शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

पाण्यासाठी रस्सीखेच सुरूच

By admin | Updated: June 27, 2023 10:38 IST

अहमदनगर: मुळा धरणातून शेतीसाठी अपेक्षेपेक्षा उशिराने अवर्तन सुटल्यामुळे पाणी वाटपाचे नियोजन कोलमडले आहे़

अहमदनगर: मुळा धरणातून शेतीसाठी अपेक्षेपेक्षा उशिराने अवर्तन सुटल्यामुळे पाणी वाटपाचे नियोजन कोलमडले आहे़ उन्हाचा पारा चढल्याने पिके करपली असून, पाण्यावर शेतकर्‍यांच्या अक्षरशा उड्या पडल्या असून, पाण्यासाठी मोठी रस्सीखेच लाभ क्षेत्रात सुरू आहे़ त्यामुळे प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे़ मुळा धरणातून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आवर्तन सोडण्याचे ठरले होते़ परंतु आवर्तनाला परवानगी मिळाली नाही़ त्यात लोकसभा निवडणुकही जाहीर झाली़ त्यामुळे पाणी सोडण्यास विलंब झाला़ एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात सुटले़ तोपर्यंत उन्हाळी पिकांनी माना टाकल्या होत्या. पाणी घेण्यासाठी सर्वच शेतकरी सरसावले असले तरी शेवटच्या टोकाचा पहिला माऩ त्यामुळे सर्वांची अडचण झाली़ शेवटच्या टोकापासून पाण्याचे वाटप करावे, असे संकेत आहेत़ मात्र पहिले कोण असा प्रश्न उपस्थित करत शेतकर्‍यांनी मध्येच पाणी घेण्यास सुरुवात केली़ शेतकर्‍यांची भूमिका रास्त आहे़ परंतु एकाच वेळी सर्वांना पाणी कसे देणार असा प्रश्न प्रशासनासमोर होता़ त्यामुळे अखेर प्रशासनाने सर्वच दरवाजे उघडे करून दिले असून, एक ना धड भाराभर चिंध्या अशी अवस्था झाली आहे़ प्रशासनाचे नियोजनही योग्यच होते़ त्यानुसार उशिर होणार असल्याने शेतकर्‍यांनी अक्रमक भूमिका घेतली़ सुरुवातीला टेलच्या परिसरात पाणी सोडण्याचा प्रयोग झाला़ पण किती दिवस थांबायचे पिके गेल्यानंतर पाणी मिळाले तर त्याचा उपयोग काय असा प्रश्न शेतकर्‍यांचा आहे़ काहींनी तर चोरी करून पाणी घेतले़ पाणी चोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत़ पाणी वाटपात असमतोल होत असल्याने अखेर सर्वांनाच पाणी सोडण्यात आले आहे़ यातही पाणी घेण्यासाठी शेतकर्‍यांत चढाओळ सुरू असून, पाणी वापर संस्था व प्रशासनाला पाणी वाटप करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे़ कमी वेगाने पाणी सोडल्याने शेतकर्‍यांमध्ये नाराजीचा सूर आहे़ मात्र सर्वांना पाणी मिळेल, याची खात्री प्रशासनाकडून दिली जात असून, अवर्तनात आणखी काही दिवसांची वाढ करावी लागणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले़ (प्रतिनिधी) लाभ क्षेत्रातील ६० टक्के भरणे पूर्ण मुळा धरणातून आत्तापर्यंत २ हजार ६०० दशलक्ष घनफुट पाणी शेतीसाठी सोडण्यात आले आहे़ लाभ क्षेत्रातील नेवासा, पाथर्डी आणि शेवगाव परिसरातील ६० टक्के क्षेत्र ओलीताखाली आहे़ उर्वरित क्षेत्रासाठी पाणी मिळणार असून, आवर्तन आणखी १५ दिवस चालणार आहे़ पाणी आणखी पंधरा दिवस राहणार आवर्तन सोडण्यास विलंब झाला़ त्यामुळे पिके करपली आहेत़ आहे त्या पाण्यात भरणे काढणे शक्य नाही़ पाणी वाटप यंत्रणेवर ताण आला असून, आवर्तन आणखी पंधरा दिवस सुरू राहणार आहे़ अधिकार्‍यांचा खडा पहारा उन्हाळी आवर्तन असल्याने चोरून पाणी घेणार्‍यांची संख्या अधिक आहे़ मोटारी व पाईप टाकून पाणी घेतले जात असल्याने खाली पाणी पोहोचत नाही़ पाण्याची चोरी रोखण्यासाठी अधिकारी व पाणी वापर संस्थांच्या पदाधिकार्‍यांचा खडा पाहारा सुरू आहे़ पाणी वाटपाबाबत कार्यकारी अभियंत्यांशी संपर्क साधला असता पाणी वाटपात शेतकर्‍यांच्या सहकार्याची गरज आहे़ पाणी सोडण्यास आधीच उशिर झाला़ त्यात पाट फुटला, त्यामुळे आणखी उशिर झाला़ पण शेतकर्‍यांनी सहकार्य केल्यास योग्य नियोजन करणे शक्य होईल आणि सर्वांना पुरेसे पाणी मिळेल़ - आनंद वडार, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे