शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिर्डीत बेघरांसाठी प्रशासनाकडून अद्यावत निवारागृह; अन्न, वस्त्र, निवारा व वैद्यकीय सुविधा उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 20:09 IST

स्थलांतरीत कामगार व बेघर व्यक्तींसाठी  प्रशासनाने निघोज येथील निसर्गरम्य परिसर असलेल्या साई पालखी निवारा येथे निवारागृह सुरू केले आहे. सोमवारी (३० मार्च) सायंकाळपर्यंत या निवा-यात ६२ जणांना पाठविण्यात आल्याचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी सांगितले.

शिर्डी : स्थलांतरीत कामगार व बेघर व्यक्तींसाठी  प्रशासनाने  निघोज येथील निसर्गरम्य परिसर असलेल्या साई पालखी निवारा येथे निवारागृह सुरू केले आहे. सोमवारी (३० मार्च) सायंकाळपर्यंत या निवा-यात ६२ जणांना पाठविण्यात आल्याचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी सांगितले.    लॉकडाऊनमुळे  शिर्डी शहर परिसरात अडकलेल्या, स्थलांतरीत कामगार व बेघर व्यक्ती यांना अन्न, वस्त्र, निवारा व वैद्यकीय देखभाल या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. शिर्डीत बेघर, बेरोजगार कामगार, कचरा वेचक, भिक्षेकरी आदी गरजुंना संस्थानकडून बसस्थानकात दोन वेळचे जेवण देण्यात येत होते. मात्र या कामगारांच्या स्वच्छतागृहांचा व व्यक्तीगत स्वच्छतेचाही प्रश्न होता. यामुळे सार्वजनिक आरोग्यही धोक्यात येणाची शक्यता होती़ चार दिवसात येथे जेवणारांची संख्या पंधरा वरून चारशेवर पोहचली होती.    या पार्श्वभूमीवर चिंतीत झालेल्या प्रांताधिकारी गोविंद शिंद ेयांनी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे, तहसीलदार कुंदन हिरे, नगरपंचायत मुख्याधिकारी सतिष दिघे, प्रसादालय प्रमुख विष्णू थोरात यांच्याशी विचारविनीमय करून या बेघर लोकांना बंदिस्त जागेत ठेवून सुविधा पुरविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी साईपालखी निवारा यांच्या व्यवस्थापनाला विनंती करण्यात आली.  आजवर पायी येणा-या पदयात्रींना विनामूल्य भोजन व निवास व्यवस्था पुरवणारा साई पालखी निवारा व्यवस्थापनाने मानवतेच्या भावनेतून सहर्ष अनुमती दिली. येथे या लोकांची उत्तम व्यवस्था होणार आहे. मात्र  त्यांना प्रशासनाच्या अनुमतीशिवाय बाहेर पडता येणार नाही. या लोकांना ठेवण्यासाठी संस्थेचे दोन मोठे हॉल अधिगृहीत करण्यात आले आहेत. यामुळे लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी होणार आहे.बेघर व स्थलांतरीत होत असलेल्या लोकांना येथे ठेवण्यात येणार आहे. साईबाबा संस्थान येथे दोन वेळचे जेवण पुरविणार आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाने ६२जणांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना या निवारा केंद्रात दाखल केल्याचे राहात्याचे तहसीलदार कुंदन हिरे यांनी सांगितले. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डीcorona virusकोरोना वायरस बातम्या