शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

एसटीच्या लाल डब्यातून प्रवास : शेतकरी भरडले, पाच वर्षे नुसत्या बाता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 11:26 IST

‘निवडणुका सुरू झाल्यात. दोन्ही बाजूचे उमेदवार अर्ज भरायच्या अगुदर आमच्या गावात येऊन गेले. पण खरं सांगू का...शेतकरी लई भरडलाय’ लोकसभा निवडणुकीचा कानोसा घेण्यासाठी ‘लोकमत’ने एस. टी. बसमधून ‘लोकमत’ जाणून घेण्यासाठी सुरू केलेल्या वारीदरम्यान ब्राह्मणीचे सदाशिव हापसे सांगत होते.

ठळक मुद्देश्रीरामपूर-अहमदनगर 65 कि.मी.

मिलिंदकुमार साळवेअहमदनगर : ‘निवडणुका सुरू झाल्यात. दोन्ही बाजूचे उमेदवार अर्ज भरायच्या अगुदर आमच्या गावात येऊन गेले. पण खरं सांगू का...शेतकरी लई भरडलाय’ लोकसभा निवडणुकीचा कानोसा घेण्यासाठी ‘लोकमत’ने एस. टी. बसमधून ‘लोकमत’ जाणून घेण्यासाठी सुरू केलेल्या वारीदरम्यान ब्राह्मणीचे सदाशिव हापसे सांगत होते.निवडणुकीतील ‘लोकमत’ चाचपून पाहण्यासाठी सोमवारी सकाळी श्रीरामपूर ते अहमदनगर या ६५ किलोमीटरच्या प्रवासाला एस. टी. बसमधून सुरूवात झाली. सकाळी अकराची हिरव्या रंगाची श्रीरामपूर-पुणे विनाथांबा फुल्ल खचाखच भरलेली होती. उभं रहायलाही जागा नव्हती. कंडाक्टर तिकिटं देऊनही खाली उतरणार होते. ऊन तापायला सुरूवात झाली होती. प्रवाशांच्या अंगातून घाम निघत होता. बुकिंग करून कंडाक्टर ड्रायव्हरकडं प्रवाशांचा रिपोर्ट देऊन उतरला. अन् आमचा श्रीरामपूर-अहमदनगर प्रवास सुरू झाला. हापसे सांगू लागले, शेतकऱ्यांचे लई हाल हायेत. यावर्षी तर दुष्काळात शेतकरी भरडून निघालाय जाम. शेतमालाला काही भाव नाही. कांदा तर पार मातीमोल चाललाय. आमच्या राहुरी तालुक्यात वांबोरी चारी योजना झाली. पण तिला पाणीच सोडत नाहीत, तर तिचा उपयोग काय? निवडणुकीत शेतकऱ्यांचे, सर्वसामान्यांचे प्रश्नच दिसत नाहीत. त्याच्यावर कोणीच बोलत नाही. चर्चा करीत नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायला उमेदवारांना, पुढाºयांना बोलायला वेळ नाही. नुसतेच एकमेकांवर चिखलफेक सुरू झालीय. आताच्या खासदाराने एक सभामंडप तेवढा केलाय आमच्या गावात स्मशानभूमीजवळ. तिकडंबी कोणी जात नाहीत. रस्त्याचे काही कामं सुरू झाले, पण तेबी अर्धे अर्धेच. देवळालीत जाणारा रस्ता पहा, डांबर गायब झालंय. नुसती खडी राहिलीय. नुसता धुराळा उडतोय.’काय मावशी काय म्हणतीय निवडणूक? शेजारच्या असं विचारल्यावर अंजनाबाई कांदळकर बोलत्या झाल्या,‘कह्याची निवडणूक भाऊ. आपल्या पोटाची खळगी आपल्यालाच भरायचीय ना भाऊ. त्यो मोदी म्हणला व्हता, पंधरा लाख बँकित जमा व्हतील. पण कह्याचं काय? नुसत्याच बाता. पोटाला चिमटा काढून पोरं शिकविलेत. पण त्यांच्या हाताला काम नाही. शिकून सवरून पोरांना नोकºया न्हायीत. काय फायदाहे आपल्याला निवडणुकीचा. समदे सारखेच.’‘समोसे....समोसे....दस के दो...दस के दो....म्हणत राहुरी बसस्थानकात फेरीवाले बसमध्ये घुसले. कुणाच्या हातात समोसे, कुणाच्या पॉपकॉर्न तर कुणाच्या हातात पाण्याच्या बाटल्या. त्यातल्या हारूणभाईला म्हटलं क्यो भाई क्या बोल रहा है इलेक्शन? तर तो सांगू लागला‘अपनेकू क्या फायदा है उसका. हम लोग सबेरे आठ-नऊ बजेच बसस्टँड आते है. कोईभी चुनके आया, तोभी अपनेकु ये काम तो करनाच पडता ना. सर्व्हिसवाले, डॉक्टर, बिझनेसवाल्यांना पैशाची हमी तरी हाये. पण आमच्या सारखे हातावर पोट असणारे अन् शेतकºयाचे लय हाल. पण इलेक्शनमधी याच्यावर कोणीच बोलत नाही,’ हारूणभाई प्रवाशांना समोसे देता देता सांगत होते.राजूरहून नगरला निघालेले सुदामराव गिरवे बसमध्ये बसले. कशी काय निवडणूक? म्हटल्यावर हातातला मोबाईल खिशात टाकल्यानंतर बोलू लागले. ‘काय सांगता येत नाही. पण अवघडच सारं. शेतकºयांचे हाल काही संपायला तयार नाही. हे पहा ना इद्यापीठाजवळ (कृषी विद्यापीठ) मुळा धरणाचं पाणी हाये म्हणून थोडं हिरवंगार तरी दिसतंय. पण दुसरीकडे पाण्यावाचून शेती न् जनावरं मरायला लागलीय. पाच वर्षात नुसत्या बड्या बड्या बाता झाल्या. परतेक्षात काही पदरात पडलं नाही. पोरांना नोकºया नाहीत. पंधरा लाख देऊ म्हटले व्हते. त्याचे पंधरा रूपये अजून कुठं कुणाच्या खात्यात जमा झाले नाहीत. मराठवाड्याच्या शेतकºयांना दुष्काळ अनुदान भेटलंय. पण आपल्याकडं नगर जिल्ह्यात तर ते बी नाही भेटलं.’खिडकीत कानाला मोबाईलचा इअरफोन लावलेल्या तरूणांना विचारलं मित्रा काय म्हणतेय निवडणूक? तर म्हटला, ‘मूड बरोबर नाहीये माझा. सॉरी बरं का.’ जागा नसल्यामुळे दांडक्याला धरून उभ्याने प्रवास करणारे सोपान जाधव म्हणाले, अहो श्रीरामपूर-नगरला एक तरी बस धड टायमिंगला हाये का? कंट्रोलच नाही कुणाचा’ गप्पा मारतामारता नगरचा सिव्हीलचा स्टॉप आला अन् गप्पांसोबत प्रवासही संपला.

 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९ahmednagar-pcअहमदनगर