शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

घोड कालव्याचे शेतीसाठी आणखी दोन आवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:19 IST

श्रीगोंदा : घोड धरणाच्या डाव्या कालव्यातून शेतीसाठी आणखी दोन आवर्तन मिळणार आहेत. पहिले २७ मार्च तर दुसरे आवर्तन १० ...

श्रीगोंदा : घोड धरणाच्या डाव्या कालव्यातून शेतीसाठी आणखी दोन आवर्तन मिळणार आहेत. पहिले २७ मार्च तर दुसरे आवर्तन १० मे रोजी सोडण्याचा निर्णय मंगळवारी कालवा सल्लागार समितीच्या ऑनलाईन बैठकीत झाला.

या बैठकीतील चर्चेत आ. बबनराव पाचपुते, आ. रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनशाम शेलार, कुकडीचे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ, कार्यकारी अभियंता स्वप्निल काळे यांनी सहभाग घेतला होता. घोड धरणातील उपलब्ध उपयुक्त पाणीसाठा विचारात घेऊन दोन आवर्तने सोडण्याचा निर्णय झाला. याबाबत दोन दिवसांपूर्वी घनश्याम शेलार यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन लक्ष वेधले होते.

घोड धरणातून घोड नदीवरील सहा बंधाऱ्यांत पाणी सोडण्याबाबत निर्णय होणे अपेक्षित होते. मात्र, हा चेंडू जलसंपदामंत्र्यांकडे टोलविण्यात आला. घोड नदीवरील सहा बंधाऱ्यांत ३०० एमसीएफटी पाणी सोडण्यासंदर्भात दोन दिवसांत प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी जलसंपदामंत्र्यांकडे पाठविण्यात येणार आहे.

--

कुकडीचा पाणीप्रश्न ऐरणीवर

कुकडी प्रकल्पातील येडगाव धरणातून मे महिन्यात शेतीसाठी दुसरे आवर्तन मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, डिंभे धरणातून येडगाव धरणात पाणी पूर्ण दाबाने येत नाही. सध्या येडगाव धरणात पाणी शिल्लक नाही. त्यामुळे कुकडीच्या आवर्तनाचा प्रश्न गंभीर होणार आहे. यासाठी डिंभे धरणातून दाेन व पिंपळगाव जोगे धरणातील मृत साठ्यातून दोन टीएमसी पाणी सोडण्याबाबत शासनाने सकारात्मक भूमिका घेतली तर कुकडीचे एक आवर्तन मे महिन्यात सुटू शकते. मात्र, तशा हालचाली न झाल्यास कुकडीच्या पट्ट्यातील पिके जळून जातील.

---

अधिकाऱ्यांना सूचना

दोन्ही आवर्तनांचे नियोजन योग्य पद्धतीने व वेळेत करावे, अशा सूचना या बैठकीत अधिकाऱ्यांना केल्या आहेत, असे आ. बबनराव पाचपुते यांनी सांगितले.