शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
2
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
3
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
4
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
5
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
6
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
7
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
8
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
9
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
10
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
11
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
12
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...
13
४०% पार्ट्स होणार स्वस्त! सर्व्हिसिंगच्या बिलातही दिलासा; GST कपातीनंतर सोपा होणार कार-बाईकचा मेंटेनन्स
14
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
15
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
16
शुक्र गोचर २०२५: शुक्रादित्य राजयोग; 'या' ६ राशी हात लावतील तिथे सोनं करतील!
17
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
18
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
19
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
20
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...

वैरण विकास योजना संशयाच्या भोवर्‍यात

By admin | Updated: July 20, 2023 08:57 IST

कोतूळ शेतकर्‍यांच्या दुग्ध विकास वाढीसाठी राबवलेल्या प्रकल्पाची अकोले कृषी विभागाने पुरती वाट लावली

मच्छिंद्र देशमुख   कोतूळ शेतकर्‍यांच्या दुग्ध विकास वाढीसाठी राबवलेल्या प्रकल्पाची अकोले कृषी विभागाने पुरती वाट लावली आहे. तालुक्यात कोतूळ व अकोले अशा दोन विभागांत ३२ लाख रुपयांच्या वैरण विकास प्रकल्पाचे १ हजार हेक्टर क्षेत्र दाखवून ही योजना म्हणजे फक्त कागदी घोड्याचा नाच असून, प्रत्यक्षात पूर्ण तालुक्यात १०० हेक्टरही क्षेत्र आढळत नाही. जानेवारी महिन्यात ‘लोकमत’ने वैरण विकास योजनेंतर्गत खत, बियाणे, झिंक सल्फेट यात सुमारे साडेतीन लाखांचा अपहार झाल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याचा पाठपुरावा करत ‘लोकमत’च्या हाती या योजनेची महत्त्वाची कागदपत्रे लागली असून, त्या आधारे ही योजना अधिकार्‍यांनी ‘हायजॅक’ केली असल्याचे दिसते. गेल्या तीन वर्षांपासून हा प्रकल्प दरवर्षी राबवण्यात येत आहे. यावर्षीच्या हंगामासाठी शासनाने सामूहिक व वैयक्तिक लाभार्थीसाठी जिल्हा यंत्रणेकडे बहुवर्षीय चारा ठोंबे व बियाणासाठी ज्वारी, मका, बाजरी, बरसीन यांचे बियाणे, तर नेपियर, यशवंत, जयवंत, बायफ १० या सुधारीत बहुवर्षीय गवताच्या जाती निवड करण्याची संधी दिली. अकोले कृषी विभागाने वैरणीचा ज्वारी वाण निवडला. मुळात अकोले तालुक्यात चारा पिकांसाठी ज्वारी अत्यल्प प्रमाणात पारंपरिक पद्धतीने पेरतात. यात वरीलपैकी कोणतेही चारा पिक घेतल्यास प्रति हेक्टरी ३२०० रुपयांप्रमाणे बियाणे, खत व इतर यांत्रीकी साहित्यासाठी मिळणार आहेत. त्यासाठी कमीत कमी ०.२० हेक्टर ते १ हेक्टर सलग क्षेत्रावर हे पिक असावे. लाभार्थ्याकडे २ ते ३ दुधाळ जनावरे असावीत, अशी आहे. त्यासाठी ५०० हेक्टर क्षेत्र मंडल कृषी अधिकार्‍यांकडे देण्यात आले. परंतु अकोले तालुक्यात कुठल्याही सलग क्षेत्रावर हे चारा पिक नाही. शेतकर्‍यांना मका, बाजरी ही चारा पिके आवश्यक अतसाना ज्वारी माथी मारली. ही ज्वारी ज्या शेतकर्‍यांच्या नावावर दाखवण्यात आली तेथे चार्‍याचे एक रोपही दिसत नाही. मग योजनेत आलेला युरीया कुठे गेला? शेतकर्‍यांना दिला तर चारा पिक नसताना बोगस कसा दिला? असे प्रश्न निर्माण होतात. गतीमान वैरण विकासासाठी अकोले तालुक्याच्या वाट्यास १०० हेक्टरसाठी जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे ३० टन ज्वारी बियाणे (रसिला एमएफएसएच-४), युरीया २००० गोणी, झिंक सल्फेट २० क्विंटल मिळाले. गेल्या दोन महिन्यांपासून ‘लोकमत’ने कृषी अधिकार्‍यांकडे या योजनेंतर्गत क्षेत्र दाखवा असे विचारले असता वेगवेगळ्या अधिकार्‍यांची वेगवेगळी उत्तरे मिळाली. योजनेचा एकही लाभार्थी दिसत नाही. कृषी विभाग मात्र पाणी नसल्याने चारा पिक वाळले व शेतकर्‍यांनी नांगरले, गारपिटीने गेले असे सांगत योजना माथी मारण्याचा बनाव करत आहे. मात्र प्रत्यक्ष प्लॉट दाखवण्यास त्यांनी सातत्याने टाळाटाळ केली आहे. खते व झिंक सल्फेट वाटून झाल्याचे कागद ते दाखवतात. मात्र कुणाला दिली, याबबात गोंधळ आहे. या घोटाळ्याची त्रयस्त यंत्रणेमार्फत चौकशीची मागणी शेतकर्‍यांतून होत आहे. (प्रतिनिधी)