शहरं
Join us  
Trending Stories
1
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
2
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
3
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
4
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
5
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
6
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
7
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
8
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
9
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
10
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
11
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
12
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
13
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
14
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
15
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
16
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
17
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
18
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
19
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
20
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले

राहुरीच्या ग्रामीण रूग्णालयाला हवी ट्रॉमा सेंटरची जोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 12:18 IST

राहुरी नगर परिषदेचा दवाखाना पुन्हा सुरू करून शासनाने ट्रॉमा सेंटर महात्मा फुले कृषी विद्यापीठात सुरू केले तर आरोग्याच्या प्रश्नाचा तिढा सुटण्यास मदत होईल़. त्या दृष्टिकोनातून आमदार प्राजक्त तनपुरे यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्याची गरज निर्माण झाली आहे़.

भाऊसाहेब येवले । राहुरी : येथील ग्रामीण रू ग्णालयाचा निधी मंजूर असूनही इमारतीचा प्रश्न मार्गी न लागल्याने सर्वसामान्य रूग्णांना हक्काच्या उपचारापासून दूर रहावे लागत आहे़. राहुरी नगर परिषदेचा दवाखाना पुन्हा सुरू करून शासनाने ट्रॉमा सेंटर महात्मा फुले कृषी विद्यापीठात सुरू केले तर आरोग्याच्या प्रश्नाचा तिढा सुटण्यास मदत होईल़. त्या दृष्टिकोनातून आमदार प्राजक्त तनपुरे यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्याची गरज निर्माण झाली आहे. राहुरी नगर परिषदेच्या दवाखान्याचे रूपांतर ग्रामीण रूग्णालयात करण्यात आले आहे. ग्रामीण रूग्णालयाची इमारत पडल्याने ग्रामीण रूग्णालय राहुरी नगर परिषदेच्या इमारत जागेत स्थलांतरित करण्यात आले. मात्र अपुरी जागा, डॉक्टरांची अनुपस्थिती, वैद्यकीय सुविधांच्या अभावामुळे रूग्णांना उपचार न मिळाल्याने अहमदनगर येथे जाऊन उपचार करावे लागत आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या परिसरात ट्रॉमा सेंटर सुरू केले तर अवघड शस्त्रकिया करणे शक्य होईल़. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने काही वर्षापूर्वी तुकाराम मोरे हे कुलगुरू असतांना डिग्रस परिसरात जागा देण्याचे मान्य केले होते. जागा वादग्रस्त व बाहेर असल्याने जागेचा प्रश्न सुटू शकला नाही.राहुरी नगरपरिषदेचे रूग्णालय सुरू ठेऊन ट्रॉमा सेंटर विद्यापीठात सुरू करण्याची गरज आहे. सध्या उपलब्ध होणारी ३७ गुंठे जागा अपुरी पडत आहे. श्रीरामपूर नगरपरिषदेचा दवाखाना शहरात व ग्रामीण रूग्णालय शिरसगावला आहे. नेवासा व संगमनेर येथेही याच पध्दतीने वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहे. राहुरी नगर परिषदेच्या माध्यमातून ओपीडी तर ट्रॉमा सेंटरच्या माध्यमातून अवघड शस्त्रक्रिया करणे शक्य होईल. त्यादृष्टिकोनातून राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी शासनाकडे पाठपुरावा करणे गरजेचे आहे. मंत्री जयंत पाटील यांच्या माध्यमातून पाठपुरावा केला तर राहुरीच्या वैद्यकीय क्षेत्राचा महत्वाचा समजला जाणारा प्रश्न मार्गी लागणे शक्य होईल.राहुरी जिल्ह्यातील  मध्यवर्ती ठिकाण असून नगर मनमाड राष्ट्रीय मार्गावर आहे. अनेकदा अपघात झाल्यानंतर पेशंटला अन्य शहरांमध्ये पाठवावे लागत आहे. ट्रॉमा सेंटरसाठी शासन दरबारी पाठपुरावा केला तर प्रश्न मार्गी लागू शकतो. त्यामाध्यमातून इमर्जंसी आॅपरेशन, हाड, मेंदू यावर उपचार करता येतील़ सिझरच्या प्रश्नासह पोस्टमार्टमसह कर्मचारी निवासाचा प्रश्न मार्गी लागेल. रूग्णांना चांगल्या सुविधा देता येणे शक्य होईल़ महात्मा फुले कृषी विद्यापीठात जागा उपलब्ध होऊ शकते़, असे राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयाचे निवृत्त वैद्यकीय अधिकारी  यांनी सांगितले.     

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटलAhmednagarअहमदनगर