शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

जपून वापरा पाणी अन्यथा संकट!

By admin | Updated: November 29, 2014 00:00 IST

अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजच पाणी टंचाई आ वासून उभी राहिली आहे. जिल्ह्यातील शहरी भाग मात्र तुलनेने पाणी टंचाईच्या तीव्र झळांपासून अद्याप दूर आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजच पाणी टंचाई आ वासून उभी राहिली आहे. जिल्ह्यातील शहरी भाग मात्र तुलनेने पाणी टंचाईच्या तीव्र झळांपासून अद्याप दूर आहे. कोपरगाव, शिर्डी, कर्जत, अकोले या शहरांसाठी तातडीने उपाययोजना आवश्यक आहेत. अहमदनगर, श्रीरामपूर, संगमनेर, श्रीगोंदा या शहरातील नागरिकांना आज पाण्याच्या संकटाला तोंड द्यावे लागत नाही. मात्र पाणी जपून वापरले नाही, तर ही स्थिती कायम राहील, याची शाश्वती नाही. नगर शहरातील उपनगरे मात्र आजच पाण्यासाठी कासावीस आहेत. पावसाचे प्रमाण कमी असल्याने जिल्हा पुन्हा एकदा दुष्काळाच्या तोंडावर आहे. शहरी नागरिकांनी ‘पाणी वापरावे जपून’ हा मंत्र अंगीकारणेच अधिक योग्य ठरेल. ‘मुळा’त मुबलक साठा... : ‘मे’पर्यंत निवांत अहमदनगर : मुळा धरणात यंदा मुबलक पाणी साठा असल्याने नगर शहरातील पाणी पुरवठ्याची चिंता महापालिकेला नाही. धरणातील पाणी पातळी १७५२ फुटांच्या खाली गेल्यानंतरच शहर पाणी उपसा योजनेला घरघर लागण्यास सुरूवात होते. मात्र ही पातळी अजून ३ हजार फूट उंचीवर आहे. मे २०१५ पर्यंत तरी शहराच्या पाण्याची चिंता नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. ‘मुळा’ धरणातील पाण्यावर शहराची तहान भागविली जाते. १९७३,१९८६,१९९७ आणि आता २००८ मध्ये १२४ कोटी रुपयांची पाणी योजना राबविण्यात आली. शहरासाठी राबविण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेतून लगतच्या ९ ग्रामपंचायतींना पाणी दिले जाते. शहरापासून मुळा धरण ३५ किमी अंतरावर असून तेथून शहराला पाणी पुरवठा होतो. शहराची लोकसंख्या चार लाखाच्या आसपास पोहचली आहे.शहरातील या लोकसंख्येची तहान भागविण्यासाठी ६२ दशलक्ष लीटर पाणी रोज लागते. धरणातून पाणी नगरपर्यत पोहचताना गळती होऊन प्रत्यक्षात ५२ दशलक्ष लीटर पाणी वितरण होते. मुळा धरणातील पाणी पातळी खालावली की शहराच्या पाणी पुरवठ्यावर त्याचा परिणाम होतो. यंदा मुळा धरणात मुबलक पाणी साठा आहे. धरणातील पाण्याची पातळी २ हजार फुटापेक्षाही अधिक आहे. १७५२ फुटाच्या खाली पाणी पातळी जाण्यास मे तरी उजाडेल असा महापालिका प्रशासनाचा अंदाज आहे.