शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

एसटीच्या लाल डब्यातून प्रवास : ‘आयटीआय’साठी नगरला जावे लागणे ही शरमेची बाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 11:44 IST

येथील विद्यार्थ्यांना ‘आयटीआय’सह उच्च शिक्षणासाठी नगर, पुण्याला जावे लागते. ही शरमेची बाब असून याचा विचार सर्वच लोकप्रतिनिधींनी करायला हवा, अशी संतप्त भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देनगर-शेवगाव 70 कि.मी.

गोरख देवकरअहमदनगर : येथील विद्यार्थ्यांना ‘आयटीआय’सह उच्च शिक्षणासाठी नगर, पुण्याला जावे लागते. ही शरमेची बाब असून याचा विचार सर्वच लोकप्रतिनिधींनी करायला हवा, अशी संतप्त भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. तर सतत पडणाऱ्या दुष्काळाबाबत उपाययोजना करण्यात शासन अपयशी ठरत असल्याच्या प्रतिक्रिया काही प्रवाशांनी व्यक्त केल्या.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ प्रतिनिधीने सोमवारी (दि.८) नगर-शेवगाव (व्हाया तिसगाव) एसटी बसमधील प्रवाशांशी संवाद साधला.प्रवासाच्या सुरुवातीपासूनच पाथर्डी, शेवगाव तालुक्यातील दुष्काळाचे वास्तव खिडकीतून सहज बाहेर डोकावले तरी जाणवत होते. रस्त्याच्या दुतर्फा नजर जाईल तिथपर्यंत उघडे बोडके डोंगर, कोरडे पडलेले ओढे, नाले, नांगरट केलेली शेते, असे चित्र दिसत होते. त्यामुळे दुष्काळाबाबत शेतकऱ्यांच्या भावना तीव्र असतील असा अंदाज होताच. अगदी तसेच झाले. ठराविक कालावधीत पडणारा दुष्काळ आता दर दोन वर्षांनी पडत आहे. त्यामुळे राज्यकर्त्यांनी त्यादृष्टीने काही तरी उपाययोजना करणे गरजेचे आहे. एकेकाळी कापसाचे आगार असलेल्या तालुक्याची आजचीही स्थिती काय? येथील जिनिंग का बंद पडतायत? यावर चर्चा होईल का? याबाबत कोणी काहीच बोलत नाही? असा संताप यावेळी शेवगाव येथील शेतकरी शंकर बडे यांनी व्यक्त केला.जायकवाडीत हजारो शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी गेल्या. अनेक गावे स्थलांतरीत झाली. मात्र पाणी वाटपाबाबत कायम दुजाभाव केला जातो. याशिवाय मुळा धरणाच्या ‘टेल’च्या भागात तालुक्यातील गावे येतात. या गावांना आवर्तनाचे पाणी मिळताना कायमच संघर्ष करावा लागतो, अशी खंत शेवगाव येथील राहुल घुले यांनी व्यक्त केली.कोणतेही सरकार आले तरी आमच्या आई-बापाला ऊसतोडणीला जावेच लागते. त्यांच्या दिनक्रमात काहीच बदल झालेला नाही. अमूक एक सरकार आले म्हणून त्यांना काही फायदा झाला, असे कधीच झाले नाही. मी आज २४ वर्षांचा आहे. दरवर्षी त्यांना ऊसतोडणीसाठी परजिल्ह्यात जावेच लागते. त्यामुळे कधीकधी असे वाटते की काहीच होणार नसेल, तर निवडणुका होतातच कशाला? अशी उद्विगनता राहुल हुलमुखे या नगर येथे उच्च शिक्षण घेत असलेल्या युवकाने व्यक्त केली.आम्ही मोदींनाच मतदान करतो!पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, माझ्याकडे पाहून मतदान करा. गेल्यावेळीही त्यांच्याकडे पाहूनच मतदान केले. त्यानंतर मागील पाच वर्षात आमच्या भागात किती विकासकामे झाली? असा उपरोधिक सवाल एका प्रवाशाने केला.प्रचारातून स्थानिक मुद्देच गायब!सध्या सुरू असलेल्या प्रचार सभांमध्ये सत्ताधारी अथवा विरोधक कोणीही त्या त्या भागातील स्थानिक मुद्यांवर बोलायला तयार नाही. एकमेकांची उणीदुणी आणि राष्टÑीय मुद्यांभोवतीच प्रचार सुरू आहे. त्यातून केवळ लोकांचे मनोरंजन होते. मुख्य मुद्दे बाजूलाच राहतात. नेत्यांनी स्थानिकांसाठी काय करणार? यावर भाष्य करायला हवे, अशी अपेक्षा बोधेगाव परिसरातील शरद काकडे यांनी व्यक्त केली.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९ahmednagar-pcअहमदनगर