शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता...
2
“निवडणूक आयुक्तांना नेपाळला पाठवा, तिथेही भाजपा सरकार स्थापन करेल”; कुणाल कामराची टीका
3
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
4
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
5
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
6
मी काय बोललो समजलं का? धर्मेंद्र यांच्या प्रकरणावरुन 'भिडू'ने पापाराझींची मराठीत घेतली शाळा
7
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
8
Kuldeep Yadav: कुलदीप यादवच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद, घरच्या मैदानावर घेतल्या १५० विकेट्स!
9
Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम
10
कोण आहेत नागपूरचे सुपुत्र आयपीएस विजय साखरे ? मराठमोळ्या अधिकाऱ्याकडे दिल्लीतील स्फोटप्रकरणी एनआयए पथकाचे नेतृत्व
11
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
12
पर्सनल लोन घेताय? केवळ व्याजदर नका पाहू! 'या' Hidden Charges मुळे कर्ज बनते डोकेदुखी!
13
अंता पोटनिवडणुकीत १५९ मतांमुळे भाजपाची लाज राखली; मात्र काँग्रेस उमेदवारानं मारली बाजी
14
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
15
Nitin Gilbile: कारमध्येच मित्राला घातल्या गोळ्या, नितीन गिलबिले हत्या प्रकरणात लोणावळ्यात एकाला अटक
16
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
18
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
19
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
20
Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
Daily Top 2Weekly Top 5

दौंड मनमाड रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाची चाचणी, बेलापूर ते पुणतांबा काम पूर्ण

By शिवाजी पवार | Updated: April 4, 2023 14:06 IST

मार्गावरील एकूण ८१ किमी अंतराची चाचणी पूर्ण झाल्याची माहिती उपमुख्य अभियंता दीपक कुमार यांनी दिली.

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : दौंड-मनमाड रेल्वेमार्गावरील दुहेरीकरणाच्या कामातील बेलापूर ते पुणतांबा या २१ किलोमीटर अंतराची चाचणी घेण्यात आली आहे. लवकरच नगर ते मनमाड पर्यंतचे काम पूर्ण होणार असून यामुळे रेल्वे प्रवास जलद होणार आहे. शिर्डीला येणाऱ्या भाविकांनाही त्याचा लाभ होणार आहे.

दौंड मनमाड रेल्वेमार्गावर गाड्यांना आता विजेवरील इंजिनचा वापर होत आहे. गेल्या तीन वर्षांपासून नगर ते मनमाड दुहेरीकरणाचे काम सुरू आहे. यापूर्वी कोपरगाव ते येवला व येवला ते अंकाई, अंकाई ते अंकाई किल्ला, अंकाई किल्ला ते मनमाड, कोपरगाव ते कान्हेगाव या मार्गाची यशस्वी चाचणी घेण्यात होती.

मार्गावरील एकूण ८१ किमी अंतराची चाचणी पूर्ण झाल्याची माहिती उपमुख्य अभियंता दीपक कुमार यांनी दिली. दौंड ते मनमाड रेल्वे मार्गात नगरच्या रेल्वे स्थानकाचा महत्वपूर्ण टप्पा येतो. मात्र त्यावर एकेरी मार्ग असल्यामुळे रेल्वेगाड्यांचा वेग मर्यादित राहत होता. दोन गाड्या एकाच वेळी मार्गावर आल्यास एका गाडीला थांबा द्यावा लागत होता. त्यामुळे अनावश्यक वेळ खर्च होत होता.

आता मात्र दुहेरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. २०२३ अखेर काम पूर्ण करण्याचा रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळे रेल्वे ताशी १२५ प्रति किमी वेगाने धावणार आहे. पहिल्या टप्प्यात नगर ते मनमाड व दुसऱ्या टप्प्यात नगर ते दौंड असे काम पूर्णत्वास येणार आहे.

अशी झाली चाचणीवरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बेलापूर ते पुणतांबा दुहेरीकरणाच्या कामाची चाचणी पार पडली. यावेळी रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा, मुख्य प्राशकीय अधिकारी विवेककुमार गुप्ता, मुख्य अभियंता दिनेश कटारिया, उप मुख्य अभियंता दीपक कुमार, कार्यकारी अभियंता संदीप सिन्हा ,कार्यकारी अभियंता डी. पी. पटेल, अभियंता धर्मेंद्र कुमार, सुधांशू कुमार, प्रगती पटेल उपस्थित होते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर