शहरं
Join us  
Trending Stories
1
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
2
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
3
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
4
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
5
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
6
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
7
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
8
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
9
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
10
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
11
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!
12
चिनी विद्यार्थिनीला युक्रेनियन तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवल्याची शिक्षा, विद्यापीठानं उचललं टोकाचं पाऊल
13
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?
14
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
15
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
16
वृद्धाला हातपाय बांधून कारमध्ये कोंडले, मग कुटुंब ताजमहाल पाहण्यात रंगले, सुरक्षा रक्षकाने पाहिल्याने अनर्थ टळला   
17
"आमचं शांततापूर्ण जीवन..."; गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने फोन चार्ज झाल्यावर पहिलं काय केलं?
18
केस एवढे गळतात की टक्कल पडण्याचीच वाटते भीती; 'हा' घरगुती उपाय ठरेल रामबाण
19
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
20
2025 Keeway RR300: थेट बीएमडब्लूशी स्पर्धा करणार मोटो वॉल्टची नवी बाईक? दोन लाखांहून कमी किंमतीत लॉन्च!

लयी प्रयत्न केले; पण बाग वाचली नाही

By admin | Updated: June 2, 2016 00:57 IST

अहमदनगर : साहेब़़़, लयी प्रयत्न केले पण, काहीही उपयोग झाला नाही़ अखेर डाळिंबाची बाग जळून गेली़ आता आम्ही करायचे काय ते तुम्हीच सांगा,

अहमदनगर : साहेब़़़, लयी प्रयत्न केले पण, काहीही उपयोग झाला नाही़ अखेर डाळिंबाची बाग जळून गेली़ आता आम्ही करायचे काय ते तुम्हीच सांगा, अशा व्यथा मांडवगण येथील शेतकरी आसाराम बापू बोरुडे यांनी दुष्काळ पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकासमोर मांडली़ केंद्रीय मंत्रालयातील आय राणी कुमोदिनी यांच्या नेतृत्वाखालील पाच प्रमुख अधिकाऱ्यांचे पथक बुधवारी दुपारी येथील शासकीय विश्रामगृहात दाखल झाले़ जिल्ह्यातील टंचाईची माहिती घेऊन कुमोदिनी यांच्यासह आऱ एच़ सिंग, डॉ़ एच़ आर. खन्ना, बी़ के.मिश्रा रेड्डी यांच्यासह ताफा नगर तालुक्यातील वाळकी गावाकडे निघाला़ दौरा अचानक आल्याने दुष्काळाची माहिती मिळविण्यापासून ते पाहणीकरिता गावांची निवड करताना प्रशासनाची दमछाक झाली़ वाळकी गावातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या छावणीला पथकाने भेट दिली, शेतकऱ्यांशी संवाद साधला़श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगणला येथील आसाराम बापू बोरुडे यांच्या डाळिंबाच्या बागेची पथकाने पाहणी केली़ यावेळी पैसे खूप खर्च झाले़ शेततळे केले़ पाणी साठविण्यासाठी सिमेंटची टाकी तयार केली़ ठिबक केले़ मात्र बाग वाचवू शकलो नाही़ अखेर बाग जळून खाक झाली़ उत्पन्न तर नाहीच, पण झालेला खर्चही वसूल झाला नाही, अशी व्यथा त्यांनी पथकासमोर मांडली़ यावेळी विभागीय आयुक्त एकनाथ डौले, राज्य आपत्ती व्यवस्थापनप्रमुख सुहास दिवसे, जिल्हाधिकारी अनिल कवडे, नगरचे तहसीलदार सुधीर पाटील, श्रीगोंदाचे तहसीलदार वंदना खरमाळे, तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ दारकुंडे उपस्थित होते़पाहणी कशासाठीराज्य सरकारने रब्बीच्या नुकसान भरपाईसाठी २ हजार २५१ कोटी रुपयांची केंद्र सरकारकडे मागणी केली आहे़ या पार्श्वभूमीवर हे पथक पाहणी करीत आहे़ नगर, श्रीगोंदा, कर्जत तालुक्यातील मोजक्याच गावांना भेटी देऊन सायंकाळी हे पथक सोलापरकडे रवाना झाले़पथकाचा धावता दौराकेंद्रीय पथकाने रात्री उशिरा नगर जिल्ह्याची पाहणी करण्याचे ठरविले व तसे जिल्हा प्रशासनास कळविले़ रात्री उशिरापर्यंत दुष्काळाची माहिती व गावांची निवड करण्यात आली़ त्यामध्ये नगर तालुक्यातील तीन, श्रीगोंदा तालुक्यातील एक आणि कर्जत तालुक्यातील तीन गावांचा समावेश होता़ मात्र, पथकाने नगर तालुक्यातील वाळकी येथील छावणीला भेट दिली़ तांदळी वडगावातील जलयुक्तच्या कामांची पाहणी केली़ त्यानंतर पथक श्रीगोंदा तालुक्यात दाखल झाले़ तालुक्यातील एकमेव मांडवगण गावाची पाहणी करून पथक मिरजगावमध्ये दाखल झाले़ तेथील रोजगार हमीच्या कामांना भेट देऊन पथक सोलापूरकडे रवाना झाले़ कर्जत तालुक्यातील मांदळी व थेरगाव येथे ग्रामस्थ पथकाच्या स्वागतासाठी उपस्थित होते़ मात्र, पथक या गावांना भेटी न देता निघून गेले़