शहरं
Join us  
Trending Stories
1
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
2
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
3
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
4
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   
5
IND vs AUS : प्रितीच्या मोहऱ्यांची टीम इंडियाकडून हवा! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेत कुटल्या ४१३ धावा
6
“मोदींची सत्ता उलथवून टाकण्यासाठी राहुल गांधींसोबत एकत्र यायला अडचण नाही”: प्रकाश आंबेडकर
7
नोकरीच्या संधी कमी होणार? देशातील उत्पादन वाढ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर; 'या' कारणांचा थेट फटका
8
1 लाख 34 हजार रुपयांचा iphone 17 Pro Max बनवण्यासाठी किती खर्च येतो? आकडे ऐकून चक्रावून जाल...
9
दसरा मेळाव्यासाठी ६३ कोटींचा खर्च, शेतकऱ्यांना द्या; भाजपच्या मागणीवर ठाकरे म्हणाले, "उद्या बिल पाठवतो"
10
Dussehra 2025: दसऱ्याच्या मुहूर्तावर ११ लवंगांचा 'हा' विधी, दहन करेल तुमच्या आर्थिक अडचणी!
11
दिवाळीनंतर लगेच निवडणुकीचा धुराळा! राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघ आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर
12
“शिशुपालाप्रमाणे RSSची शंभरी भरली, मनुस्मृती, बंच ऑफ थॉटचे दहन करून संघ विसर्जित करा”: सपकाळ
13
समस्त बॉलिवूड हादरले! पैशांची तंगी होती, हा अभिनेता बनला ड्रग स्मगलर; ४० कोटींच्या ड्रगसह पकडले तेव्हा बिंग फुटले...
14
किती धोक्याची? सॅमसंगची स्मार्ट रिंग बॅटरी फुगली, बोटात खुपली; वापरकर्ता विमानतळावरून थेट हॉस्पिटलमध्ये
15
८ दिवसांच्या घसरणीला ब्रेक! RBI च्या घोषणेनंतर बाजारात जोरदार उसळी! टॉप गेनर्स-लूजर्स पाहा
16
भारतावर टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्पवर काय वेळ आली, कर्मचाऱ्यांना पगार द्यायला पैसे नाहीत; शटडाऊनची नामुष्की
17
जिंकलंस मित्रा! कॉन्स्टेबलने IPS बनून घेतला अपमानाचा बदला; बॅक टू बॅक क्रॅक केली UPSC
18
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
19
गुरुवारी दसरा २०२५: ‘अशी’ करा स्वामी सेवा, वर्षभर पुण्य लाभेल; देवी लक्ष्मी लाभच लाभ देईल!
20
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता

एसटीच्या लाल डब्यातून प्रवास : पाच वर्षे अफवांचेच पीक आले; शेतक-यांची खदखद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 11:49 IST

मागच्या पाच वर्षांत ना शेतमालाला भाव मिळाले, ना अनुदान मिळाले़ शेतकऱ्यांसाठी घोषणा लाख झाल्या़ पण पदरात काहीच पडले नाही़

ठळक मुद्देनगर-श्रीगोंदा 70 कि.मी.

साहेबराव नरसाळेअहमदनगर : मागच्या पाच वर्षांत ना शेतमालाला भाव मिळाले, ना अनुदान मिळाले़ शेतकऱ्यांसाठी घोषणा लाख झाल्या़ पण पदरात काहीच पडले नाही़ अफवांचे पीक मात्र जोमदार उगवले, अशा शब्दात शेतकऱ्यांनी आपली खदखद ‘लोकमत’कडे व्यक्त केली़अहमदनगर ते श्रीगोंदा (वाळकी मार्गे) बसमधील प्रवाशांची ‘मन की बात’ ‘लोकमत’ने जाणून घेतली़ बसमध्ये शाळकरी मुले, मुलींची गर्दी मोठी होती़ डाव्या बाजूने मधल्या सीटवर एक वयोवृद्ध आजोबा बसलेले होते़ त्यांच्याशी गप्पा सुरु झाल्या़ प्रथम त्यांना शंका आली की हे एखाद्या उमेदवारासाठी सर्व्हे तर करीत नाही ना? पत्रकार असल्याचे सांगितल्यानंतर त्यांच्या मनातील खदखद हळूहळू बाहेर येऊ लागली़ सरकारवरची नाराजी व्यक्त करीत मोदी हे काहीच काम करीत नाहीत़ मात्र, अफवा पसरविण्यात ते माहीर आहेत, असे या आजोबांनी सांगितले़ ‘मागील पाच वर्षांत आम्हाला कोणतेही अनुदान मिळाले नाही, शेतमालाला भाव मिळाला नाही, नुकसानभरपाई देखील मिळाली नाही़ कर्जमाफी तर लबाडाखरचं आवतन ठरली़ अनेक घोषणा झाल्या़ पण हातात काहीच आलं नाही’, असं त्यांचं म्हणणं़ बºयाचवेळ विचारुनही त्यांनी नाव सांगण्याचे टाळले़ नावासाठी आग्रह धरला तेव्हा म्हणाले, काही दिवसापूर्वी तीन तरुण भेटले होते़ तुझ्यासारखीच माहिती विचारत होते़ त्यांनी आमचं नाव, गाव, पत्ताही लिहून घेतला़ त्यानंतर काही दिवसात दुसरे लोकं आले आणि आमच्या उमेदवाराने अमूक केले, तमूक केले़ तो सर्वांना मोफत उपचार देतो़ तुमची काही अडचण असेल तर सांगा़ आम्ही दूर करु, असे सांगत मतांसाठी लकडाच पाठशी लावला़ नाव सांगितले अन् भलतेच लचांड अंगाशी आले़ त्यामुळे तुम्हाला काय छापायचे ते छापा पण नाव नाही सांगणार हवं तर अडनाव हराळ आहे़ तेव्हढंच घ्या़’त्यांच्याशी बोलणं झाल्यानंतर मी मागच्या सीटवर बसलेल्या नाना पोपळघट यांच्याकडे गप्पा मारायला गेलो़ ते वडघुलला चालले होते़ ‘बाबा काय म्हणतेय लोकसभेची निवडणूक, असा प्रश्न त्यांना केला़ तर ते थोड्यावेळ निरखून पाहत राहिले अन् नंतर बोलले, ‘निवडणुकीचं काय आहे, येते आणि जाते़ आपल्याला काय फरक पडत नाही़ मत वाया जाऊ नये म्हणून करायंच कोणालाही़ ते एकदा निवडून आले की परत मतदार मेले की जिवंत आहेत, हेदेखील पहायला कोणी येत नाही़ कर्जमाफी झाली का, असे विचारल्यावर ते एकदमच उचकले़ कर्जमाफी जाऊ दे, आमच्या मालाला अगोदर भाव दे म्हणावं, सरकारला़ मागच्या वर्षी कसंबसं खाण्यापुरतं शेत पिकलं़ जे उरलं ते विकायला नेलं तर त्यालाही भाव नाही़ गाडीभाड्याचे पैसेही निघाले नाहीत़ आता उसनवारीचे पैसे फेडायला जातोय दुसरीकडे कामाला. तुम्हाला कोणता पक्ष आवडतो, असे विचारल्यावर पक्ष कोण पाहतो़ आपल्याकडं उमेदवार पाहून मत करायची सवय असते़ वरचा कोणीतरी नेता येतो आणि सांगतो आमूक एकाला मतदान करा़ आम्ही तेच करतो़

 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९ahmednagar-pcअहमदनगर