शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
7
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
8
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
9
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
10
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
11
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
12
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
13
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
14
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
15
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
16
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
17
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
18
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
19
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
20
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले

घोड कालव्याचे शेतीसाठी आणखी दोन आवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:19 IST

श्रीगोंदा : घोड धरणाच्या डाव्या कालव्यातून शेतीसाठी आणखी दोन आवर्तन मिळणार आहेत. पहिले २७ मार्च तर दुसरे आवर्तन १० ...

श्रीगोंदा : घोड धरणाच्या डाव्या कालव्यातून शेतीसाठी आणखी दोन आवर्तन मिळणार आहेत. पहिले २७ मार्च तर दुसरे आवर्तन १० मे रोजी सोडण्याचा निर्णय मंगळवारी कालवा सल्लागार समितीच्या ऑनलाईन बैठकीत झाला.

या बैठकीतील चर्चेत आ. बबनराव पाचपुते, आ. रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनशाम शेलार, कुकडीचे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ, कार्यकारी अभियंता स्वप्निल काळे यांनी सहभाग घेतला होता. घोड धरणातील उपलब्ध उपयुक्त पाणीसाठा विचारात घेऊन दोन आवर्तने सोडण्याचा निर्णय झाला. याबाबत दोन दिवसांपूर्वी घनश्याम शेलार यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन लक्ष वेधले होते.

घोड धरणातून घोड नदीवरील सहा बंधाऱ्यांत पाणी सोडण्याबाबत निर्णय होणे अपेक्षित होते. मात्र, हा चेंडू जलसंपदामंत्र्यांकडे टोलविण्यात आला. घोड नदीवरील सहा बंधाऱ्यांत ३०० एमसीएफटी पाणी सोडण्यासंदर्भात दोन दिवसांत प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी जलसंपदामंत्र्यांकडे पाठविण्यात येणार आहे.

--

कुकडीचा पाणीप्रश्न ऐरणीवर

कुकडी प्रकल्पातील येडगाव धरणातून मे महिन्यात शेतीसाठी दुसरे आवर्तन मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, डिंभे धरणातून येडगाव धरणात पाणी पूर्ण दाबाने येत नाही. सध्या येडगाव धरणात पाणी शिल्लक नाही. त्यामुळे कुकडीच्या आवर्तनाचा प्रश्न गंभीर होणार आहे. यासाठी डिंभे धरणातून दाेन व पिंपळगाव जोगे धरणातील मृत साठ्यातून दोन टीएमसी पाणी सोडण्याबाबत शासनाने सकारात्मक भूमिका घेतली तर कुकडीचे एक आवर्तन मे महिन्यात सुटू शकते. मात्र, तशा हालचाली न झाल्यास कुकडीच्या पट्ट्यातील पिके जळून जातील.

---

अधिकाऱ्यांना सूचना

दोन्ही आवर्तनांचे नियोजन योग्य पद्धतीने व वेळेत करावे, अशा सूचना या बैठकीत अधिकाऱ्यांना केल्या आहेत, असे आ. बबनराव पाचपुते यांनी सांगितले.