शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

कोपरगावला ७९ गावात वृक्ष लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 16:41 IST

पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने तालुक्यातील ७९ गावांमध्ये लाखोे वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे.

रियाज सय्यद

कोपरगाव : पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने तालुक्यातील ७९ गावांमध्ये लाखोे वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. तालुका हरित करण्याचा संकल्प वनविभाग, सामाजिक वनीकरण, सूर्यतेज संस्था तसेच इतर काही संघटनांनी सोडला आहे. त्यामुळे तालुका हरित होण्यास वेळ लागणार नाही. एकेकाळी तालुक्यात मुबलक पाणी व जंगल असल्याने त्याची ओळख ‘कॅलिफोर्निया’ म्हणून झाली होती. या भागात खासगी व सहकारी साखर कारखानदारी आली. त्यानंतरच्या काळात गोदावरी नदीचे पाणी आटले. जंगल तोड व अस्वच्छता यामुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचा ºहास होत गेला. पर्यावरण रक्षणाऐवजी दुर्लक्ष झाले. गोदापात्रातून अमर्याद वाळू उपसा केला गेला. वृक्षांची बेसुमार कत्तल, सांडपाणी, कचरा व्यवस्थापनाचा अभाव आदी विविध गोष्टींमुळे पर्यावरणावर कुºहाड कोसळली. परिणामी प्रदूषण वाढून तापमानात कमालीचा बदल झाला. हवेतील प्राणवायू कमी होऊन गारवा देखील नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. उष्णता प्रचंड वाढून तापमानाने उच्चांक गाठला आहे. पर्यावरण वाचविण्यासाठी वृक्षारोपण हाच सर्वात महत्वाचा पर्याय आहे म्हणून वन विभाग, सामाजिक वनीकरण, सूर्यतेज संस्थेसह विविध संघटनांनी वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. तालुक्यातील ७९ ग्रामपंचायतींना प्रत्येकी १ हजार ३३ वृक्ष देऊन गावा-गावांमध्ये लिंब, बाभळ, सीताफळ, वड, पिंपळ, उंबर, आंबा आदी विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. संवत्सरच्या रोपवनात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले आहे. त्यातून पर्यावरणाचे रक्षण होण्यास निश्चितच चांगली मदत होणार आहे.पर्यावरण वाचविण्यासाठी वृक्षारोपणाबरोबरच कचरा व सांडपाणी व्यवस्थापन महत्वाचे आहे. गोदावरी नदीतून वाळू उपसा झालेल्या ठिकाणी खडीचा बारीक चुरा टाकून भर टाकल्यास योग्य होईल. पशु-पक्षी, जनावरे, सरपटणारे प्राणी, बेल-फळे आदींचा पर्यावरण रक्षणात मोठा वाटा आहे. त्यांचे जतन होणे गरजेचे आहे. वाहनांचा धूर व सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन केले गेले पाहिजे. त्यासाठी लोकसहभाग अतिशय महत्वाचा आहे. -संतोष जाधव, वन संरक्षक.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगाव