शहरं
Join us  
Trending Stories
1
"४ लाख महिलांवर गँगरेप, स्वत:च्याच लोकांवर बॉम्बस्फोट.."; UN मध्ये भारताने पाकिस्तानला फटकारलं
2
काँग्रेस अन् मविआला नव्या भिडूची गरज नाही; मनसेला सोबत घेण्यास हर्षवर्धन सपकाळांचा नकार
3
‘लाडकी बहीण’चा फटका; ‘आनंदाचा शिधा’ विसरा
4
'घरी ये ना गं...', वारंवार बोलवूनही पत्नी परत येईना; विरहाने कंटाळलेल्या शेतकरी पतीने उचललं टोकाचं पाऊल!
5
PPF बनेल रिटर्न मशीन, १ रुपयाही खर्च केल्याशिवाय दरवर्षी कमवाल ₹२.८८ लाखांचं व्याज; पाहा कमाईचं सिक्रेट
6
कफ सिरप मृत्यू प्रकरणात मध्य प्रदेशात डॉक्टरला अटक; IMA आक्रमक, थेट सरकारलाच दिला इशारा!
7
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; PSU Stocks मध्ये आजही खरेदी
8
'७ विमाने पाडली होती', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा जुनाच सूर लावला; भारत आणि पाकिस्तानबद्दल काय म्हणाले?
9
९.१ कोटी नोकऱ्यांची मोठी संधी, तीन नोकऱ्यांपैकी एक नोकरी या क्षेत्रातून येणार...
10
गाढ झोपेतच काळाने घातला घाला! ४ वर्षीय चिमुकलीसह मावशीचा सर्पदंशाने मृत्यू; डॉक्टर निलंबित
11
वर्गात मित्राला कसे मारायचे? ChatGPT वर एक प्रश्न विचारला; विद्यार्थ्याला तुरुंगात जावे लागले
12
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
13
संपादकीय: ...आता थेट मुकाबला ! आनंदाचा शिधा देणार नसले, तरी... 
14
दिवाळीत मोठ्या खरेदीसाठीसाठी 'क्रेडिट कार्ड'नं पैसे देणं योग्य आहे का?; 'या' गोष्टी लक्षात ठेवा
15
आजचे राशीभविष्य- ७ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस शुभ फलदायी, 'या' राशींची होणार भरभराट!
16
सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत कोर्ट सुरू असतानाच केला हल्ला 
17
कोणत्या नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी कोणते आरक्षण; सोडत निकाल वाचा एका क्लिकवर... 
18
बिहार विधानसभेचा बिगुल अखेर वाजला; दोन टप्प्यांत मतदान, तर १४ नोव्हेंबरला निकाल   
19
मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना मंजूर; निवडणूक प्रक्रियेला वेग, मतदार याद्यांची प्रतीक्षा 
20
२४७ नगरपरिषदांमध्ये १२५ नगराध्यक्षपदे महिलांसाठी; तर १४७ नगरपंचायतींमध्ये ७३ महिलांसाठी राखीव 

वंदन शूरवीरांना

By admin | Updated: December 16, 2015 23:10 IST

अहमदनगर : सन १९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धाचा ४४ वा विजय दिवस व या युद्धातील शहिदांना येथील आर्मर्ड कोअर सेंटर अ‍ॅण्ड स्कूलमध्ये अभिवादन करण्यात आले.

अहमदनगर : सन १९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धाचा ४४ वा विजय दिवस व या युद्धातील शहिदांना येथील आर्मर्ड कोअर सेंटर अ‍ॅण्ड स्कूलमध्ये अभिवादन करण्यात आले. ‘एसीसी अ‍ॅण्ड एस’चे मेजर जनरल प्रवीण दीक्षित यांच्यासह सेवानिवृत्त लष्करी अधिकारी व सैनिकांनी शहिदांना वंदन केले. नगरपासून ३ किमी अंतरावरील नगर-जामखेड रस्त्यावर ‘एसीसी अ‍ॅण्ड एस’चे मुख्यालय असून येथील कैवलरी युद्ध स्मारकावर बुधवारी हा सोहळा झाला. १६ डिसेंबर १९७१ या दिवशी भारतीय सैनिकांनी अथक परिश्रमाच्या बळावर बांगलादेश युद्धात पाकिस्तानवर विजय मिळवला. यात अनेक सैनिकांनी प्राणाची बाजी लावल्यानेच हा विजय सुकर झाला. सर्वप्रथम रिसालदार मेजर उदयभान, त्यानंतर निवृत्त लेफ्टनंट जनरल व्ही. के. सेवल, लेफ्टनंट जनरल एन. पोली, ‘एसीसी अ‍ॅण्ड एस’चे मेजर जनरल प्रवीण दीक्षित (विशिष्ट सेवा मेडल) यांनी वीर शहिदांना पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. जवानांसह उपस्थितांनीही या वीरांना नमन केले. (प्रतिनिधी) या युद्धात ‘एसीसी अ‍ॅण्ड एस’चे मोठे योगदान आहे. युद्धात एसीसीएसचे सेकंड लेफ्टनंट अरुण क्षेत्रपाल यांच्या मार्गदर्शनाखाली सैनिकांनी पश्चिम व पूर्व दिशेने कूच केले होते. आपल्या सैनिकांचे मनोधैर्य वाढवत त्यांनी शत्रूशी निडरपणे मुकाबला केला. यात त्यांना बलिदान द्यावे लागले. या साहसाबद्दल त्यांना परमवीर चक्राने गौरविण्यात आले. याशिवाय १५ महावीर चक्र, ६० वीरचक्र यासह अनेक शौर्यपदक एसीसीएसला बहाल करण्यात आले. या शहिदांच्या स्मृती जपण्यासाठी एसीसीएसमध्ये सेंच्युरियन टँक ठेवण्यात आला आहे, जो लेफ्टनंट क्षेत्रपाल यांच्या युद्धताफ्यात सहभागी होता. भारत-पाक युद्धाची पार्श्वभूमी पूर्वी पाकिस्तानचा हिस्सा असलेल्या बांगलादेशने स्वतंत्र देशाची मागणी केली. त्याला पाकिस्तानचा विरोध होता. स्वतंत्र बांगलादेशसाठी तेथील नागरिकांनी बंडाचे निशाण फडकावले. ते चिरडून टाकण्यासाठी पाकिस्तानने बांगलादेशवर अत्याचार करणे सुरू केले. त्यामुळे बांगलादेशात हाहाकार उडाला. अनेक बांगलादेशी जीवाच्या आकांताने भारतात घुसू लागले. त्यामुळे भारताने या कारवाईत हस्तक्षेप करत पाकिस्तानला आव्हान दिले. ३ ते १७डिसेंबर असे चौदा दिवस हे युद्ध सुरू होते. अखेर भारतासमोर हात टेकवत १६ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानी ले. जन. ए.ए.के. निमाजी यांनी आपल्या १३ हजार सैन्यानिशी भारतासमोर शरणागती पत्करली. एकीकडे भारताला विजय मिळाला, तर दुसरीकडे स्वतंत्र बांगलादेशचा जन्मही झाला.