शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील दोन लाख कामगारांचा जीव टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:19 IST

अहमदनगर : कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेक उद्योग धंदे, व्यवसाय बंद पडले. त्यामुळे कामगारांचा रोजगार गेला. सरकारच्या बिगेन अगेनमुळे गेलेली ...

अहमदनगर : कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेक उद्योग धंदे, व्यवसाय बंद पडले. त्यामुळे कामगारांचा रोजगार गेला. सरकारच्या बिगेन अगेनमुळे गेलेली नोकरी पुन्हा मिळाली. मात्र, आता कोरोनाची दुसरी लाट येऊन धडकली आहे. सरकारने रात्री संचारबंदी व दिवसा जमावबंदी, असा आदेश लागू केला आहे. त्यामुळे कारखाने, दुकानदार, हॉटेलमध्ये काम करणाऱ्या जिल्ह्यातील सुमारे दोन लाख कामगारांचा जीव टांगणीला लागला आहे.

सरकारने नव्या लॉकडाऊनची घोषणा करताना कामगारांना कामावरून काढता येणार नाही, असे निर्देश सर्वच आस्थापनांना दिले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे विविध वस्तूंचे उत्पादन करणारे कारखाने, बाजार पेठेतील दुकानदार आदी व्यवसायांवर कमी अधिक प्रमाणात घट झाली आहे. मागील वर्षी कोरोनामुळे हॉटेल, दुकाने, मॉल्स, कारखाने बंद होते. उद्योग व्यवसाय बंद पडल्याने कामगारांनी घरचा रस्ता धरला. अनेक कामगार गावी निघून गेले. लॉकडाऊनमुळे गावी जाण्यासाठी वाहने मिळाली नाहीत. म्हणून कामगारांनी अनवणी गाव गाठले. लॉकडाऊन शिथिल होऊनही कामगार कामावर हजर होत नव्हते. कारखानदार व दुकानदारांनी आगाऊ रक्कम देऊन त्यांना कामावर बोलावून घेतले. कोरोनाच्या धक्क्यातून उद्योग व्यवसाय सावरत असतानाच दुसरी लाट येऊन धडकली. गेल्या आठ दिवसांपासून लॉकडाऊनची चर्चा सुरू होती. अखेर सरकारने रात्रीची संचार बंदी व दिवसा जमावबंदी, असे धोरण स्वीकारले. परंतु, त्याचाही परिणाम उद्योग व्यवसायांवर होणार असल्याने नोकरी किती दिवस टिकेल, याचा भरोसा नाही आणि नोकरी टिकलीच तर पगार वेळेवर मिळेलच, याची शास्वती नाही. मिळालाच तर काही कपात होणार नाही ना, असे एक ना अनेक प्रश्न सध्या कामगारांसमोर आहेत.

...

गाळीप संपले आता करायचे काय

जिल्ह्यात साखर कारखान्यांची मोठी संख्या आहे. यंदा पाऊस पुरेसा पडल्याने गळीत हंगामही चांगला झाला. कारखान्यांचे गळीप हंगाम संपल्याने कामगार गावाकडे निघाले आहेत. हंगाम संपल्यानंतर अनेक ऊस तोड कामगार शहरांत येऊन मिळेल ते काम करत असतात. परंतु, लॉकडाऊनमुळे त्यांच्या हाताला काम नाही. त्यामुळे गाळप संपले, आता करायचे काय, असा प्रश्न त्यांच्या समोर आहे.

...

असे आहेत कामगार

नोंदणीकृत कारखाने- ९५०, कामगार- ५०,०००

दुकाने-८०,०००, कामगार-७३,००००

बांधकाम कामगार-५६,८३५

माथाडी कामगार-२,८६६

सुरक्षा रक्षक-४०५

.......

परप्रांतीयांची घालमेल

जिल्ह्यात काम करणाऱ्या परप्रांतीय कामगारांची संख्या सुमारे १६ हजार ६४९ इतकी होती. प्रशासनाच्या आकडेवारीनुसार ३ हजार ४११ परप्रांतीय कामगार आपल्या गावी निघून गेले. हा आकडा यापेक्षाही जास्त असल्याचे काहींचे म्हणणे आहे. परप्रांतीय कामगार परत आले आहेत. परंतु, लॉकडाऊनच्या भीतीने त्यांची घालमेल सुरू आहे.

...

लॉकडानच्या काळात ३५ तक्रारी

मागील लॉकडाऊनच्या काळात मालकांनी पगार न दिल्याबाबतच्या ३५ तक्रारी कामगार विभागाला प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारी निकाली काढण्यात आल्या असून, कामगारांना १५ लाख ११ हजार ८०० रुपये देण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.