाढल्या की लगेच त्यांची तळपायाची आग मस्तकाला. लगेच सरकारला वेठीस धरायचे. मीडियावाले लीपस्टीक, फेअर अँड लवली, मोबाईल, टीव्ही रिचार्ज, इंटरनेट डाटा, डोळ्यावर रेबन चष्मा याचे भाव वाढले तर कधी विचारत नाही. कारण ग्रामीण भागातील त्यांना कधी आस्थाच वाटत नाही. कधी तरी शेतकºयांच्या आत्महत्येची न्यूज दाखवत नाहीत. कारण या बातम्यांनी वृत्तपत्रांचा किंवा चॅनलचा टीआरपी वाढत नाही, हेच कारण बहुदा असावे. किमान मीडियाने तरी शेतक-यांच्या मागे ठामपणे उभे राहण्याची आज खरी गरज आहे. शेतकºयांनी माल पिकवायचा आणि त्याचा भाव मंत्री समिती, कृषिमूल्य आयोग, व्यापा-यांनी ठरवायचा? हा कोणता न्याय आहे. या कृषिमूल्य आयोगाला उत्पादन खर्चाबद्दल कोण माहिती देणार? देशातील कृषी विद्यापीठे ही कोणासाठी आहेत. त्यांनी फक्त पिकांवरच संशोधन करुन द्यायचे का? त्यांच्याकडून शेतक-यांच्या शेतीमालाच्या भावाबाबत संशोधन करुन याची यंत्रणा कशी विकसित करता येईल यासाठी या कृषी विद्यापीठांचा वापर करता येईल का? या कृषी विद्यापीठांकडून शेतीतील प्रत्येक पिकांबाबत एकरी उत्पादन खर्चाबाबत हिशोब काढला पाहिजे. हा हिशोब काढला पाहिजे. यात प्रत्येक विभागाचा विचार न करता गाववाईज विचार करावा. यासाठी तशी यंत्रणा विकसित करावी लागेल. जर अशीच उत्पादन खर्चाबाबत शेतक-यांची थट्टा चालू ठेवायची असेल तर ही कृषी विद्यापीठे बंदच केलेली बरी. कृषिमूल्य आयोग, त्यांना सल्ले देणारी कृषी विद्यापीठे आणि अकेलेचे तारे तोडणारे राजकारणी यांनी आता तरी जागे होणे गरजेचे आहे. आता मोर्चा, उपोषणे, निवेदने देऊनही उपयोग होत नाही. सरकारच्या घोषणाबाजीचाही शेतक-यांनाही काही फायदा होत नाही. शेतकरी संघटित झाल्याशिवाय हे शक्य होणार नाही. संघटित होऊनच शेतक-यांना लढा द्यावा लागेल, हे मात्र खरे. उत्पादन खर्च कमी करुन सेंद्रीय पध्दतीने उत्पादन घेणे गरजेचे आहे. विक्रीसाठी शेतक-यांनाही यातून मार्ग काढण्यासाठी स्वत:ची मार्केटिंग व्यवस्था उभी करणे गरजेचे आहे. नाहीतर शेतक-याच्या कांद्याच्या वांदे भविष्यातही सुरूच राहतील, यात शंका नाही. 

 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर