शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
2
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
3
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
4
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
5
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
6
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
7
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
8
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
9
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
10
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
11
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
12
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
13
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
14
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
15
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
16
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
17
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
18
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
19
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रात वर्णी लागल्याशिवाय राज्यात मंत्रिपद नको

By admin | Updated: June 2, 2016 23:09 IST

संगमनेर : महाराष्ट्रात भाजपा-शिवसेना व मित्र पक्षांशी आमची युती निवडणुकांपुरती आहे. राज्यात मंत्रिपद मिळावे म्हणून कार्यकर्त्यांचा आग्रह आहे.

संगमनेर : महाराष्ट्रात भाजपा-शिवसेना व मित्र पक्षांशी आमची युती निवडणुकांपुरती आहे. राज्यात मंत्रिपद मिळावे म्हणून कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. आपण मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहोत. काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा निश्चित चांगले मिळेल. मंत्रिमंडळ विस्तारात एक मंत्री आरपीआयचा असेल. पण, केंद्रात वर्णी लागल्याशिवाय पक्ष राज्यात मंत्रीपद स्विकारणार नाही, अशी सडेतोड भूमिका आरपीआयचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी जाहीर केली. नाशिकला जाताना शासकीय विश्रामगृहावर आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आरपीआयचे राज्य सचिव विजय वाक्चौरे, श्रीकांत भालेराव, अशोक गायकवाड, जिल्हाध्यक्ष दीपक गायकवाड, चांगदेव जगताप आदी उपस्थित होते. यावेळी आठवले म्हणाले, विधानपरिषदेची जागा आम्ही स्वत:हून घेतली नाही. अजून मित्र पक्षांना कुणालाही काही मिळाले नाही. आम्हाला दिलेली आश्वासने आधी पाळा. भाजपा-शिवसेनेत दरी निर्माण होत असल्याने परवा अंधेरीला आम्ही एकत्र आलो. यापुढे भांडणे न करता एकोप्याने राहण्याचा निर्णय झाला आहे. भांडत राहिलो तर २०१९ च्या निवडणूकीत जनता आपल्याला माफ करणार नाही. केवळ दलितच नव्हे तर दलित व सवर्णांना बरोबर घेण्याची आरपीआयची भूमिका आहे. ‘शायनिंग’ मारणाऱ्यांच्या हाती नव्हे तर समाजात लोकप्रिय असलेल्या कार्यकर्त्यांकडे पक्षाचे नेतृत्व दिले पाहीजे. जिल्हा परिषद व पंचायत समितीत काँग्रेस-राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे. या निवडणुकीत मित्र पक्षांच्या भरवशावर अवलंबून न राहता आरपीआयने उमेदवार निवडून आणण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. आम्ही सर्वजण एकत्र येवून लढलो तर यश नक्की मिळेल. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळाले पाहिजे. त्याला आमचा विरोध नाही.रेणके अहवालाप्रमाणे १० टक्के ‘हूमांतू’ समाजाला आरक्षण मिळू शकते. एकूण ५२ टक्के लोकांना २७ टक्के आरक्षण मिळाले आहे. राहिलेल्या ५० टक्यांमध्ये १० टक्के धनगरांनाही ते मिळावे, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आठवले यांनी सांगितले. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर झालेले आरोप हे केवळ बदनामी करण्याच्या हेतूने केले आहेत. ‘दाऊद’चे खडसे यांच्याबरोबर संबंध असतील, असे वाटत नाही. मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यासाठी खडसेंनी राजीनामा देण्याची गरज नाही, असे आठवले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)अहमदनगर जिल्हा नेहमी आरपीआयच्या पाठीशी उभा राहिला आहे. मुख्यमंत्र्यांकडून चांगल्या अपेक्षा आहेत. नगर जिल्ह्याला एखादे महामंडळ मिळेल, असे सूतोवाच खा.रामदास आठवले यांनी करताच आरपीआय कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. शिर्डी लोकसभा निवडणुकीत इथल्या लोकांनी माझी वाट अडविली. माझ्या पराभवाला फक्त बाळासाहेब विखे एकटेच नाहीत, तर इथले काँग्रेसचे दोन्ही नेते जबाबदार आहेत. प्रचार यंत्रणा काँग्रेस नेत्यांकडे होती. विषारी प्रचार झाल्याने आपण हरलो. स्वतंत्र यंत्रणा असती तर चित्र वेगळे दिसले असते. भविष्यात संधी मिळाली तर ‘सोनार बंगला’ प्रमाणे ‘सोनार शिर्डी’ म्हणजेच सोन्याची शिर्डी केल्याशिवाय राहणार नाही. - खासदार रामदास आठवले, अध्यक्ष आरपीआय