शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

जामखेड येथील दुहेरी हत्याकांड खटल्यात उमेशचंद्र यादव यांची नियुक्ती, राजकीय वैमनस्यातून झाली होती दोघांची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 21:28 IST

अहमदनगर : जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात राजकीय वैमनस्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते योगेश राळेभात आणि राकेश राळेभात या युवकांची भरदिवसा पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या झाली होती. या दुहेरी हत्याकांड खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून राज्य शासनाने अ‍ॅड. उमेशचंद्र यादव पाटील यांची नियुक्ती केली आहे. 

अहमदनगर : जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात राजकीय वैमनस्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते योगेश राळेभात आणि राकेश राळेभात या युवकांची भरदिवसा पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या झाली होती. या दुहेरी हत्याकांड खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून राज्य शासनाने अ‍ॅड. उमेशचंद्र यादव पाटील यांची नियुक्ती केली आहे. उल्हास माने यांच्या तालिमीतील काही मुले आणि मयत योगेश आणि राकेश यांचा वाद झाला होता. या वादातून जामखेड शहरात २८ एप्रिल २०१८ मध्ये दुहेरी हत्याकांड झाले होते. पोलिसांच्या म्हणण्याप्रमाणे, उल्हास माने, त्याचा बंधू, दत्ता ऊर्फ स्वामी गायकवाड या सर्वांनी इतर आरोपींच्या सहाय्याने या दुहेरी खुनाचा कट रचला. त्यानंतर पिस्तुलातून गोळ्या झाडून दोघांची निर्घृण हत्या केली होती. या दुहेरी हत्याकांडातील आरोपी असलेल्या माने बंधूंनी जामीन मिळविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत दाद मागितली होती. या घटनेचे स्वरूप अणि माने बंधू यांचा गुन्ह्यातील सहभाग पाहून सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने या खटल्याची सुनावणी एक वर्षाच्या आत निकाली करण्यासंबंधी निर्देश दिले आहेत. 

या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून राज्य शासनाने प्रसिद्ध वकील उमेशचंद्र यादव-पाटील यांची नियुक्ती केली आहे. या संबंधीची अधिसूचना नुकतीच विधी आणि न्याय विभागाने जारी केली आहे. यादव यांच्या नियुक्तीबद्दल पीडित राळेभात कुटुंबीयांनी समाधान व्यक्त करून या प्रकरणी गुन्हेगारांना लवकरात लवकर कठोर शिक्षा होईल, असा आशावाद व्यक्त केला आहे. याबाबत यादव यांच्याशी संपर्क साधला असता १० जुलै रोजी श्रीगोंदा जिल्हा न्यायालयात या खटल्याबाबत सुनावणी असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCourtन्यायालय