शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पावरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

कुकडीने तंगविले, आता महावितरण रडविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:26 IST

आढळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव परिसरामध्ये यावर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे रब्बी पिकांच्या लागवड क्षेत्रात मोठी वाढ झाली. परंतु, कुकडीचे ...

आढळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव परिसरामध्ये यावर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे रब्बी पिकांच्या लागवड क्षेत्रात मोठी वाढ झाली. परंतु, कुकडीचे आवर्तन मिळण्यास जवळपास मार्च महिना उजाडणार असल्यामुळे पाणी कमी पडू लागले आहे. जेमतेम पाण्यात पिके जगविण्याची धडपड करणाऱ्या शेतकऱ्यांवर महावितरणने वसुलीचा बडगा उगारला आहे. फक्त रोहित्रे नाही, तर थेट वीज उपकेंद्रच वसुलीसाठी बंद करण्याची मोहीम महावितरणने सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

पाऊस चांगला झाला असला तरी जिरायत शेतीला कुकडीच्या पाण्याची गरज होती. परंतु, यावर्षी कुकडीचे पहिले आवर्तन एक फेब्रुवारीला सुरू झाले. आढळगाव परिसरातील गावांना पाणी मिळण्यास मार्च महिना उजाडणार आहे. बागायती शेतीलाही विहिरी आणि बोअरवेलचे पाणी कमी पडू लागले आहे. जोरदार पाऊस होऊनही पाणी कमी पडू लागल्यामुळे बोअरवेल घेण्याऱ्या यंत्रांची धडधड कुकडी पट्ट्यात सुरू झाली आहे. रब्बी पिकांमध्ये गहू, हरभरा या पिकांचे क्षेत्र वाढले आहे. मिळेल तेथून रोपे घेऊन कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल आहे. ऊस लागवडीही सुरू आहेत. सर्वत्र हिरवीगार परिसर असताना कुकडीचे लांबलेले आवर्तन आणि महावितरणच्या कृषिपंपांच्या वीज खंडित करण्याच्या निर्णयाचा फटका शेतीला बसणार आहे.

आढळगाव परिसरात महावितरणकडून थेट वीज उपकेंद्रच बंद करण्याच्या कृतीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पिके वाचविण्याची धडपड शेतकऱ्यांनी सुरू केली आहे.

----

नवीन कृषिपंप वीजजोडणी की तोडणी?

धोरण

नवीन कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० नुसार वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित केल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जाते. त्यामुळे नवीन कृषिपंप वीजजोडणी धोरण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच तोडणी धोरण ठरले आहे.