शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
2
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
3
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
4
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
5
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
6
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
7
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
8
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
9
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
10
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
11
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
12
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
13
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
14
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
15
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
16
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
17
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
18
नालासोपारा हादरलं! प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या; मृतदेह घरातच पुरला अन् वर...
19
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
20
केरळचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ माकप नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचं निधन, वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

तोट्या नसलेले नळ... छिद्र पडलेल्या वाहिन्या

By admin | Updated: October 29, 2014 23:57 IST

अहमदनगर : तोट्या नसलेले नळ... छिद्र पडलेल्या जलवाहिन्या.... जागोजागी जलवाहिन्याखाली धुतले जाणारे कपडे.... जलवाहिन्यांना लागलेली गळती...ओव्हरफ्लो होणारे हौद... अशी दृष्ये नगरमध्ये जागोजागी दिसत आहेत.

अहमदनगर : तोट्या नसलेले नळ... छिद्र पडलेल्या जलवाहिन्या.... जागोजागी जलवाहिन्याखाली धुतले जाणारे कपडे.... जलवाहिन्यांना लागलेली गळती...ओव्हरफ्लो होणारे हौद... अशी दृष्ये नगरमध्ये जागोजागी दिसत आहेत. बदलत्या हवामानामुळे कमी झालेल्या पावसामुळे एकीकडे धरणं भरण्याची चिंता असताना दुसरीकडे मात्र आहे त्या पाण्याचा अपव्यय होत आहे.गुरुवारी (दि.३०) जागतिक काटकसर दिन आहे. पाण्याची काटकसर आता काळाची गरज बनली आहे. आगामी युद्ध पाण्यावरच होईल, अशी भाकिते तज्ज्ञांनी वर्तविली आहेत. पाण्याचा थेंब आणि थेंब वाचविण्याचा हिवरेबाजारचा प्रयोग देशाला पथदर्शी ठरला आहे. मात्र हिवरेबाजारपासून जवळच असलेल्या नगर शहरात मात्र पाण्याचा अपव्यय होतो आहे. मुळा धरणातून शहराला पिण्याचा पाण्याचा पुरवठा केला जातो. ३५ वर्षांपूर्वीची जलवाहिनी असल्याने तिला अनेक ठिकाणी गळती लागली आहे. या गळतीमध्येच १५ ते २० दशलक्ष लीटर पाण्याची दररोज नासाडी होत आहे. जलवाहिनीला असलेली गळती रोखण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. शहरातील पाणी वितरण व्यवस्था अत्यंत जुनी आहे. त्यामुळे पाण्याची गळती मोठ्या प्रमाणावर आहे. नगरोत्थान योजनेतील पाणी वितरण व्यवस्था सदोष आणि अपूर्ण असल्याने पाण्याची गळती रोखण्यात महापालिका प्रशासनाला अद्याप अपयशच आल्याचे ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यावरून दिसते आहे.शहरात तोट्या नसलेल्या नळांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. यामुळे लाखो लीटर पाणी रस्त्यावरून गटारीत जाते आहे. फुटक्या जलवाहिन्यांमुळे नागरिक जलवाहिनीखाली कपडे धूत आहेत. अनेक ठिकाणचे कारंजे उडत असून त्याद्वारेही पाणी वाया जात आहे. हे वाया जाणारे पाणी रोखण्याची गरज आहे.शहरात सध्या दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे एकप्रकारे पाण्याची बचतच केली जात आहे. दिवसाआड पाणी पुरवठा होत असला तरी नळाला तोट्या नसल्याने पाणी वाया जात आहे. त्यावर आगामी काळात कारवाई केली जाईल,असे मनपाचे पाणी पुरवठा विभागाचे अभियंता परिमल निकम यांनी सांगितले. (प्रतिनिधी)