शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसात आदिवासी कुटुंबांना मिळणार शिधापत्रिका

By admin | Updated: September 22, 2015 00:22 IST

अहमदनगर : शासनाच्या अनास्थेमुळे गणेशवाडी (जखणगाव, ता. नगर) येथील आदिवासी कुटुंबे शिधापत्रिकेपासून वंचित असल्याचे वृत्त आज ‘लोकमत’ मध्ये प्रसिद्ध होताच शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली.

अहमदनगर : शासनाच्या अनास्थेमुळे गणेशवाडी (जखणगाव, ता. नगर) येथील आदिवासी कुटुंबे शिधापत्रिकेपासून वंचित असल्याचे वृत्त आज ‘लोकमत’ मध्ये प्रसिद्ध होताच शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. दुर्लक्षीत गणेशवाडीत आज सकाळीच ही यंत्रणा पोहोचली. दोन दिवसात या आदिवासी कुटुंबांना शिधापत्रिका मिळवून देऊ, असे आश्वासन तहसीलदार सुधीर पाटील यांनी देऊन तत्काळ त्याची कार्यवाही सुरू केली.जखणगाव शिवारात गणेशवाडी ही आदिवासींची वस्ती आहे. वर्षानुवर्षे हे कुटुंब मोलमजुरी करून तेथे वास्तव्यास आहेत. मात्र यातील बहुतांशी कुटुंबांकडे शिधापत्रिकाच नसल्याने त्यांना शासकीय योजना, शिष्यवृत्ती व इतर लाभांपासून वंचित राहावे लागे. शिधापत्रिका मिळविण्यासाठी आदिवासींनी शासनाची दारे झिजवली. मात्र, त्यांचा ‘आवाज’ शासनाला ऐकूच आला नाही. ‘लोकमत’ने सोमवारी शासकीय यंत्रणेच्या अनास्थेमुळे या आदिवासी कुटुंबांची करूण कहानी प्रसिद्ध करताच, मंगळवारी सकाळीच ही यंत्रणा या वस्तीपर्यंत पोहोचली. तेथील कुटुंबाची माहिती घेऊन शिधापत्रिका नसणारी ३७ कुटुंबांची यादी तहसीलदार पाटील यांनी तयार करून घेतली. विद्यार्थ्यांना शासकीय शिष्यवृत्ती व इतर योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांना बोनाफाईड प्रमाणपत्र तयार करण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या. सर्व बाबींची पूर्तता करून या आदिवासी कुटुंबांना दोन दिवसात शिधापत्रिका मिळवून देण्याचे आश्वासन पाटील यांनी देऊन त्याबाबतची कार्यवाही मंडलाधिकारी व तलाठी यांना करण्याचे आदेश दिले. या वस्तीमधील एकही कुटुंब शिधापत्रिकेपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी यंत्रणेला दिल्या. (तालुका प्रतिनिधी)