शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

कुकडीने तंगविले, आता महावितरण रडविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:26 IST

आढळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव परिसरामध्ये यावर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे रब्बी पिकांच्या लागवड क्षेत्रात मोठी वाढ झाली. परंतु, कुकडीचे ...

आढळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव परिसरामध्ये यावर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे रब्बी पिकांच्या लागवड क्षेत्रात मोठी वाढ झाली. परंतु, कुकडीचे आवर्तन मिळण्यास जवळपास मार्च महिना उजाडणार असल्यामुळे पाणी कमी पडू लागले आहे. जेमतेम पाण्यात पिके जगविण्याची धडपड करणाऱ्या शेतकऱ्यांवर महावितरणने वसुलीचा बडगा उगारला आहे. फक्त रोहित्रे नाही, तर थेट वीज उपकेंद्रच वसुलीसाठी बंद करण्याची मोहीम महावितरणने सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

पाऊस चांगला झाला असला तरी जिरायत शेतीला कुकडीच्या पाण्याची गरज होती. परंतु, यावर्षी कुकडीचे पहिले आवर्तन एक फेब्रुवारीला सुरू झाले. आढळगाव परिसरातील गावांना पाणी मिळण्यास मार्च महिना उजाडणार आहे. बागायती शेतीलाही विहिरी आणि बोअरवेलचे पाणी कमी पडू लागले आहे. जोरदार पाऊस होऊनही पाणी कमी पडू लागल्यामुळे बोअरवेल घेण्याऱ्या यंत्रांची धडधड कुकडी पट्ट्यात सुरू झाली आहे. रब्बी पिकांमध्ये गहू, हरभरा या पिकांचे क्षेत्र वाढले आहे. मिळेल तेथून रोपे घेऊन कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल आहे. ऊस लागवडीही सुरू आहेत. सर्वत्र हिरवीगार परिसर असताना कुकडीचे लांबलेले आवर्तन आणि महावितरणच्या कृषिपंपांच्या वीज खंडित करण्याच्या निर्णयाचा फटका शेतीला बसणार आहे.

आढळगाव परिसरात महावितरणकडून थेट वीज उपकेंद्रच बंद करण्याच्या कृतीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पिके वाचविण्याची धडपड शेतकऱ्यांनी सुरू केली आहे.

----

नवीन कृषिपंप वीजजोडणी की तोडणी?

धोरण

नवीन कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० नुसार वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित केल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जाते. त्यामुळे नवीन कृषिपंप वीजजोडणी धोरण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच तोडणी धोरण ठरले आहे.