शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील दोन लाख कामगारांचा जीव टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:19 IST

अहमदनगर : कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेक उद्योग धंदे, व्यवसाय बंद पडले. त्यामुळे कामगारांचा रोजगार गेला. सरकारच्या बिगेन अगेनमुळे गेलेली ...

अहमदनगर : कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेक उद्योग धंदे, व्यवसाय बंद पडले. त्यामुळे कामगारांचा रोजगार गेला. सरकारच्या बिगेन अगेनमुळे गेलेली नोकरी पुन्हा मिळाली. मात्र, आता कोरोनाची दुसरी लाट येऊन धडकली आहे. सरकारने रात्री संचारबंदी व दिवसा जमावबंदी, असा आदेश लागू केला आहे. त्यामुळे कारखाने, दुकानदार, हॉटेलमध्ये काम करणाऱ्या जिल्ह्यातील सुमारे दोन लाख कामगारांचा जीव टांगणीला लागला आहे.

सरकारने नव्या लॉकडाऊनची घोषणा करताना कामगारांना कामावरून काढता येणार नाही, असे निर्देश सर्वच आस्थापनांना दिले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे विविध वस्तूंचे उत्पादन करणारे कारखाने, बाजार पेठेतील दुकानदार आदी व्यवसायांवर कमी अधिक प्रमाणात घट झाली आहे. मागील वर्षी कोरोनामुळे हॉटेल, दुकाने, मॉल्स, कारखाने बंद होते. उद्योग व्यवसाय बंद पडल्याने कामगारांनी घरचा रस्ता धरला. अनेक कामगार गावी निघून गेले. लॉकडाऊनमुळे गावी जाण्यासाठी वाहने मिळाली नाहीत. म्हणून कामगारांनी अनवणी गाव गाठले. लॉकडाऊन शिथिल होऊनही कामगार कामावर हजर होत नव्हते. कारखानदार व दुकानदारांनी आगाऊ रक्कम देऊन त्यांना कामावर बोलावून घेतले. कोरोनाच्या धक्क्यातून उद्योग व्यवसाय सावरत असतानाच दुसरी लाट येऊन धडकली. गेल्या आठ दिवसांपासून लॉकडाऊनची चर्चा सुरू होती. अखेर सरकारने रात्रीची संचार बंदी व दिवसा जमावबंदी, असे धोरण स्वीकारले. परंतु, त्याचाही परिणाम उद्योग व्यवसायांवर होणार असल्याने नोकरी किती दिवस टिकेल, याचा भरोसा नाही आणि नोकरी टिकलीच तर पगार वेळेवर मिळेलच, याची शास्वती नाही. मिळालाच तर काही कपात होणार नाही ना, असे एक ना अनेक प्रश्न सध्या कामगारांसमोर आहेत.

...

गाळीप संपले आता करायचे काय

जिल्ह्यात साखर कारखान्यांची मोठी संख्या आहे. यंदा पाऊस पुरेसा पडल्याने गळीत हंगामही चांगला झाला. कारखान्यांचे गळीप हंगाम संपल्याने कामगार गावाकडे निघाले आहेत. हंगाम संपल्यानंतर अनेक ऊस तोड कामगार शहरांत येऊन मिळेल ते काम करत असतात. परंतु, लॉकडाऊनमुळे त्यांच्या हाताला काम नाही. त्यामुळे गाळप संपले, आता करायचे काय, असा प्रश्न त्यांच्या समोर आहे.

...

असे आहेत कामगार

नोंदणीकृत कारखाने- ९५०, कामगार- ५०,०००

दुकाने-८०,०००, कामगार-७३,००००

बांधकाम कामगार-५६,८३५

माथाडी कामगार-२,८६६

सुरक्षा रक्षक-४०५

.......

परप्रांतीयांची घालमेल

जिल्ह्यात काम करणाऱ्या परप्रांतीय कामगारांची संख्या सुमारे १६ हजार ६४९ इतकी होती. प्रशासनाच्या आकडेवारीनुसार ३ हजार ४११ परप्रांतीय कामगार आपल्या गावी निघून गेले. हा आकडा यापेक्षाही जास्त असल्याचे काहींचे म्हणणे आहे. परप्रांतीय कामगार परत आले आहेत. परंतु, लॉकडाऊनच्या भीतीने त्यांची घालमेल सुरू आहे.

...

लॉकडानच्या काळात ३५ तक्रारी

मागील लॉकडाऊनच्या काळात मालकांनी पगार न दिल्याबाबतच्या ३५ तक्रारी कामगार विभागाला प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारी निकाली काढण्यात आल्या असून, कामगारांना १५ लाख ११ हजार ८०० रुपये देण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.