शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

नगर जिल्ह्यात दोन शासकीय कृषी महाविद्यालये ? ; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार हळगावचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 20:15 IST

शासनाने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीने श्रीगोंदा व जामखेड तालुक्यांत कृषी महाविद्यालय सुरू करण्यास अनुकूलता दर्शविल्याचे समजते. त्याआधारे दोन्ही कृषी महाविद्यालयांना मंगळवारी होणा-या मंंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

अहमदनगर : शासनाने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीने श्रीगोंदा व जामखेड तालुक्यांत कृषी महाविद्यालय सुरू करण्यास अनुकूलता दर्शविल्याचे समजते. त्याआधारे दोन्ही कृषी महाविद्यालयांना मंगळवारी होणा-या मंंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. दक्षिण नगर जिल्ह्यात एकाच वेळी दोन महाविद्यालयांना मंजूरी देऊन स्वपक्षातील वाद मिटविण्याबरोबरच दक्षिणेतील नेत्यांना बळ देण्याचे नवे धोरण सरकार राबवित असल्याची चर्चा सध्या जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात आहे.शेती व्यवसायाची अलीकडच्या काळात कमालीची वाताहात झाली़ कधी नव्हे ते नगर जिल्ह्यातही शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू झाले़ विशेष म्हणजे जिल्ह्यात स्वतंत्र कृषी विद्यापीठ आहे. त्याचा जिल्ह्यातील किती शेतक-यांना फायदा झाला, हा संशोधनाचा विषय आहे़ ते कमी म्हणून काय जिल्ह्यात नव्याने दोन कृषी विज्ञान केंद्रे आली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या बाभळेश्वर येथे तर माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या दहिगाव-ने येथे नव्याने कृषी विज्ञान केंद्र सुरू झाले. केंद्रात व राज्यात आघाडीची सत्ता असल्याने ही केंद्र जिल्ह्यातील आघाडीच्या लोकप्रतिनिधींनी घेतली. दोन्ही केंद्र उत्तर नगर जिल्ह्यात सुरू झाली. दक्षिण नगर जिल्हा तसा दुष्काळी़ परंतु, या भागातील शेतक-यांना बळ देणारी एकही मातृसंस्था उभी राहिली नाही. दक्षिण नगर जिल्ह्याने जिल्ह्याला दोन पालकमंत्री दिले. ते दोन्ही सध्या भाजपात आहेत. माजी पालकमंत्री बबनराव पाचपुते जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले आहेत. त्यावेळी राष्ट्रवादीत असलेले पाचपुते सध्या भाजपात आहेत. पालकमंत्री राम शिंदे हे मूळ भाजपाचेच आहेत. जिल्हा तिथे कृषी महाविद्यालय हे सरकारचे धोरण जाहीर होताच शिंदे यांनी त्यांच्या जामखेड तालुक्यातील हळगावाला कृषी महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव दिला. परंतु, शिंदे यांचा हा प्रस्ताव पाचपुतेंच्या चांगलाच जिव्हारी लागला़ त्यांनी थेट महाविद्यालयावरच दावा ठोकला. वाद अखेर न्यायालयात गेला. न्यायालयाने तज्ज्ञ समिती नियुक्तीचा आदेश दिला. या समितीने दोन्ही तालुक्यांतील वस्तुस्थितीचा अहवाल सादर केला असून, दोन्ही ठिकाणी महाविद्यालय सुरू करण्यास हारकत नसल्याचे सरकारला कळविले आहे. पण, एका जिल्ह्यात एकच कृषी महाविद्यालय, असे सरकारचे धोरण आहे. मात्र स्वपक्षातील दोन्ही नेते महाविद्यालयांसाठी इरेला पेटल्याने सरकारकडून दोन्ही महाविद्यालयांना मंजुरी देण्याच्या जोरदार हालचाली सुरू असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर