शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

कोपरगावला ७९ गावात वृक्ष लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 16:41 IST

पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने तालुक्यातील ७९ गावांमध्ये लाखोे वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे.

रियाज सय्यद

कोपरगाव : पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने तालुक्यातील ७९ गावांमध्ये लाखोे वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. तालुका हरित करण्याचा संकल्प वनविभाग, सामाजिक वनीकरण, सूर्यतेज संस्था तसेच इतर काही संघटनांनी सोडला आहे. त्यामुळे तालुका हरित होण्यास वेळ लागणार नाही. एकेकाळी तालुक्यात मुबलक पाणी व जंगल असल्याने त्याची ओळख ‘कॅलिफोर्निया’ म्हणून झाली होती. या भागात खासगी व सहकारी साखर कारखानदारी आली. त्यानंतरच्या काळात गोदावरी नदीचे पाणी आटले. जंगल तोड व अस्वच्छता यामुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचा ºहास होत गेला. पर्यावरण रक्षणाऐवजी दुर्लक्ष झाले. गोदापात्रातून अमर्याद वाळू उपसा केला गेला. वृक्षांची बेसुमार कत्तल, सांडपाणी, कचरा व्यवस्थापनाचा अभाव आदी विविध गोष्टींमुळे पर्यावरणावर कुºहाड कोसळली. परिणामी प्रदूषण वाढून तापमानात कमालीचा बदल झाला. हवेतील प्राणवायू कमी होऊन गारवा देखील नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. उष्णता प्रचंड वाढून तापमानाने उच्चांक गाठला आहे. पर्यावरण वाचविण्यासाठी वृक्षारोपण हाच सर्वात महत्वाचा पर्याय आहे म्हणून वन विभाग, सामाजिक वनीकरण, सूर्यतेज संस्थेसह विविध संघटनांनी वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. तालुक्यातील ७९ ग्रामपंचायतींना प्रत्येकी १ हजार ३३ वृक्ष देऊन गावा-गावांमध्ये लिंब, बाभळ, सीताफळ, वड, पिंपळ, उंबर, आंबा आदी विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. संवत्सरच्या रोपवनात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले आहे. त्यातून पर्यावरणाचे रक्षण होण्यास निश्चितच चांगली मदत होणार आहे.पर्यावरण वाचविण्यासाठी वृक्षारोपणाबरोबरच कचरा व सांडपाणी व्यवस्थापन महत्वाचे आहे. गोदावरी नदीतून वाळू उपसा झालेल्या ठिकाणी खडीचा बारीक चुरा टाकून भर टाकल्यास योग्य होईल. पशु-पक्षी, जनावरे, सरपटणारे प्राणी, बेल-फळे आदींचा पर्यावरण रक्षणात मोठा वाटा आहे. त्यांचे जतन होणे गरजेचे आहे. वाहनांचा धूर व सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन केले गेले पाहिजे. त्यासाठी लोकसहभाग अतिशय महत्वाचा आहे. -संतोष जाधव, वन संरक्षक.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगाव