शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
3
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
4
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
5
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
6
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
7
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
8
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
9
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
10
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
11
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
12
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
13
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
14
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
15
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
16
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
17
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
18
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
19
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
20
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा

भाजीपाला महागला

By admin | Updated: September 4, 2024 12:10 IST

अहमदनगर : सध्या भाजीपाला बाजारात चांगलीच तेजी आहे़ पितृपंधरवाडा सुरू असल्याने पालेभाज्यांसह फळभाज्यांनाही मोठी मागणी आहे़

अहमदनगर : सध्या भाजीपाला बाजारात चांगलीच तेजी आहे़ पितृपंधरवाडा सुरू असल्याने पालेभाज्यांसह फळभाज्यांनाही मोठी मागणी आहे़ मागणीप्रमाणे बाजारात आवक होत नसल्याने भाजीपाल्याचे गेल्या पंधरा दिवसात २० ते ३० टक्यांनी दर वाढले आहेत़ पाच ते सात रुपयांना मिळणारी कोथंबिरीच्या जुडीसाठी २० ते २५ रुपये मोजावे लागत आहेत़ पितृपंधरवाड्यात मेथी, मुळा, आळू, गवार, भेंडी, कारली या भाज्यांचा पित्रजेवणात समावेश करण्यात येत असल्याने या भाज्यांना मोठी मागणी आहे़ जिल्ह्यात मध्यंतरी झालेल्या जोरदार पावसामुळे भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले़ शहरातील बाजारपेठेत जिल्ह्यातील विविध तालुक्यातून माल विक्रीला आणला जातो़ मात्र, उत्पादित माल कमी झाल्याने तालुक्याच्या बाजारपेठेतच शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला अपेक्षित दर मिळत आहे़ त्यामुळे वाहतूक खर्च टाळण्यासाठी नगरच्या बाजारपेठेत सध्या माल आणला जात नाही़ जो माल येतो तो अगदी कमी प्रमाणात आहे़ बाजारातून मात्र, भाजीपाल्याला मोठी मागणी आहे़ त्यामुळे ठोक व्यापाऱ्यांकडूनही जास्त दराने मालाची विक्री होते़ घाऊक व्यापाऱ्यांकडून ग्राहकांना माल विकताना पुन्हा नफा मिळविला जात असल्याने भाजीपाला चांगलाच कडाडला आहे़ गणपती विसर्जनानंतर पितृपंधरवाड्याला सुरुवात झाली़ दि़ २४ सप्टेंबरपर्यंत पितृपक्ष चालणार आहे़ पूर्वजांचे स्मरण करण्यासाठी घरोघरी पितृपक्षाची परंपरा जोपासली जाते़ पितरांसाठी केल्या जाणाऱ्या भोजनात मेथी, भेंड, मुळा, आळू, गवार, कारली आदी भाज्या बनविण्याची परंपरा आहे़ त्यामुळे या भाज्यांना सध्या सगळीकडेच मोठी मागणी आहे़ मागणीप्रमाणे आवक होत नसल्याने चांगलीच दरवाढ झाली असून, दोन भाज्या घ्यावयाच्या असेल तर किमान ५० रुपयांचा खर्च होतो़ त्यामुळे गृहिणींचे बजेट बिघडले आहे़ येणाऱ्या काळातही नवरात्र व दिवाळी सण असल्याने भाजीपाल्याचा बाजार असाच तेजीत राहण्याची शक्यता आहे़ (प्रतिनिधी)