शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
5
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
6
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
7
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
8
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
9
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
10
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
11
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
12
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
13
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
14
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
15
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
16
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

पाण्यासाठी रस्सीखेच सुरूच

By admin | Updated: June 27, 2023 10:38 IST

अहमदनगर: मुळा धरणातून शेतीसाठी अपेक्षेपेक्षा उशिराने अवर्तन सुटल्यामुळे पाणी वाटपाचे नियोजन कोलमडले आहे़

अहमदनगर: मुळा धरणातून शेतीसाठी अपेक्षेपेक्षा उशिराने अवर्तन सुटल्यामुळे पाणी वाटपाचे नियोजन कोलमडले आहे़ उन्हाचा पारा चढल्याने पिके करपली असून, पाण्यावर शेतकर्‍यांच्या अक्षरशा उड्या पडल्या असून, पाण्यासाठी मोठी रस्सीखेच लाभ क्षेत्रात सुरू आहे़ त्यामुळे प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे़ मुळा धरणातून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आवर्तन सोडण्याचे ठरले होते़ परंतु आवर्तनाला परवानगी मिळाली नाही़ त्यात लोकसभा निवडणुकही जाहीर झाली़ त्यामुळे पाणी सोडण्यास विलंब झाला़ एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात सुटले़ तोपर्यंत उन्हाळी पिकांनी माना टाकल्या होत्या. पाणी घेण्यासाठी सर्वच शेतकरी सरसावले असले तरी शेवटच्या टोकाचा पहिला माऩ त्यामुळे सर्वांची अडचण झाली़ शेवटच्या टोकापासून पाण्याचे वाटप करावे, असे संकेत आहेत़ मात्र पहिले कोण असा प्रश्न उपस्थित करत शेतकर्‍यांनी मध्येच पाणी घेण्यास सुरुवात केली़ शेतकर्‍यांची भूमिका रास्त आहे़ परंतु एकाच वेळी सर्वांना पाणी कसे देणार असा प्रश्न प्रशासनासमोर होता़ त्यामुळे अखेर प्रशासनाने सर्वच दरवाजे उघडे करून दिले असून, एक ना धड भाराभर चिंध्या अशी अवस्था झाली आहे़ प्रशासनाचे नियोजनही योग्यच होते़ त्यानुसार उशिर होणार असल्याने शेतकर्‍यांनी अक्रमक भूमिका घेतली़ सुरुवातीला टेलच्या परिसरात पाणी सोडण्याचा प्रयोग झाला़ पण किती दिवस थांबायचे पिके गेल्यानंतर पाणी मिळाले तर त्याचा उपयोग काय असा प्रश्न शेतकर्‍यांचा आहे़ काहींनी तर चोरी करून पाणी घेतले़ पाणी चोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत़ पाणी वाटपात असमतोल होत असल्याने अखेर सर्वांनाच पाणी सोडण्यात आले आहे़ यातही पाणी घेण्यासाठी शेतकर्‍यांत चढाओळ सुरू असून, पाणी वापर संस्था व प्रशासनाला पाणी वाटप करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे़ कमी वेगाने पाणी सोडल्याने शेतकर्‍यांमध्ये नाराजीचा सूर आहे़ मात्र सर्वांना पाणी मिळेल, याची खात्री प्रशासनाकडून दिली जात असून, अवर्तनात आणखी काही दिवसांची वाढ करावी लागणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले़ (प्रतिनिधी) लाभ क्षेत्रातील ६० टक्के भरणे पूर्ण मुळा धरणातून आत्तापर्यंत २ हजार ६०० दशलक्ष घनफुट पाणी शेतीसाठी सोडण्यात आले आहे़ लाभ क्षेत्रातील नेवासा, पाथर्डी आणि शेवगाव परिसरातील ६० टक्के क्षेत्र ओलीताखाली आहे़ उर्वरित क्षेत्रासाठी पाणी मिळणार असून, आवर्तन आणखी १५ दिवस चालणार आहे़ पाणी आणखी पंधरा दिवस राहणार आवर्तन सोडण्यास विलंब झाला़ त्यामुळे पिके करपली आहेत़ आहे त्या पाण्यात भरणे काढणे शक्य नाही़ पाणी वाटप यंत्रणेवर ताण आला असून, आवर्तन आणखी पंधरा दिवस सुरू राहणार आहे़ अधिकार्‍यांचा खडा पहारा उन्हाळी आवर्तन असल्याने चोरून पाणी घेणार्‍यांची संख्या अधिक आहे़ मोटारी व पाईप टाकून पाणी घेतले जात असल्याने खाली पाणी पोहोचत नाही़ पाण्याची चोरी रोखण्यासाठी अधिकारी व पाणी वापर संस्थांच्या पदाधिकार्‍यांचा खडा पाहारा सुरू आहे़ पाणी वाटपाबाबत कार्यकारी अभियंत्यांशी संपर्क साधला असता पाणी वाटपात शेतकर्‍यांच्या सहकार्याची गरज आहे़ पाणी सोडण्यास आधीच उशिर झाला़ त्यात पाट फुटला, त्यामुळे आणखी उशिर झाला़ पण शेतकर्‍यांनी सहकार्य केल्यास योग्य नियोजन करणे शक्य होईल आणि सर्वांना पुरेसे पाणी मिळेल़ - आनंद वडार, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे