शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

स्नेहालयातील दोन मुलांचा तलावात बुडून मृत्यू

By admin | Updated: May 23, 2014 01:27 IST

अहमदनगर : एम.आय.डी.सी. भागातील स्नेहालयाच्या विशेष बालगृहातील दोन मुले निंबळक येथील तलावात पोहण्यासाठी गेले होते.

अहमदनगर : एम.आय.डी.सी. भागातील स्नेहालयाच्या विशेष बालगृहातील दोन मुले निंबळक येथील तलावात पोहण्यासाठी गेले होते. तलावात पाण्याचा अंदाज न आल्याने गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास त्यांचा बुडून मृत्यू झाला. या प्रकरणी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात मुलांच्या अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. विकास किशोर ससाणे (वय १४, रा. लाल टाकीनगर ) आणि मयूर संताराम मापारी (वय १३, रा. निफाड, जि. नाशिक) अशी मयत मुलांची नावे आहेत. एम.आय.डी.सी. परिसरात स्नेहालयाचे विशेष बालगृह आहे. या बालगृहात काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या मुलांचे पालन-पोषण केले जाते. विकास आणि मयूर ही दोन मुले याच बालगृहात होती. गुरुवारी दुपारी विनापरवाना ती बाहेर पडली आणि थेट निंबळक परिसरात असलेल्या तलावामध्ये पोहण्यासाठी गेली. तलावात पाण्याचा अंदा ज न आल्याने ती बुडाली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. दोन मुलांचे मृतदेह तरंगत असल्याचे ग्रामस्थांनी तलावात पाहिले. त्यानंतर त्या मुलांना तलावातून बाहेर काढून नगरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र मुलांची तपासणी करून डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. दरम्यान एम.आय.डी. सी. पोलीस ठाण्यात मुलांच्या पालकांनी धाव घेतली आणि संस्थेचे अधीक्षक आणि काळजीवाहक हेच मुलांच्या मृत्युला जबाबदार असल्याचा टाहो फोडला. त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याशिवाय मुलांचे मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. मुलांच्या पालकांनी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात सायंकाळी संस्थेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यासाठी पालक व नातेवाईकांची ठाण्यात गर्दी झाली होती. ————- मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाला, याबाबत अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुढील कारवाईबाबत निर्णय घेता येईल. मुलांच्या पालकांनी संस्थेचा निष्काळजीपणाच मुलांच्या मृत्युस कारणीभूत असल्याचा आरोप केला आहे. त्याबाबत चौकशी करूनच कारवाई करण्यात येईल. -किरणकुमार बकाले, सहा. पोलीस निरीक्षक बालगृहात सध्या उन्हाळी शिबिर सुरू आहे. दुपारच्यावेळी मुलांची जेवणाची सुट्टी झाली होती. मुलांची जेवणे झाल्यानंतर त्यांना थोडी मोकळीक दिली जाते. नेमक्या याच काळात दोन मुले शिबिरातून पळून गेली. शिबिर पुन्हा सुरू झाल्यानंतर दोन मुले नसल्याचे लक्षात आल्याक्षणीच संस्थेचे काळजीवाहक राजेंद्र वाकचौरे यांनी संस्थेच्या अन्य कर्मचार्‍यांमार्फत मुलांचा शोध घेतला. काही वाटसरुंनी मुले तलावाकडे गेल्याचे सांगितले. तिथे वाकचौरे यांनी चौकशी केली असता तलावात मुले बुडाल्याचे समजले. मुलांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र त्यात अपयश आले. ग्रामस्थांच्या मदतीने मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. झालेली घटना दुर्दैवी आहे. या घटनेमध्ये संस्थेचा कोणताही निष्काळजीपणा झालेला नाही. -वैजनाथ लोहार, अधीक्षक, बालगृह