शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

‘साकळाई’ चा तातडीने सर्व्हे करा : मुख्यमंत्र्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 11:26 IST

नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील जिरायत भागासाठी वरदान ठरणारी साकळाई उपसा जलसिंचन योजनेबाबत मोठे जनआंदोलन उभे राहिले आहे.

ठळक मुद्देसर्व्हे आणि अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेशसाकळाई प्रश्नी कृती समितीची मुख्यमंत्र्यांसंवेत मंत्रालयात बैठक

केडगाव : नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील जिरायत भागासाठी वरदान ठरणारी साकळाई उपसा जलसिंचन योजनेबाबत मोठे जनआंदोलन उभे राहिले आहे. ठिकठिकाणी रास्तारोको आंदोलन सुरु आहेत. याप्रश्नी डॉ.सुजय विखे यांनी लक्ष घातले असून त्यांनी समितीच्या लोकांसमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी तातडीने सर्व्हे आणि अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधितांना दिले. साकळाई योजनेसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी सकारात्कता दर्शविल्याने लाभधारक शेतक-यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.साकळाई उपसा जलसिंचन योजना मार्गी लागण्यासाठी नगर व श्रीगोंदा तालुक्यातील लाभधारक शेतक-यांनी लढा उभारला आहे. साकळाई उपसा जलसिंचन योजनेसाठी रुई छत्तीशी आणि चिखली या ठिकाणी कृती समितीच्यावतीने वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलना डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासह खासदार दिलीप गांधी, आमदार राहुल जगताप, लाभ धारक शेतकरी सहभागी झाले होते. साकळाई योजन मार्गी लागण्यासाठी कृती समिती व मुख्यंत्र्यांची बैठक लवकरच घडवून आणण्याचे आश्वासन विखे यांनी दिले होते. त्यानुसार डॉ. विखे पाटील यांनी मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन साकळाई कृती समिती व मुख्यंत्र्यांची बैठक घडवून आणली. यावेळी साकळाई कृती समितीच्या वतीने मुख्यंत्र्यांना निवेदन देवून सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी डॉ. सुजय विखे पाटील, बाळासाहेब हराळ, रविंद्र भापकर, ज्येष्ठ साजसेवक राजाराम भापकर, नारायण रोडे, राहिदास उदमले, सोमनाथ धाडगे, सुरेश काटे, प्रताप नलगे, राजाराम लोटके, हेंमत नलगे, बाळासाहेब नलगे, नितीन दुबल, विश्वास थोरात, बाबा महाराज झेंडे उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री यांनी या योजनेची बारकाईने माहिती घेतली. या योजनेबाबत सकारात्मकता दर्शवित तातडीने सर्व्हे करण्याचा आणि अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश दिले.खुद्द मुख्यमंत्रांनीच साखळाई योजनेबाबत सकारात्मकता दर्शविल्याने नगर श्रीगोंदा भागातील जनतेच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.पाचपुतेंनीही दिले निवेदनसाकळाई योजनेच्या पुर्ततेसाठी शनिवारीच आंदोलन झाले. यात खासदार दिलीप गांधी, सुजय विखे, दिपाली सय्यद यांनी मुख्यमंत्र्यासंमवेत बैठक आयोजीत करण्याचे आश्वासन दिले होेते. दिपाली सय्यद यांनी तर मुख्यमंत्र्याची २६ फेब्रुवारीला वेळ घेतली होती. मात्र सुजय विखे यांनी आज सर्वात आधी मुख्यमंत्र्याना गाठत त्यांच्या समवेत साकळाई साठी बैठक घेतली. माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनीही स्वतंत्रपणे मुख्यमंत्र्याना साकळाईसाठी निवेदन दिले. यावेळी जलसंपदामंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री राम शिंदे, आमदार शिवाजी कर्डिले उपस्थित होते.साकळाई उपसा जलसिंचन योजनेसाठी लाभधारक शेतक-यांनी लढा उभारला आहे. पहिले पाऊल यशस्वी झाले आहे. अंदाजपत्रक तयार झाल्यावर या योजनेसाठी केंद्र व राज्य सरकारच्या निधीची आवश्यकता आहे. केंद्र सरकारकडे निधीसाठी जाण्या अगोदर राज्य सरकारची परवानगी असणे आवश्यक आहे. राज्य सरकारने प्राथकि मंजुरी दिली असल्याने योजना मार्गी लागण्या बाबात आशादायक चित्र निर्माण झाले आहे . - डॉ . सुजय विखे 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर