शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

एसटीच्या लाल डब्यातून प्रवास : मतांची भीक मागून आमचा काय विकास करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 11:33 IST

‘जे आमच्याकडे मतांची भीक मागतात, ते आमचा काय विकास करणार? एकदा निवडणूक झाली की पाच वर्षे आमच्याकडे कोणी फिरकतही नाही.

अनिल लगडअहमदनगर : ‘जे आमच्याकडे मतांची भीक मागतात, ते आमचा काय विकास करणार? एकदा निवडणूक झाली की पाच वर्षे आमच्याकडे कोणी फिरकतही नाही. निवडणुकीत उमेदवारही लायकीचे नाहीत. जोपर्यंत उमेदवार लायकीचे देणार नाही तोपर्यंत मतदानच करणार नाही’ अशी प्रतिक्रिया अंबेजोगाईच्या एका प्रवाशाने देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या.‘लोकमत’ प्रतिनिधीने सोमवारी धानोरा-नगर या मार्गावर बीड-मुंबई एस.टी. बसमधील प्रवाशांच्या भावना जाणून घेतल्या. बीडच्या रामेश्वर शेळके या प्रवाशाने सांगितले की, गेल्या पाच वर्षात मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी चांगल्या घोषणा केल्या. पण, त्या घोषणाच ठरल्या. खरिपाचा विमा मंजूर.. इतके कोटी आले? रब्बीचा विमा मंजूर, इतके कोटी आले. दुष्काळी अनुदान हेक्टरी ४० हजार असे वृत्तपत्रात किंवा टीव्हीवर ऐकायला मिळते. परंतु बँकेत पासबुकवर एंट्री मारून पाहिले की त्यात काहीच दिसत नाही. मग मंजूर झालेले एवढे कोटी गेले कुठे? असा सवाल या प्रवाशाने व्यक्त केला. परंतु त्याने अनुदान मात्र नुकतेच जमा झाल्याने सांगितले.बीड जिल्ह्यात यंदा भीषण दुष्काळाचे सावट आहे. गेल्या वर्षापासून शेतकऱ्यांच्या शेतात कसलेच धान्य पिकले नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत आहे. गावोगावी पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. ही पाणी टंचाई अधिक बिकट होणार आहे. त्यातच लोकसभा निवडणुका आल्याने दुष्काळाकडे कोणाचे लक्ष नाही. यात सर्वसामान्य माणूस, शेतकरी भरडला जातोय. मतदान कोणाला करायचे? सगळे सारखेच आहेत, असे पाटोदा येथील सखाराम गर्जे या शेतकºयाने सांगितले.गेल्या पाच वर्षापासून बेरोजगारी वाढली आहे. मोदी सरकारने मोठ्या घोषणा केल्या, परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. कुठे काम मागायला गेले तर काम मिळत नाही, अशी खंत चिचोंडीपाटील येथून रोज नगरला कामानिमित्त येणाºया राजू काळे या युवकाने व्यक्त केली.बीड जिल्ह्यात मोदी सरकारच्या काळात रस्ते, रेल्वेचे मोठे काम झाले. दुष्काळी अनुदान, पीकविम्यातून मोठा निधी मिळाला. तसेच देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने मोदी हेच सक्षम नेतृत्व आहे, असे बीडच्या सागर लाटे या तरुणाने सांगितले.

 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९ahmednagar-pcअहमदनगर