शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या लाल डब्यातून प्रवास : मतांची भीक मागून आमचा काय विकास करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 11:33 IST

‘जे आमच्याकडे मतांची भीक मागतात, ते आमचा काय विकास करणार? एकदा निवडणूक झाली की पाच वर्षे आमच्याकडे कोणी फिरकतही नाही.

अनिल लगडअहमदनगर : ‘जे आमच्याकडे मतांची भीक मागतात, ते आमचा काय विकास करणार? एकदा निवडणूक झाली की पाच वर्षे आमच्याकडे कोणी फिरकतही नाही. निवडणुकीत उमेदवारही लायकीचे नाहीत. जोपर्यंत उमेदवार लायकीचे देणार नाही तोपर्यंत मतदानच करणार नाही’ अशी प्रतिक्रिया अंबेजोगाईच्या एका प्रवाशाने देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या.‘लोकमत’ प्रतिनिधीने सोमवारी धानोरा-नगर या मार्गावर बीड-मुंबई एस.टी. बसमधील प्रवाशांच्या भावना जाणून घेतल्या. बीडच्या रामेश्वर शेळके या प्रवाशाने सांगितले की, गेल्या पाच वर्षात मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी चांगल्या घोषणा केल्या. पण, त्या घोषणाच ठरल्या. खरिपाचा विमा मंजूर.. इतके कोटी आले? रब्बीचा विमा मंजूर, इतके कोटी आले. दुष्काळी अनुदान हेक्टरी ४० हजार असे वृत्तपत्रात किंवा टीव्हीवर ऐकायला मिळते. परंतु बँकेत पासबुकवर एंट्री मारून पाहिले की त्यात काहीच दिसत नाही. मग मंजूर झालेले एवढे कोटी गेले कुठे? असा सवाल या प्रवाशाने व्यक्त केला. परंतु त्याने अनुदान मात्र नुकतेच जमा झाल्याने सांगितले.बीड जिल्ह्यात यंदा भीषण दुष्काळाचे सावट आहे. गेल्या वर्षापासून शेतकऱ्यांच्या शेतात कसलेच धान्य पिकले नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत आहे. गावोगावी पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. ही पाणी टंचाई अधिक बिकट होणार आहे. त्यातच लोकसभा निवडणुका आल्याने दुष्काळाकडे कोणाचे लक्ष नाही. यात सर्वसामान्य माणूस, शेतकरी भरडला जातोय. मतदान कोणाला करायचे? सगळे सारखेच आहेत, असे पाटोदा येथील सखाराम गर्जे या शेतकºयाने सांगितले.गेल्या पाच वर्षापासून बेरोजगारी वाढली आहे. मोदी सरकारने मोठ्या घोषणा केल्या, परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. कुठे काम मागायला गेले तर काम मिळत नाही, अशी खंत चिचोंडीपाटील येथून रोज नगरला कामानिमित्त येणाºया राजू काळे या युवकाने व्यक्त केली.बीड जिल्ह्यात मोदी सरकारच्या काळात रस्ते, रेल्वेचे मोठे काम झाले. दुष्काळी अनुदान, पीकविम्यातून मोठा निधी मिळाला. तसेच देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने मोदी हेच सक्षम नेतृत्व आहे, असे बीडच्या सागर लाटे या तरुणाने सांगितले.

 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९ahmednagar-pcअहमदनगर