शहरं
Join us  
Trending Stories
1
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
2
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
3
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
4
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
5
त्रिभाषा धोरणाला राज्यभरात कसा प्रतिसाद? डॉ. नरेंद्र जाधव म्हणाले, “पहिलीपासून हिंदी सक्ती...”
6
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
7
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
8
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
9
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
10
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
11
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
12
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
13
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
14
Afghanistan Earthquake : भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान
15
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
16
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट
17
Life Lesson: प्रत्येकाची वेळ येते, पण तयारी असावी लागते शेफाली वर्मासारखी आणि 'या' गोष्टीसारखी!
18
जामताडा बनण्याच्या मार्गावर 'हे' शहर; 615 सायबर ठगांना अटक, 100 कोटींची फसवणूक उघड
19
ICC Women's World Cup Winners : "विजयी विश्व तिरंगा प्यारा..." भारतीय 'रन'रागणींनी रचला इतिहास
20
"मला २० लाख कॅश द्या, तरच वरात घेऊन येईन"; नवरदेवाचा ऐनवेळी लग्नास नकार, मागितला हुंडा

सत्तरीतले वयोवृद्ध करताहेत पत्नीवर उपचार; दिवसभर काम, हॉस्पिटलमध्येच मुक्काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2020 03:39 IST

कमलबाईंच्या दोन्ही किडन्या अडीच वर्षांपूर्वी निकामी झाल्या. तेव्हापासून त्या नगर येथील आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येत आहेत.

सुदाम देशमुखअहमदनगर :  ‘तेल आलं संपत तरी, दुसऱ्यासाठी तेवतेय वात, काठीपेक्षा आतला आधार, सांगतो हातामधला हात’ या एका कवितेच्या ओळीची अनुभूती सध्या येथील आनंदऋषीजी रुग्णालयाच्या आवारात मिळते आहे. दोन्ही किडन्या निकामी झाल्याने जगण्याशी लढा देणाऱ्या ६५ वर्षांच्या आजीबाईंनी ‘आता घरी नकोच, जे काही जगायचे आहे, ते रुग्णालयातच जगायचे’ असा ठाम निर्धार केला आहे. त्यांच्या या निर्धाराला वडापावच्या गाडीवर काम करणाऱ्या पतीनेही बळ दिले आहे. ही करुण कहाणी आहे भगवानगडाच्या पायथ्याशी असलेल्या बीड जिल्ह्यातील कमलबाई आणि साहेबराव बटुळे (रा. घोगस पारगाव, ता. शिरूर कासार) या वृद्ध दाम्पत्याची.

कमलबाईंच्या दोन्ही किडन्या अडीच वर्षांपूर्वी निकामी झाल्या. तेव्हापासून त्या नगर येथील आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येत आहेत. मात्र, गेल्या अडीच महिन्यांपासून त्यांनी रुग्णालयातच आपला मुक्काम कायम केला आहे. कमलबाई यांना तीन मुले, सुना, नातवंडे आहेत. मात्र, त्यांचीही आर्थिक परिस्थिती जेमतेम असून ते सर्व ऊसतोडणीसाठी बाहेरच्या जिल्ह्यात गेलेले आहेत. किडन्या निकामी झाल्याने त्यांना आठवड्यातून एकदा किंवा दोनवेळा डायलिसिस करावे लागते. मात्र, घोगस पारगाव ते अहमदनगर या लांबच्या अंतराचा प्रवास करणे आता अशक्य झाले आहे. त्यांना या जागेवरून उठणेही अवघड आहे.

मुले-नातेवाईक यांच्या मदतीची अपेक्षा न ठेवता स्वत: वडापावच्या गाडीवर काम करतो आहे. अडीच वर्षांपासून रुग्णालयात घरून ये-जा करतो. आता पैसेही नाहीत आणि ताकदही राहिली नाही. जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत कामही करणार आणि पत्नीला आधारही देणार आहे.- साहेबराव गणपत बटुळे

माझ्या खाण्या-पिण्याची, औषधांची व्यवस्था व्हावी म्हणून पती सत्तरीतही राबत आहेत. कोणालाच त्रास नको म्हणून इथेच राहते आहे. इथे रुग्णांच्या नातेवाईंकांचे दु:ख जाणून घेते, त्यांनाही धीर देते. - कमलबाई बटुळे