शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

घोड कालव्याचे शेतीसाठी आणखी दोन आवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:19 IST

श्रीगोंदा : घोड धरणाच्या डाव्या कालव्यातून शेतीसाठी आणखी दोन आवर्तन मिळणार आहेत. पहिले २७ मार्च तर दुसरे आवर्तन १० ...

श्रीगोंदा : घोड धरणाच्या डाव्या कालव्यातून शेतीसाठी आणखी दोन आवर्तन मिळणार आहेत. पहिले २७ मार्च तर दुसरे आवर्तन १० मे रोजी सोडण्याचा निर्णय मंगळवारी कालवा सल्लागार समितीच्या ऑनलाईन बैठकीत झाला.

या बैठकीतील चर्चेत आ. बबनराव पाचपुते, आ. रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनशाम शेलार, कुकडीचे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ, कार्यकारी अभियंता स्वप्निल काळे यांनी सहभाग घेतला होता. घोड धरणातील उपलब्ध उपयुक्त पाणीसाठा विचारात घेऊन दोन आवर्तने सोडण्याचा निर्णय झाला. याबाबत दोन दिवसांपूर्वी घनश्याम शेलार यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन लक्ष वेधले होते.

घोड धरणातून घोड नदीवरील सहा बंधाऱ्यांत पाणी सोडण्याबाबत निर्णय होणे अपेक्षित होते. मात्र, हा चेंडू जलसंपदामंत्र्यांकडे टोलविण्यात आला. घोड नदीवरील सहा बंधाऱ्यांत ३०० एमसीएफटी पाणी सोडण्यासंदर्भात दोन दिवसांत प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी जलसंपदामंत्र्यांकडे पाठविण्यात येणार आहे.

--

कुकडीचा पाणीप्रश्न ऐरणीवर

कुकडी प्रकल्पातील येडगाव धरणातून मे महिन्यात शेतीसाठी दुसरे आवर्तन मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, डिंभे धरणातून येडगाव धरणात पाणी पूर्ण दाबाने येत नाही. सध्या येडगाव धरणात पाणी शिल्लक नाही. त्यामुळे कुकडीच्या आवर्तनाचा प्रश्न गंभीर होणार आहे. यासाठी डिंभे धरणातून दाेन व पिंपळगाव जोगे धरणातील मृत साठ्यातून दोन टीएमसी पाणी सोडण्याबाबत शासनाने सकारात्मक भूमिका घेतली तर कुकडीचे एक आवर्तन मे महिन्यात सुटू शकते. मात्र, तशा हालचाली न झाल्यास कुकडीच्या पट्ट्यातील पिके जळून जातील.

---

अधिकाऱ्यांना सूचना

दोन्ही आवर्तनांचे नियोजन योग्य पद्धतीने व वेळेत करावे, अशा सूचना या बैठकीत अधिकाऱ्यांना केल्या आहेत, असे आ. बबनराव पाचपुते यांनी सांगितले.