शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

कुकडीने तंगविले, आता महावितरण रडविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:26 IST

आढळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव परिसरामध्ये यावर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे रब्बी पिकांच्या लागवड क्षेत्रात मोठी वाढ झाली. परंतु, कुकडीचे ...

आढळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव परिसरामध्ये यावर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे रब्बी पिकांच्या लागवड क्षेत्रात मोठी वाढ झाली. परंतु, कुकडीचे आवर्तन मिळण्यास जवळपास मार्च महिना उजाडणार असल्यामुळे पाणी कमी पडू लागले आहे. जेमतेम पाण्यात पिके जगविण्याची धडपड करणाऱ्या शेतकऱ्यांवर महावितरणने वसुलीचा बडगा उगारला आहे. फक्त रोहित्रे नाही, तर थेट वीज उपकेंद्रच वसुलीसाठी बंद करण्याची मोहीम महावितरणने सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

पाऊस चांगला झाला असला तरी जिरायत शेतीला कुकडीच्या पाण्याची गरज होती. परंतु, यावर्षी कुकडीचे पहिले आवर्तन एक फेब्रुवारीला सुरू झाले. आढळगाव परिसरातील गावांना पाणी मिळण्यास मार्च महिना उजाडणार आहे. बागायती शेतीलाही विहिरी आणि बोअरवेलचे पाणी कमी पडू लागले आहे. जोरदार पाऊस होऊनही पाणी कमी पडू लागल्यामुळे बोअरवेल घेण्याऱ्या यंत्रांची धडधड कुकडी पट्ट्यात सुरू झाली आहे. रब्बी पिकांमध्ये गहू, हरभरा या पिकांचे क्षेत्र वाढले आहे. मिळेल तेथून रोपे घेऊन कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल आहे. ऊस लागवडीही सुरू आहेत. सर्वत्र हिरवीगार परिसर असताना कुकडीचे लांबलेले आवर्तन आणि महावितरणच्या कृषिपंपांच्या वीज खंडित करण्याच्या निर्णयाचा फटका शेतीला बसणार आहे.

आढळगाव परिसरात महावितरणकडून थेट वीज उपकेंद्रच बंद करण्याच्या कृतीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पिके वाचविण्याची धडपड शेतकऱ्यांनी सुरू केली आहे.

----

नवीन कृषिपंप वीजजोडणी की तोडणी?

धोरण

नवीन कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० नुसार वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित केल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जाते. त्यामुळे नवीन कृषिपंप वीजजोडणी धोरण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच तोडणी धोरण ठरले आहे.