शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

वंदन शूरवीरांना

By admin | Updated: December 16, 2015 23:10 IST

अहमदनगर : सन १९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धाचा ४४ वा विजय दिवस व या युद्धातील शहिदांना येथील आर्मर्ड कोअर सेंटर अ‍ॅण्ड स्कूलमध्ये अभिवादन करण्यात आले.

अहमदनगर : सन १९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धाचा ४४ वा विजय दिवस व या युद्धातील शहिदांना येथील आर्मर्ड कोअर सेंटर अ‍ॅण्ड स्कूलमध्ये अभिवादन करण्यात आले. ‘एसीसी अ‍ॅण्ड एस’चे मेजर जनरल प्रवीण दीक्षित यांच्यासह सेवानिवृत्त लष्करी अधिकारी व सैनिकांनी शहिदांना वंदन केले. नगरपासून ३ किमी अंतरावरील नगर-जामखेड रस्त्यावर ‘एसीसी अ‍ॅण्ड एस’चे मुख्यालय असून येथील कैवलरी युद्ध स्मारकावर बुधवारी हा सोहळा झाला. १६ डिसेंबर १९७१ या दिवशी भारतीय सैनिकांनी अथक परिश्रमाच्या बळावर बांगलादेश युद्धात पाकिस्तानवर विजय मिळवला. यात अनेक सैनिकांनी प्राणाची बाजी लावल्यानेच हा विजय सुकर झाला. सर्वप्रथम रिसालदार मेजर उदयभान, त्यानंतर निवृत्त लेफ्टनंट जनरल व्ही. के. सेवल, लेफ्टनंट जनरल एन. पोली, ‘एसीसी अ‍ॅण्ड एस’चे मेजर जनरल प्रवीण दीक्षित (विशिष्ट सेवा मेडल) यांनी वीर शहिदांना पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. जवानांसह उपस्थितांनीही या वीरांना नमन केले. (प्रतिनिधी) या युद्धात ‘एसीसी अ‍ॅण्ड एस’चे मोठे योगदान आहे. युद्धात एसीसीएसचे सेकंड लेफ्टनंट अरुण क्षेत्रपाल यांच्या मार्गदर्शनाखाली सैनिकांनी पश्चिम व पूर्व दिशेने कूच केले होते. आपल्या सैनिकांचे मनोधैर्य वाढवत त्यांनी शत्रूशी निडरपणे मुकाबला केला. यात त्यांना बलिदान द्यावे लागले. या साहसाबद्दल त्यांना परमवीर चक्राने गौरविण्यात आले. याशिवाय १५ महावीर चक्र, ६० वीरचक्र यासह अनेक शौर्यपदक एसीसीएसला बहाल करण्यात आले. या शहिदांच्या स्मृती जपण्यासाठी एसीसीएसमध्ये सेंच्युरियन टँक ठेवण्यात आला आहे, जो लेफ्टनंट क्षेत्रपाल यांच्या युद्धताफ्यात सहभागी होता. भारत-पाक युद्धाची पार्श्वभूमी पूर्वी पाकिस्तानचा हिस्सा असलेल्या बांगलादेशने स्वतंत्र देशाची मागणी केली. त्याला पाकिस्तानचा विरोध होता. स्वतंत्र बांगलादेशसाठी तेथील नागरिकांनी बंडाचे निशाण फडकावले. ते चिरडून टाकण्यासाठी पाकिस्तानने बांगलादेशवर अत्याचार करणे सुरू केले. त्यामुळे बांगलादेशात हाहाकार उडाला. अनेक बांगलादेशी जीवाच्या आकांताने भारतात घुसू लागले. त्यामुळे भारताने या कारवाईत हस्तक्षेप करत पाकिस्तानला आव्हान दिले. ३ ते १७डिसेंबर असे चौदा दिवस हे युद्ध सुरू होते. अखेर भारतासमोर हात टेकवत १६ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानी ले. जन. ए.ए.के. निमाजी यांनी आपल्या १३ हजार सैन्यानिशी भारतासमोर शरणागती पत्करली. एकीकडे भारताला विजय मिळाला, तर दुसरीकडे स्वतंत्र बांगलादेशचा जन्मही झाला.