शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

एसटीच्या लाल डब्यातून प्रवास : ‘आयटीआय’साठी नगरला जावे लागणे ही शरमेची बाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 11:44 IST

येथील विद्यार्थ्यांना ‘आयटीआय’सह उच्च शिक्षणासाठी नगर, पुण्याला जावे लागते. ही शरमेची बाब असून याचा विचार सर्वच लोकप्रतिनिधींनी करायला हवा, अशी संतप्त भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देनगर-शेवगाव 70 कि.मी.

गोरख देवकरअहमदनगर : येथील विद्यार्थ्यांना ‘आयटीआय’सह उच्च शिक्षणासाठी नगर, पुण्याला जावे लागते. ही शरमेची बाब असून याचा विचार सर्वच लोकप्रतिनिधींनी करायला हवा, अशी संतप्त भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. तर सतत पडणाऱ्या दुष्काळाबाबत उपाययोजना करण्यात शासन अपयशी ठरत असल्याच्या प्रतिक्रिया काही प्रवाशांनी व्यक्त केल्या.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ प्रतिनिधीने सोमवारी (दि.८) नगर-शेवगाव (व्हाया तिसगाव) एसटी बसमधील प्रवाशांशी संवाद साधला.प्रवासाच्या सुरुवातीपासूनच पाथर्डी, शेवगाव तालुक्यातील दुष्काळाचे वास्तव खिडकीतून सहज बाहेर डोकावले तरी जाणवत होते. रस्त्याच्या दुतर्फा नजर जाईल तिथपर्यंत उघडे बोडके डोंगर, कोरडे पडलेले ओढे, नाले, नांगरट केलेली शेते, असे चित्र दिसत होते. त्यामुळे दुष्काळाबाबत शेतकऱ्यांच्या भावना तीव्र असतील असा अंदाज होताच. अगदी तसेच झाले. ठराविक कालावधीत पडणारा दुष्काळ आता दर दोन वर्षांनी पडत आहे. त्यामुळे राज्यकर्त्यांनी त्यादृष्टीने काही तरी उपाययोजना करणे गरजेचे आहे. एकेकाळी कापसाचे आगार असलेल्या तालुक्याची आजचीही स्थिती काय? येथील जिनिंग का बंद पडतायत? यावर चर्चा होईल का? याबाबत कोणी काहीच बोलत नाही? असा संताप यावेळी शेवगाव येथील शेतकरी शंकर बडे यांनी व्यक्त केला.जायकवाडीत हजारो शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी गेल्या. अनेक गावे स्थलांतरीत झाली. मात्र पाणी वाटपाबाबत कायम दुजाभाव केला जातो. याशिवाय मुळा धरणाच्या ‘टेल’च्या भागात तालुक्यातील गावे येतात. या गावांना आवर्तनाचे पाणी मिळताना कायमच संघर्ष करावा लागतो, अशी खंत शेवगाव येथील राहुल घुले यांनी व्यक्त केली.कोणतेही सरकार आले तरी आमच्या आई-बापाला ऊसतोडणीला जावेच लागते. त्यांच्या दिनक्रमात काहीच बदल झालेला नाही. अमूक एक सरकार आले म्हणून त्यांना काही फायदा झाला, असे कधीच झाले नाही. मी आज २४ वर्षांचा आहे. दरवर्षी त्यांना ऊसतोडणीसाठी परजिल्ह्यात जावेच लागते. त्यामुळे कधीकधी असे वाटते की काहीच होणार नसेल, तर निवडणुका होतातच कशाला? अशी उद्विगनता राहुल हुलमुखे या नगर येथे उच्च शिक्षण घेत असलेल्या युवकाने व्यक्त केली.आम्ही मोदींनाच मतदान करतो!पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, माझ्याकडे पाहून मतदान करा. गेल्यावेळीही त्यांच्याकडे पाहूनच मतदान केले. त्यानंतर मागील पाच वर्षात आमच्या भागात किती विकासकामे झाली? असा उपरोधिक सवाल एका प्रवाशाने केला.प्रचारातून स्थानिक मुद्देच गायब!सध्या सुरू असलेल्या प्रचार सभांमध्ये सत्ताधारी अथवा विरोधक कोणीही त्या त्या भागातील स्थानिक मुद्यांवर बोलायला तयार नाही. एकमेकांची उणीदुणी आणि राष्टÑीय मुद्यांभोवतीच प्रचार सुरू आहे. त्यातून केवळ लोकांचे मनोरंजन होते. मुख्य मुद्दे बाजूलाच राहतात. नेत्यांनी स्थानिकांसाठी काय करणार? यावर भाष्य करायला हवे, अशी अपेक्षा बोधेगाव परिसरातील शरद काकडे यांनी व्यक्त केली.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९ahmednagar-pcअहमदनगर