शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दौंड मनमाड रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाची चाचणी, बेलापूर ते पुणतांबा काम पूर्ण

By शिवाजी पवार | Updated: April 4, 2023 14:06 IST

मार्गावरील एकूण ८१ किमी अंतराची चाचणी पूर्ण झाल्याची माहिती उपमुख्य अभियंता दीपक कुमार यांनी दिली.

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : दौंड-मनमाड रेल्वेमार्गावरील दुहेरीकरणाच्या कामातील बेलापूर ते पुणतांबा या २१ किलोमीटर अंतराची चाचणी घेण्यात आली आहे. लवकरच नगर ते मनमाड पर्यंतचे काम पूर्ण होणार असून यामुळे रेल्वे प्रवास जलद होणार आहे. शिर्डीला येणाऱ्या भाविकांनाही त्याचा लाभ होणार आहे.

दौंड मनमाड रेल्वेमार्गावर गाड्यांना आता विजेवरील इंजिनचा वापर होत आहे. गेल्या तीन वर्षांपासून नगर ते मनमाड दुहेरीकरणाचे काम सुरू आहे. यापूर्वी कोपरगाव ते येवला व येवला ते अंकाई, अंकाई ते अंकाई किल्ला, अंकाई किल्ला ते मनमाड, कोपरगाव ते कान्हेगाव या मार्गाची यशस्वी चाचणी घेण्यात होती.

मार्गावरील एकूण ८१ किमी अंतराची चाचणी पूर्ण झाल्याची माहिती उपमुख्य अभियंता दीपक कुमार यांनी दिली. दौंड ते मनमाड रेल्वे मार्गात नगरच्या रेल्वे स्थानकाचा महत्वपूर्ण टप्पा येतो. मात्र त्यावर एकेरी मार्ग असल्यामुळे रेल्वेगाड्यांचा वेग मर्यादित राहत होता. दोन गाड्या एकाच वेळी मार्गावर आल्यास एका गाडीला थांबा द्यावा लागत होता. त्यामुळे अनावश्यक वेळ खर्च होत होता.

आता मात्र दुहेरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. २०२३ अखेर काम पूर्ण करण्याचा रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळे रेल्वे ताशी १२५ प्रति किमी वेगाने धावणार आहे. पहिल्या टप्प्यात नगर ते मनमाड व दुसऱ्या टप्प्यात नगर ते दौंड असे काम पूर्णत्वास येणार आहे.

अशी झाली चाचणीवरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बेलापूर ते पुणतांबा दुहेरीकरणाच्या कामाची चाचणी पार पडली. यावेळी रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा, मुख्य प्राशकीय अधिकारी विवेककुमार गुप्ता, मुख्य अभियंता दिनेश कटारिया, उप मुख्य अभियंता दीपक कुमार, कार्यकारी अभियंता संदीप सिन्हा ,कार्यकारी अभियंता डी. पी. पटेल, अभियंता धर्मेंद्र कुमार, सुधांशू कुमार, प्रगती पटेल उपस्थित होते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर