शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

कोपरगावला ७९ गावात वृक्ष लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 16:41 IST

पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने तालुक्यातील ७९ गावांमध्ये लाखोे वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे.

रियाज सय्यद

कोपरगाव : पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने तालुक्यातील ७९ गावांमध्ये लाखोे वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. तालुका हरित करण्याचा संकल्प वनविभाग, सामाजिक वनीकरण, सूर्यतेज संस्था तसेच इतर काही संघटनांनी सोडला आहे. त्यामुळे तालुका हरित होण्यास वेळ लागणार नाही. एकेकाळी तालुक्यात मुबलक पाणी व जंगल असल्याने त्याची ओळख ‘कॅलिफोर्निया’ म्हणून झाली होती. या भागात खासगी व सहकारी साखर कारखानदारी आली. त्यानंतरच्या काळात गोदावरी नदीचे पाणी आटले. जंगल तोड व अस्वच्छता यामुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचा ºहास होत गेला. पर्यावरण रक्षणाऐवजी दुर्लक्ष झाले. गोदापात्रातून अमर्याद वाळू उपसा केला गेला. वृक्षांची बेसुमार कत्तल, सांडपाणी, कचरा व्यवस्थापनाचा अभाव आदी विविध गोष्टींमुळे पर्यावरणावर कुºहाड कोसळली. परिणामी प्रदूषण वाढून तापमानात कमालीचा बदल झाला. हवेतील प्राणवायू कमी होऊन गारवा देखील नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. उष्णता प्रचंड वाढून तापमानाने उच्चांक गाठला आहे. पर्यावरण वाचविण्यासाठी वृक्षारोपण हाच सर्वात महत्वाचा पर्याय आहे म्हणून वन विभाग, सामाजिक वनीकरण, सूर्यतेज संस्थेसह विविध संघटनांनी वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. तालुक्यातील ७९ ग्रामपंचायतींना प्रत्येकी १ हजार ३३ वृक्ष देऊन गावा-गावांमध्ये लिंब, बाभळ, सीताफळ, वड, पिंपळ, उंबर, आंबा आदी विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. संवत्सरच्या रोपवनात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले आहे. त्यातून पर्यावरणाचे रक्षण होण्यास निश्चितच चांगली मदत होणार आहे.पर्यावरण वाचविण्यासाठी वृक्षारोपणाबरोबरच कचरा व सांडपाणी व्यवस्थापन महत्वाचे आहे. गोदावरी नदीतून वाळू उपसा झालेल्या ठिकाणी खडीचा बारीक चुरा टाकून भर टाकल्यास योग्य होईल. पशु-पक्षी, जनावरे, सरपटणारे प्राणी, बेल-फळे आदींचा पर्यावरण रक्षणात मोठा वाटा आहे. त्यांचे जतन होणे गरजेचे आहे. वाहनांचा धूर व सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन केले गेले पाहिजे. त्यासाठी लोकसहभाग अतिशय महत्वाचा आहे. -संतोष जाधव, वन संरक्षक.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगाव