शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

एसटीच्या लाल डब्यातून प्रवास : पाच वर्षे अफवांचेच पीक आले; शेतक-यांची खदखद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 11:49 IST

मागच्या पाच वर्षांत ना शेतमालाला भाव मिळाले, ना अनुदान मिळाले़ शेतकऱ्यांसाठी घोषणा लाख झाल्या़ पण पदरात काहीच पडले नाही़

ठळक मुद्देनगर-श्रीगोंदा 70 कि.मी.

साहेबराव नरसाळेअहमदनगर : मागच्या पाच वर्षांत ना शेतमालाला भाव मिळाले, ना अनुदान मिळाले़ शेतकऱ्यांसाठी घोषणा लाख झाल्या़ पण पदरात काहीच पडले नाही़ अफवांचे पीक मात्र जोमदार उगवले, अशा शब्दात शेतकऱ्यांनी आपली खदखद ‘लोकमत’कडे व्यक्त केली़अहमदनगर ते श्रीगोंदा (वाळकी मार्गे) बसमधील प्रवाशांची ‘मन की बात’ ‘लोकमत’ने जाणून घेतली़ बसमध्ये शाळकरी मुले, मुलींची गर्दी मोठी होती़ डाव्या बाजूने मधल्या सीटवर एक वयोवृद्ध आजोबा बसलेले होते़ त्यांच्याशी गप्पा सुरु झाल्या़ प्रथम त्यांना शंका आली की हे एखाद्या उमेदवारासाठी सर्व्हे तर करीत नाही ना? पत्रकार असल्याचे सांगितल्यानंतर त्यांच्या मनातील खदखद हळूहळू बाहेर येऊ लागली़ सरकारवरची नाराजी व्यक्त करीत मोदी हे काहीच काम करीत नाहीत़ मात्र, अफवा पसरविण्यात ते माहीर आहेत, असे या आजोबांनी सांगितले़ ‘मागील पाच वर्षांत आम्हाला कोणतेही अनुदान मिळाले नाही, शेतमालाला भाव मिळाला नाही, नुकसानभरपाई देखील मिळाली नाही़ कर्जमाफी तर लबाडाखरचं आवतन ठरली़ अनेक घोषणा झाल्या़ पण हातात काहीच आलं नाही’, असं त्यांचं म्हणणं़ बºयाचवेळ विचारुनही त्यांनी नाव सांगण्याचे टाळले़ नावासाठी आग्रह धरला तेव्हा म्हणाले, काही दिवसापूर्वी तीन तरुण भेटले होते़ तुझ्यासारखीच माहिती विचारत होते़ त्यांनी आमचं नाव, गाव, पत्ताही लिहून घेतला़ त्यानंतर काही दिवसात दुसरे लोकं आले आणि आमच्या उमेदवाराने अमूक केले, तमूक केले़ तो सर्वांना मोफत उपचार देतो़ तुमची काही अडचण असेल तर सांगा़ आम्ही दूर करु, असे सांगत मतांसाठी लकडाच पाठशी लावला़ नाव सांगितले अन् भलतेच लचांड अंगाशी आले़ त्यामुळे तुम्हाला काय छापायचे ते छापा पण नाव नाही सांगणार हवं तर अडनाव हराळ आहे़ तेव्हढंच घ्या़’त्यांच्याशी बोलणं झाल्यानंतर मी मागच्या सीटवर बसलेल्या नाना पोपळघट यांच्याकडे गप्पा मारायला गेलो़ ते वडघुलला चालले होते़ ‘बाबा काय म्हणतेय लोकसभेची निवडणूक, असा प्रश्न त्यांना केला़ तर ते थोड्यावेळ निरखून पाहत राहिले अन् नंतर बोलले, ‘निवडणुकीचं काय आहे, येते आणि जाते़ आपल्याला काय फरक पडत नाही़ मत वाया जाऊ नये म्हणून करायंच कोणालाही़ ते एकदा निवडून आले की परत मतदार मेले की जिवंत आहेत, हेदेखील पहायला कोणी येत नाही़ कर्जमाफी झाली का, असे विचारल्यावर ते एकदमच उचकले़ कर्जमाफी जाऊ दे, आमच्या मालाला अगोदर भाव दे म्हणावं, सरकारला़ मागच्या वर्षी कसंबसं खाण्यापुरतं शेत पिकलं़ जे उरलं ते विकायला नेलं तर त्यालाही भाव नाही़ गाडीभाड्याचे पैसेही निघाले नाहीत़ आता उसनवारीचे पैसे फेडायला जातोय दुसरीकडे कामाला. तुम्हाला कोणता पक्ष आवडतो, असे विचारल्यावर पक्ष कोण पाहतो़ आपल्याकडं उमेदवार पाहून मत करायची सवय असते़ वरचा कोणीतरी नेता येतो आणि सांगतो आमूक एकाला मतदान करा़ आम्ही तेच करतो़

 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९ahmednagar-pcअहमदनगर