शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

रांजणगावात सोमवारी आणखी दोन गायी दगावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:21 IST

कोपरगाव : तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथे सोमवारी (दि. १५) आणखी दोन गायींचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे गावातील मृत ...

कोपरगाव : तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथे सोमवारी (दि. १५) आणखी दोन गायींचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे गावातील मृत जनावरांचा एकूण आकडा ११वर गेला आहे. त्यामुळे गावातील पशुपालक धास्तावले आहेत.

रांजणगाव देशमुखमध्ये मागील आठवड्यात कैलास मुरलीधर गोर्डे या शेतकऱ्याच्या पाच गायी दगावला होत्या, तर दशरथ साहेबराव खालकर यांच्या दोन, संपत खालकर यांची एक गाय, तर अनिल खालकर यांचा एक बैल अशी एकूण नऊ जनावरे दगावली होती. येथील जनावरे दगावण्याचे सत्र अद्याप सुरूच असल्याने सोमवारी पुन्हा कैलास गोर्डे यांची व संपत खालकर यांची प्रत्येकी एक गाय मृत झाली आहे. त्यामुळे एकट्या गोर्डे यांच्या तब्बल सहा, तर खालकर यांच्या दोन गायी दगावल्या आहेत. ही जनावरे नेमकी कशाने दगावत आहेत. याचा अजूनही उलगडा होत नसल्याने पशुपालक चिंतेत बुडाले आहेत.

............

सध्या हिरव्या चाऱ्याची नायट्रोजन पातळी वाढली आहे. त्यातून ओगझिलेट हा हानिकारक घटक तयार होत आहे. असा चारा जनावरांनी खाल्ल्यानंतर चाऱ्यातील ओगझिलेट व जनावरांच्या शरीरातील कॅल्शियम एकत्र येऊन कॅल्शियम ओगझिलेट तयार होतो. त्यामुळे जनावराच्या शरीरातील कॅल्शियमची पातळी झपाट्याने कमी होऊन जनावर खाली बसते. काही दिवसात मृत होते. हे टाळण्यासाठी अशी लक्षणे आढळल्यास शेतकऱ्यांनी जनावरांना दररोज ५० ते १०० ग्रॅम कॅल्शियम पावडर द्यावी तसेच चुन्याची निवळीदेखील द्यावी.

- डॉ. अजयनाथ थोरे, सहायक आयुक्त, तालुका पशु चिकित्सालय, कोपरगाव.