शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

दोन पिढ्या गुहेत राहणा-यांना मिळाले घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 12:18 IST

अकोले तालुक्यातील अत्यंत दुर्गम आदिवासी फोपसंडी गावातील सोमनाथ घामाजी वळे यांनी चक्क दुसºया पिढीत घर पाहिले. गेल्या दोन पिढ्या वळे कुटुंब डोंगर कपारीत असलेल्या गुहेत आपले जीवन जगत होते. प्रधानमंत्री आवास योजनेतून त्यांना घर देण्यात आले असून नव्या घरात त्यांची दिवाळी साजरी होणार आहे.

मच्छिंद्र देशमुख । अकोले : अकोले तालुक्यातील अत्यंत दुर्गम आदिवासी फोपसंडी गावातील सोमनाथ घामाजी वळे यांनी चक्क दुस-या पिढीत घर पाहिले. गेल्या दोन पिढ्या वळे कुटुंब डोंगर कपारीत असलेल्या गुहेत आपले जीवन जगत होते. प्रधानमंत्री आवास योजनेतून त्यांना घर देण्यात आले असून नव्या घरात त्यांची दिवाळी साजरी होणार आहे.घर देता का कुणी घर?  ही म्हण कधी कधी प्रत्यक्ष अनुभवायलाही मिळते. अकोले तालुक्यातील दुर्गम आदिवासी फोपसंडी या गावात सोमनाथ घमाजी वळे (वय ६०) हे गावाच्या उत्तरेला सहाशे फूट उंच डोंगरावर एका गुहेत राहतात. त्यांचे वडील व आजोबा देखील याच गुहेत राहत होते. गायी पाळणे, कंदमुळे व जंगलातील मध, डिंक, वनौषधी विकून हे कुटुंब जगत आहे. ब्रिटिशकाळात जंगल कायदा आला व अभयारण्य क्षेत्रात हे गाव आले. वळे कुटुंब ज्या गुहेत राहत होते, गुरे चारत होते ते जंगल अभयारण्यात गेले. त्यामुळे त्यांच्या नावावर जमीन होऊ शकली नाही. त्यामुळे घर बांधायला जागाच राहिली नाही. केवळ अभयारण्यात गायी चारायच्या. वनसंपदेतील घटक विकून पोट भरायचे, एवढेच काम, शिक्षण, वीज, घर, टिव्ही या त्यांच्या स्वप्नांतीलच गोष्टी.  घर काय असते हे त्यांनी कधी पाहिलेच नाही. सरकारी घर मिळाल्याचा आनंदआम्ही दोन पिढ्या गडदीत (गुहेत) राहिलो. सरकारी घर मिळाल्याचा खूप आनंद झाला. मुलाचे शिक्षण करता आले नाही. मात्र नातू पंकज चार वर्षाचा झाला आहे. तो आता शाळेत जाईल. आमची पिढी जंगलातून गावात आली. आता टी. व्ही., लाईट पहायला मिळणार, याचा आनंद आहे, असे फोफसंडी येथील लाभार्थी कुसूम वळे यांनी सांगितले.योजना पूर्तीचा आनंद    अकोले तालुक्यात २०१८ -१९ मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत १८४५, रमाई १६५, शबरी २२५ घरकुल पूर्ण झाली. किमान ८५ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले. पुढील १९ - २० मध्ये प्रधानमंत्री १४००, रमाई १७५ तर शबरीची सहाशे घरकुले मंजूर आहेत. उद्दिष्ट पूर्तीचा प्रयत्न आहे. वळे कुटुंब हे कित्येक वर्षे कपारीत राहत होते. स्वत: लक्ष घालून ग्रामसेवक व लाभार्थी यांना किचकट अटी तातडीने पूर्ण करण्यासाठी मदत केली. त्यांचे घरकुल पुर्ण झाले. योजना पूर्तीचा आनंद झाला, असे गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे यांनी सांगितले. ‘लोकमत’ने टाकला होता प्रकाशझोत तीन वर्षांपूर्वी ‘लोकमत’ने वळे कुटुंबावर प्रकाशझोत टाकला. त्यानंतर सरकारी यंत्रणा तातडीने गुहेत दाखल झाली होती.  जागा, कागदपत्रे यांची मोठी अडचण होती. अकोलेचे गट विकास अधिकारी भास्कर रेंगडे थेट त्या गुहेत गेले. ग्र्रामसेवक अविनाश मंडलिक यांना आदेश देत कागदी सोपस्कार पूर्ण केले. त्यानंतर २०१८ - १९ या वर्षातील प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत वळे यांना घर मंजूर झाले. गावठ्यातील एक मोकळी जागा पाहून तेथे टुमदार घर उभे राहिले आहे. वळे कुटुंबाला शंभर वर्षांनी घर काय असते हे पहायला मिळणार आहे. या दिवाळीत वळे कुटुंबीयांचा गृहप्रवेश होणार आहे, असे कुसूम वळे यांनी सांगितले. 

टॅग्स :Homeसुंदर गृहनियोजनAhmednagarअहमदनगर