शहरं
Join us  
Trending Stories
1
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
2
भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली
3
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
4
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
5
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
6
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
7
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
8
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
9
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
10
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
11
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
12
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
13
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
14
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
15
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
16
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
17
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
18
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
19
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
20
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 

लयी प्रयत्न केले; पण बाग वाचली नाही

By admin | Updated: June 2, 2016 00:57 IST

अहमदनगर : साहेब़़़, लयी प्रयत्न केले पण, काहीही उपयोग झाला नाही़ अखेर डाळिंबाची बाग जळून गेली़ आता आम्ही करायचे काय ते तुम्हीच सांगा,

अहमदनगर : साहेब़़़, लयी प्रयत्न केले पण, काहीही उपयोग झाला नाही़ अखेर डाळिंबाची बाग जळून गेली़ आता आम्ही करायचे काय ते तुम्हीच सांगा, अशा व्यथा मांडवगण येथील शेतकरी आसाराम बापू बोरुडे यांनी दुष्काळ पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकासमोर मांडली़ केंद्रीय मंत्रालयातील आय राणी कुमोदिनी यांच्या नेतृत्वाखालील पाच प्रमुख अधिकाऱ्यांचे पथक बुधवारी दुपारी येथील शासकीय विश्रामगृहात दाखल झाले़ जिल्ह्यातील टंचाईची माहिती घेऊन कुमोदिनी यांच्यासह आऱ एच़ सिंग, डॉ़ एच़ आर. खन्ना, बी़ के.मिश्रा रेड्डी यांच्यासह ताफा नगर तालुक्यातील वाळकी गावाकडे निघाला़ दौरा अचानक आल्याने दुष्काळाची माहिती मिळविण्यापासून ते पाहणीकरिता गावांची निवड करताना प्रशासनाची दमछाक झाली़ वाळकी गावातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या छावणीला पथकाने भेट दिली, शेतकऱ्यांशी संवाद साधला़श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगणला येथील आसाराम बापू बोरुडे यांच्या डाळिंबाच्या बागेची पथकाने पाहणी केली़ यावेळी पैसे खूप खर्च झाले़ शेततळे केले़ पाणी साठविण्यासाठी सिमेंटची टाकी तयार केली़ ठिबक केले़ मात्र बाग वाचवू शकलो नाही़ अखेर बाग जळून खाक झाली़ उत्पन्न तर नाहीच, पण झालेला खर्चही वसूल झाला नाही, अशी व्यथा त्यांनी पथकासमोर मांडली़ यावेळी विभागीय आयुक्त एकनाथ डौले, राज्य आपत्ती व्यवस्थापनप्रमुख सुहास दिवसे, जिल्हाधिकारी अनिल कवडे, नगरचे तहसीलदार सुधीर पाटील, श्रीगोंदाचे तहसीलदार वंदना खरमाळे, तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ दारकुंडे उपस्थित होते़पाहणी कशासाठीराज्य सरकारने रब्बीच्या नुकसान भरपाईसाठी २ हजार २५१ कोटी रुपयांची केंद्र सरकारकडे मागणी केली आहे़ या पार्श्वभूमीवर हे पथक पाहणी करीत आहे़ नगर, श्रीगोंदा, कर्जत तालुक्यातील मोजक्याच गावांना भेटी देऊन सायंकाळी हे पथक सोलापरकडे रवाना झाले़पथकाचा धावता दौराकेंद्रीय पथकाने रात्री उशिरा नगर जिल्ह्याची पाहणी करण्याचे ठरविले व तसे जिल्हा प्रशासनास कळविले़ रात्री उशिरापर्यंत दुष्काळाची माहिती व गावांची निवड करण्यात आली़ त्यामध्ये नगर तालुक्यातील तीन, श्रीगोंदा तालुक्यातील एक आणि कर्जत तालुक्यातील तीन गावांचा समावेश होता़ मात्र, पथकाने नगर तालुक्यातील वाळकी येथील छावणीला भेट दिली़ तांदळी वडगावातील जलयुक्तच्या कामांची पाहणी केली़ त्यानंतर पथक श्रीगोंदा तालुक्यात दाखल झाले़ तालुक्यातील एकमेव मांडवगण गावाची पाहणी करून पथक मिरजगावमध्ये दाखल झाले़ तेथील रोजगार हमीच्या कामांना भेट देऊन पथक सोलापूरकडे रवाना झाले़ कर्जत तालुक्यातील मांदळी व थेरगाव येथे ग्रामस्थ पथकाच्या स्वागतासाठी उपस्थित होते़ मात्र, पथक या गावांना भेटी न देता निघून गेले़