शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

सरकारने दिलेल्या जमिनीसाठी वीरपत्नीचा ४६ वर्षांपासून लढा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 05:17 IST

भारत-पाकिस्तान युद्धात पती शहीद झालेल्या वीरपत्नीला सरकारने दिलेल्या जमिनीचा ४६ वर्षांनंतरही ताबा मिळालेला नसल्याचा संतापदायक प्रकार उघड झाला आहे.

- हेमंत आवारीअकोले (जि. अहमदनगर) - भारत-पाकिस्तान युद्धात पती शहीद झालेल्या वीरपत्नीला सरकारने दिलेल्या जमिनीचा ४६ वर्षांनंतरही ताबा मिळालेला नसल्याचा संतापदायक प्रकार उघड झाला आहे. दिल्लीपर्यंत खेटा मारल्या. पण, त्याचा फायदा झाला नाही, अशी खंत मालुंजकर कुटुंबीयांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.कोंडाजी लक्ष्मण मालुंजकर २ आॅक्टोबर १९६५ला शहीद झाले. त्यानंतर १९७२ला औरंगपूर गावात ग्रामपंचायत कार्यालयासमोर वीरचक्र देऊन लष्कराच्या वतीने कुटुंबीयांचा सुवर्णपदक देऊन सन्मान करण्यात आला. औरंगपूर शिवारातीलसर्व्हेनंबर ३६/१मधील दहा एकर म्हणजे ४ हेक्टर जमीन लहानबाई यांना सरकारने दिली. जमिनीचा सात बारा/आठ ‘अ’ उतारा लहानबाई कोंडाजी मालुंजकर यांच्या नावे आहे. पण ४६ वर्षांत शेत जमिनीचा ताबा त्यांना मिळालेला नाही. वनविभागाची ही जमीन सरकारने शहीद मालुंजकर कुटुंबाला दिली आहे. मात्र ही जमीन देण्यास गावकऱ्यांचा विरोध आहे, तसा ठराव ग्रामसभेने केल्याचे गावकरी सांगतात.कागदपत्रांची पूर्ण तपासणी करून हा प्रलंबित प्रश्न मार्गी लावू. सजगतेने हा प्रश्न हाताळून वेळ पडल्यास या कुटुंबास सरकारकडून संरक्षण देऊन जमिनीची मोजणी करून ताबा देऊ.- मुकेश कांबळे, तहसीलदार, अकोले.शहीद कोंडाजी मालुंजकर यांचा प्रश्न मला समजला असून याबाबत पूर्ण माहिती घेऊन तहसील प्रशासनाशी बोलून व गावकºयांशी संवाद साधून प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करू. कोंडाजी मालुंजकर यांच्याविषयी माझ्यासह सर्व तालुक्याला अभिमान असून शहीद जवानाच्या कुटुंबास न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू.- वैभव पिचड, आमदार, अकोले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर