शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच घेतली
3
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
4
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
5
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
6
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
7
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
8
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
9
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
10
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
11
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
12
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
13
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
14
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
15
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
16
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
17
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
18
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
19
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)

जिल्हा परिषद शोकसभेत अपघातातील मृतांना श्रद्धांजली

By चंद्रकांत शेळके | Updated: May 15, 2023 22:52 IST

कामाचा कितीही व्याप असला तरी कोणालाही रविवारी कार्यालयात बोलावले जाणार नाही, अशी ग्वाही मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी दिली.

चंद्रकांत शेळके, अहमदनगर: नाशिक येथून प्रशासकीय काम करून परतत असताना जिल्हा परिषदेच्या दोन कर्मचाऱ्यांचा शनिवारी अपघाती मृत्यू झाला. ही न भरून येणारी हानी आहे. परंतु यातून इतर कर्मचाऱ्यांनी बोध घेऊन सक्तीने रात्रीचा प्रवास टाळावा. तसेच कामाचा कितीही व्याप असला तरी कोणालाही रविवारी कार्यालयात बोलावले जाणार नाही, अशी ग्वाही मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी दिली.

शनिवारी नाशिकहून प्रशासकीय काम करून परतत असताना नगर जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन विभागाचे कक्ष अधिकारी अशोक व्यवहारे आणि महिला बालकल्याण विभागाचे लिपिक विनायक कातोरे यांचा नगर-मनमाड रोडवर वांबोरी फाट्यानजीक झालेल्या अपघातात मृत्यू झाला. सोमवारी दुपारी या कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद सभागृहात शोकसभा घेऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी संजय कुमकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, प्रभारी कॅफो राजू लाकडझोडे, शिक्षणाधिकारी भास्करराव पाटील, जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीचे अध्यक्ष संजय कडूस, सुभाष कराळे, विकास साळुंके, शशिकांत रासकर आदींसह कर्मचारी उपस्थित होते.या दुर्दैवी घटनेमुळे सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण तसेच इतर गोष्टी समोर आल्या आहेत. सुरक्षितता म्हणून प्रत्येकाने रात्रीचा प्रवास टाळलाच पाहिजे. तसेच रविवारी कोणालाही कामावर बोलावण्यात येणार नाही. खूपच तातडीची गरज असेल तर शनिवारी कोणाला बोलावले तर संबंधित खातेप्रमुखानेही उपस्थित राहावे. कामाचे योग्य वाटप व नियोजन केल्यास कोणत्याही कर्मचाऱ्यावर अतिरिक्त ताण येणार नाही. त्यादृष्टीने उपाययोजना कराव्यात, असे निर्देश येरेकर यांनी दिले.

संभाजी लांगोरे यांनी शासनाकडून किंवा जिल्हा परिषदेकडून आवश्यक ती मदत मृतांच्या कुटुंबीयांना देण्याची ग्वाही दिली. कर्मचाऱ्यांनी भावना व्यक्त करताना अतिरिक्त कामाचा ताण कमी करावा, रिक्त पदे भरावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर