शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅपिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
2
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
3
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
4
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
5
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
6
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
7
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
8
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
9
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
10
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
11
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
12
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
13
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
14
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
15
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
16
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
17
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
18
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
19
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
20
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट

अहमदनगर जिल्हा बँक भरतीतील प्रकार : गुणवत्ता यादीत येऊनही नियुक्ती नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 12:43 IST

जिल्हा बँकेने भरतीत निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे देताना ती साध्या टपालाने पाठवली आहेत. आपणाला हे नियुक्तीपत्रच मिळाले नाही अशी तक्रार नाशिक जिल्ह्यातील एका उमेदवाराने बँकेकडे केली आहे.

सुधीर लंके । अहमदनगर : जिल्हा बँकेने भरतीत निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे देताना ती साध्या टपालाने पाठवली आहेत. आपणाला हे नियुक्तीपत्रच मिळाले नाही अशी तक्रार नाशिक जिल्ह्यातील एका उमेदवाराने बँकेकडे केली आहे. विशेष म्हणजे हा उमेदवार गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांकावर होता. नगर जिल्हा बँकेने लिपिक, ज्युनिअर आॅफिसर आदी पदांच्या ४६५ जागांची भरती प्रक्रिया राबवली आहे. या भरतीप्रक्रियेतील अनेक बाबी आक्षेपार्ह आहेत. ‘लोकमत’ने भरती प्रक्रियेतील अनियमितता समोर आणल्यानंतर राज्य शासनाने भरतीला स्थगिती देत भरतीची चौकशी केली. या चौकशीत भरतीत अनियमितता असल्याचे सिद्ध झाल्यानेभरती रद्द करण्यात आली. भरती रद्द झाल्यामुळे बँकेने निवड झालेल्या कुठल्याही उमेदवाराला नियुक्तीपत्रे पाठविली नाहीत. दरम्यान, भरती प्रक्रियेतील काही उमेदवारांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. औरंगाबाद खंडपीठाने चौकशी समितीला ज्या ६४ उमेदवारांची निवड आक्षेपार्ह वाटली त्यांची फेरचौकशी करण्यात यावी असा आदेश दिला. त्यामुळे बँकेने एप्रिल २०१९ मध्ये हे ६४ उमेदवार वगळता अन्य उमेदवारांना लगेचच नियुक्तीपत्रे पाठवून त्यांना नियुक्तीही दिली. यामध्ये ज्युनिअर आॅफिसर या पदासाठी अनुसूचित जमाती प्रवर्गात प्रकल्पग्रस्त संवर्गात अंतरिम गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांकावर असलेल्या विशाल बहिरम याला मात्र नियुक्ती मिळाली नाही. दरम्यान, सहकार विभागाने ६४ उमेदवारांच्या भरतीची फेरचौकशी करुन त्यातील ६० उमेदवारांना क्लिन चिट दिली. बँकेने लगेचच या उमेदवारांनाही नियुक्ती दिली. मात्र, या सर्व प्रक्रियेत गुणवत्ता यादीत प्रथम स्थानावर असलेल्या बहिरम याला कोठेही नियुक्ती मिळाली नाही. ‘लोकमत’ने सहकार विभागाच्या फेरचौकशी अहवालावर मालिका प्रकाशित केली त्यावेळी बँकेच्या भरतीवरील स्थगिती उठल्याची माहिती बहिरम याला समजली व तो चौकशीसाठी बँकेकडे गेला. तेव्हा तुम्ही उशिराने आमच्याकडे आला आहात. आम्ही उमेदवारांना नियुक्ती दिलेली आहे, असे उत्तर बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांनी या उमेदवाराला दिले. उमेदवाराची तक्रारजिल्हा बँकेची भरती रद्द झाल्याचे आम्ही वृत्तपत्रात वाचले होते. मात्र, भरतीवरील स्थगिती उठल्यानंतर बँकेने नियुक्तीबाबत मला काहीही कळविले नाही. बँकेने साध्या टपालाने नियुक्तीपत्र पाठविले होते असे बँक सांगते. मात्र हे नियुक्तीपत्र मला मिळालेले नाही. मला नियमानुसार नियुक्ती मिळावी, अशी मागणी विशाल बहिरम या उमेदवाराने बँकेकडे केली आहे.  दरम्यान, बँकेने साध्या टपालाने नियुक्तीपत्रे का पाठवली? हाही प्रश्न आहे. साध्या टपालाने नियुक्तीपत्रे का? जिल्हा बँकेने सर्व उमेदवारांकडून परीक्षा शुल्क घेतले होते तर साध्या टपालाने नियुक्तीपत्रे का पाठवली असा प्रश्न मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांना केला असता, ‘आम्ही साध्या टपालानेच सर्व उमेदवारांना नियुक्तीपत्र पाठविले. इतर उमेदवारांना हे पत्र मिळाले व या उमेदवाराला का मिळाले नाही हे सांगता येणार नाही’ असे उत्तर त्यांनी दिले. उमेदवाराने बँकेकडे तक्रार केली असेल तर संचालक मंडळ त्याचा निर्णय घेईल, असेही ते ‘लोकमत’ला म्हणाले. भरतीसारख्या महत्त्वाच्या विषयात बँकेने साध्या टपालाचा वापर का केला? याबाबत संशय आहे. सर्व उमेदवारांना नियुक्तीपत्रे गेली का व प्रतीक्षा यादीतील नियुक्त्या कशा पद्धतीने दिल्या गेल्या? असाही प्रश्न यातून उपस्थित झाला आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBanking Sectorबँकिंग क्षेत्र