शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

लयी प्रयत्न केले; पण बाग वाचली नाही

By admin | Updated: June 2, 2016 00:57 IST

अहमदनगर : साहेब़़़, लयी प्रयत्न केले पण, काहीही उपयोग झाला नाही़ अखेर डाळिंबाची बाग जळून गेली़ आता आम्ही करायचे काय ते तुम्हीच सांगा,

अहमदनगर : साहेब़़़, लयी प्रयत्न केले पण, काहीही उपयोग झाला नाही़ अखेर डाळिंबाची बाग जळून गेली़ आता आम्ही करायचे काय ते तुम्हीच सांगा, अशा व्यथा मांडवगण येथील शेतकरी आसाराम बापू बोरुडे यांनी दुष्काळ पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकासमोर मांडली़ केंद्रीय मंत्रालयातील आय राणी कुमोदिनी यांच्या नेतृत्वाखालील पाच प्रमुख अधिकाऱ्यांचे पथक बुधवारी दुपारी येथील शासकीय विश्रामगृहात दाखल झाले़ जिल्ह्यातील टंचाईची माहिती घेऊन कुमोदिनी यांच्यासह आऱ एच़ सिंग, डॉ़ एच़ आर. खन्ना, बी़ के.मिश्रा रेड्डी यांच्यासह ताफा नगर तालुक्यातील वाळकी गावाकडे निघाला़ दौरा अचानक आल्याने दुष्काळाची माहिती मिळविण्यापासून ते पाहणीकरिता गावांची निवड करताना प्रशासनाची दमछाक झाली़ वाळकी गावातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या छावणीला पथकाने भेट दिली, शेतकऱ्यांशी संवाद साधला़श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगणला येथील आसाराम बापू बोरुडे यांच्या डाळिंबाच्या बागेची पथकाने पाहणी केली़ यावेळी पैसे खूप खर्च झाले़ शेततळे केले़ पाणी साठविण्यासाठी सिमेंटची टाकी तयार केली़ ठिबक केले़ मात्र बाग वाचवू शकलो नाही़ अखेर बाग जळून खाक झाली़ उत्पन्न तर नाहीच, पण झालेला खर्चही वसूल झाला नाही, अशी व्यथा त्यांनी पथकासमोर मांडली़ यावेळी विभागीय आयुक्त एकनाथ डौले, राज्य आपत्ती व्यवस्थापनप्रमुख सुहास दिवसे, जिल्हाधिकारी अनिल कवडे, नगरचे तहसीलदार सुधीर पाटील, श्रीगोंदाचे तहसीलदार वंदना खरमाळे, तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ दारकुंडे उपस्थित होते़पाहणी कशासाठीराज्य सरकारने रब्बीच्या नुकसान भरपाईसाठी २ हजार २५१ कोटी रुपयांची केंद्र सरकारकडे मागणी केली आहे़ या पार्श्वभूमीवर हे पथक पाहणी करीत आहे़ नगर, श्रीगोंदा, कर्जत तालुक्यातील मोजक्याच गावांना भेटी देऊन सायंकाळी हे पथक सोलापरकडे रवाना झाले़पथकाचा धावता दौराकेंद्रीय पथकाने रात्री उशिरा नगर जिल्ह्याची पाहणी करण्याचे ठरविले व तसे जिल्हा प्रशासनास कळविले़ रात्री उशिरापर्यंत दुष्काळाची माहिती व गावांची निवड करण्यात आली़ त्यामध्ये नगर तालुक्यातील तीन, श्रीगोंदा तालुक्यातील एक आणि कर्जत तालुक्यातील तीन गावांचा समावेश होता़ मात्र, पथकाने नगर तालुक्यातील वाळकी येथील छावणीला भेट दिली़ तांदळी वडगावातील जलयुक्तच्या कामांची पाहणी केली़ त्यानंतर पथक श्रीगोंदा तालुक्यात दाखल झाले़ तालुक्यातील एकमेव मांडवगण गावाची पाहणी करून पथक मिरजगावमध्ये दाखल झाले़ तेथील रोजगार हमीच्या कामांना भेट देऊन पथक सोलापूरकडे रवाना झाले़ कर्जत तालुक्यातील मांदळी व थेरगाव येथे ग्रामस्थ पथकाच्या स्वागतासाठी उपस्थित होते़ मात्र, पथक या गावांना भेटी न देता निघून गेले़