शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

एसटीच्या लाल डब्यातून प्रवास : मतांची भीक मागून आमचा काय विकास करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 11:33 IST

‘जे आमच्याकडे मतांची भीक मागतात, ते आमचा काय विकास करणार? एकदा निवडणूक झाली की पाच वर्षे आमच्याकडे कोणी फिरकतही नाही.

अनिल लगडअहमदनगर : ‘जे आमच्याकडे मतांची भीक मागतात, ते आमचा काय विकास करणार? एकदा निवडणूक झाली की पाच वर्षे आमच्याकडे कोणी फिरकतही नाही. निवडणुकीत उमेदवारही लायकीचे नाहीत. जोपर्यंत उमेदवार लायकीचे देणार नाही तोपर्यंत मतदानच करणार नाही’ अशी प्रतिक्रिया अंबेजोगाईच्या एका प्रवाशाने देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या.‘लोकमत’ प्रतिनिधीने सोमवारी धानोरा-नगर या मार्गावर बीड-मुंबई एस.टी. बसमधील प्रवाशांच्या भावना जाणून घेतल्या. बीडच्या रामेश्वर शेळके या प्रवाशाने सांगितले की, गेल्या पाच वर्षात मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी चांगल्या घोषणा केल्या. पण, त्या घोषणाच ठरल्या. खरिपाचा विमा मंजूर.. इतके कोटी आले? रब्बीचा विमा मंजूर, इतके कोटी आले. दुष्काळी अनुदान हेक्टरी ४० हजार असे वृत्तपत्रात किंवा टीव्हीवर ऐकायला मिळते. परंतु बँकेत पासबुकवर एंट्री मारून पाहिले की त्यात काहीच दिसत नाही. मग मंजूर झालेले एवढे कोटी गेले कुठे? असा सवाल या प्रवाशाने व्यक्त केला. परंतु त्याने अनुदान मात्र नुकतेच जमा झाल्याने सांगितले.बीड जिल्ह्यात यंदा भीषण दुष्काळाचे सावट आहे. गेल्या वर्षापासून शेतकऱ्यांच्या शेतात कसलेच धान्य पिकले नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत आहे. गावोगावी पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. ही पाणी टंचाई अधिक बिकट होणार आहे. त्यातच लोकसभा निवडणुका आल्याने दुष्काळाकडे कोणाचे लक्ष नाही. यात सर्वसामान्य माणूस, शेतकरी भरडला जातोय. मतदान कोणाला करायचे? सगळे सारखेच आहेत, असे पाटोदा येथील सखाराम गर्जे या शेतकºयाने सांगितले.गेल्या पाच वर्षापासून बेरोजगारी वाढली आहे. मोदी सरकारने मोठ्या घोषणा केल्या, परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. कुठे काम मागायला गेले तर काम मिळत नाही, अशी खंत चिचोंडीपाटील येथून रोज नगरला कामानिमित्त येणाºया राजू काळे या युवकाने व्यक्त केली.बीड जिल्ह्यात मोदी सरकारच्या काळात रस्ते, रेल्वेचे मोठे काम झाले. दुष्काळी अनुदान, पीकविम्यातून मोठा निधी मिळाला. तसेच देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने मोदी हेच सक्षम नेतृत्व आहे, असे बीडच्या सागर लाटे या तरुणाने सांगितले.

 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९ahmednagar-pcअहमदनगर