शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

वैरण विकास योजना संशयाच्या भोवर्‍यात

By admin | Updated: July 20, 2023 08:57 IST

कोतूळ शेतकर्‍यांच्या दुग्ध विकास वाढीसाठी राबवलेल्या प्रकल्पाची अकोले कृषी विभागाने पुरती वाट लावली

मच्छिंद्र देशमुख   कोतूळ शेतकर्‍यांच्या दुग्ध विकास वाढीसाठी राबवलेल्या प्रकल्पाची अकोले कृषी विभागाने पुरती वाट लावली आहे. तालुक्यात कोतूळ व अकोले अशा दोन विभागांत ३२ लाख रुपयांच्या वैरण विकास प्रकल्पाचे १ हजार हेक्टर क्षेत्र दाखवून ही योजना म्हणजे फक्त कागदी घोड्याचा नाच असून, प्रत्यक्षात पूर्ण तालुक्यात १०० हेक्टरही क्षेत्र आढळत नाही. जानेवारी महिन्यात ‘लोकमत’ने वैरण विकास योजनेंतर्गत खत, बियाणे, झिंक सल्फेट यात सुमारे साडेतीन लाखांचा अपहार झाल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याचा पाठपुरावा करत ‘लोकमत’च्या हाती या योजनेची महत्त्वाची कागदपत्रे लागली असून, त्या आधारे ही योजना अधिकार्‍यांनी ‘हायजॅक’ केली असल्याचे दिसते. गेल्या तीन वर्षांपासून हा प्रकल्प दरवर्षी राबवण्यात येत आहे. यावर्षीच्या हंगामासाठी शासनाने सामूहिक व वैयक्तिक लाभार्थीसाठी जिल्हा यंत्रणेकडे बहुवर्षीय चारा ठोंबे व बियाणासाठी ज्वारी, मका, बाजरी, बरसीन यांचे बियाणे, तर नेपियर, यशवंत, जयवंत, बायफ १० या सुधारीत बहुवर्षीय गवताच्या जाती निवड करण्याची संधी दिली. अकोले कृषी विभागाने वैरणीचा ज्वारी वाण निवडला. मुळात अकोले तालुक्यात चारा पिकांसाठी ज्वारी अत्यल्प प्रमाणात पारंपरिक पद्धतीने पेरतात. यात वरीलपैकी कोणतेही चारा पिक घेतल्यास प्रति हेक्टरी ३२०० रुपयांप्रमाणे बियाणे, खत व इतर यांत्रीकी साहित्यासाठी मिळणार आहेत. त्यासाठी कमीत कमी ०.२० हेक्टर ते १ हेक्टर सलग क्षेत्रावर हे पिक असावे. लाभार्थ्याकडे २ ते ३ दुधाळ जनावरे असावीत, अशी आहे. त्यासाठी ५०० हेक्टर क्षेत्र मंडल कृषी अधिकार्‍यांकडे देण्यात आले. परंतु अकोले तालुक्यात कुठल्याही सलग क्षेत्रावर हे चारा पिक नाही. शेतकर्‍यांना मका, बाजरी ही चारा पिके आवश्यक अतसाना ज्वारी माथी मारली. ही ज्वारी ज्या शेतकर्‍यांच्या नावावर दाखवण्यात आली तेथे चार्‍याचे एक रोपही दिसत नाही. मग योजनेत आलेला युरीया कुठे गेला? शेतकर्‍यांना दिला तर चारा पिक नसताना बोगस कसा दिला? असे प्रश्न निर्माण होतात. गतीमान वैरण विकासासाठी अकोले तालुक्याच्या वाट्यास १०० हेक्टरसाठी जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे ३० टन ज्वारी बियाणे (रसिला एमएफएसएच-४), युरीया २००० गोणी, झिंक सल्फेट २० क्विंटल मिळाले. गेल्या दोन महिन्यांपासून ‘लोकमत’ने कृषी अधिकार्‍यांकडे या योजनेंतर्गत क्षेत्र दाखवा असे विचारले असता वेगवेगळ्या अधिकार्‍यांची वेगवेगळी उत्तरे मिळाली. योजनेचा एकही लाभार्थी दिसत नाही. कृषी विभाग मात्र पाणी नसल्याने चारा पिक वाळले व शेतकर्‍यांनी नांगरले, गारपिटीने गेले असे सांगत योजना माथी मारण्याचा बनाव करत आहे. मात्र प्रत्यक्ष प्लॉट दाखवण्यास त्यांनी सातत्याने टाळाटाळ केली आहे. खते व झिंक सल्फेट वाटून झाल्याचे कागद ते दाखवतात. मात्र कुणाला दिली, याबबात गोंधळ आहे. या घोटाळ्याची त्रयस्त यंत्रणेमार्फत चौकशीची मागणी शेतकर्‍यांतून होत आहे. (प्रतिनिधी)