शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

जिल्हा परिषद शोकसभेत अपघातातील मृतांना श्रद्धांजली

By चंद्रकांत शेळके | Updated: May 15, 2023 22:52 IST

कामाचा कितीही व्याप असला तरी कोणालाही रविवारी कार्यालयात बोलावले जाणार नाही, अशी ग्वाही मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी दिली.

चंद्रकांत शेळके, अहमदनगर: नाशिक येथून प्रशासकीय काम करून परतत असताना जिल्हा परिषदेच्या दोन कर्मचाऱ्यांचा शनिवारी अपघाती मृत्यू झाला. ही न भरून येणारी हानी आहे. परंतु यातून इतर कर्मचाऱ्यांनी बोध घेऊन सक्तीने रात्रीचा प्रवास टाळावा. तसेच कामाचा कितीही व्याप असला तरी कोणालाही रविवारी कार्यालयात बोलावले जाणार नाही, अशी ग्वाही मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी दिली.

शनिवारी नाशिकहून प्रशासकीय काम करून परतत असताना नगर जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन विभागाचे कक्ष अधिकारी अशोक व्यवहारे आणि महिला बालकल्याण विभागाचे लिपिक विनायक कातोरे यांचा नगर-मनमाड रोडवर वांबोरी फाट्यानजीक झालेल्या अपघातात मृत्यू झाला. सोमवारी दुपारी या कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद सभागृहात शोकसभा घेऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी संजय कुमकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, प्रभारी कॅफो राजू लाकडझोडे, शिक्षणाधिकारी भास्करराव पाटील, जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीचे अध्यक्ष संजय कडूस, सुभाष कराळे, विकास साळुंके, शशिकांत रासकर आदींसह कर्मचारी उपस्थित होते.या दुर्दैवी घटनेमुळे सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण तसेच इतर गोष्टी समोर आल्या आहेत. सुरक्षितता म्हणून प्रत्येकाने रात्रीचा प्रवास टाळलाच पाहिजे. तसेच रविवारी कोणालाही कामावर बोलावण्यात येणार नाही. खूपच तातडीची गरज असेल तर शनिवारी कोणाला बोलावले तर संबंधित खातेप्रमुखानेही उपस्थित राहावे. कामाचे योग्य वाटप व नियोजन केल्यास कोणत्याही कर्मचाऱ्यावर अतिरिक्त ताण येणार नाही. त्यादृष्टीने उपाययोजना कराव्यात, असे निर्देश येरेकर यांनी दिले.

संभाजी लांगोरे यांनी शासनाकडून किंवा जिल्हा परिषदेकडून आवश्यक ती मदत मृतांच्या कुटुंबीयांना देण्याची ग्वाही दिली. कर्मचाऱ्यांनी भावना व्यक्त करताना अतिरिक्त कामाचा ताण कमी करावा, रिक्त पदे भरावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर