शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

पदोन्नती होणाऱ्या शिक्षकांना प्रशिक्षण कशासाठी?

By admin | Updated: June 9, 2014 00:03 IST

अहमदनगर : तिसरी आणि चौथीच्या वर्गाच्या सुधारित अभ्यासक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला.

अहमदनगर : तिसरी आणि चौथीच्या वर्गाच्या सुधारित अभ्यासक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला. मात्र, प्रशिक्षण देण्यात येणाऱ्या याच शिक्षकांची १५ दिवसात पदोन्नतीने बदली होणार आहे. यामुळे या शिक्षकांना कशासाठी प्रशिक्षण देता, अशी कुजबुज जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये सुरू आहे. राज्यात सर्वत्र इयत्ता तिसरी आणि चौथीचा सुधारित अभ्यासक्रम प्राथमिक शिक्षकांना वर्गात शिकविता यावा, यासाठी राज्य, जिल्हा आणि तालुका पातळीवर प्रशिक्षण देण्यात येत आहे. राज्याचे प्रशिक्षण लोणावळा येथे तर जिल्हास्तरावरील प्रशिक्षण कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण या ठिकाणी झालेले आहे. आता जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने तालुकास्तरावर शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे आदेश गटशिक्षणाधिकारी यांना दिले. त्यानुसार तालुकापातळीवर पहिल्या टप्प्यात तिसरीच्या वर्गाचे प्रशिक्षण सुरू होणार आहे. यासाठी ९ ते १४ जून ही तारीख निश्चित करण्यात आलेली आहे. राज्यात सर्व जिल्हा परिषदांनी २० जूनला प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा ग्रामविकास विभागाने प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या जवळजवळ रद्दच केलेल्या आहेत. मात्र, या शिक्षकांना पदोन्नती देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सुमारे ७०० ते ७५० शिक्षकांना पदोन्नती मिळणार आहे. यातील बहुतांशी शिक्षक हे तिसरी आणि चौथीच्या सुधारित अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण घेणार आहेत. प्रशिक्षण संपल्यानंतर या शिक्षकांची पदोन्नतीने बदली होणार असल्याने या शिक्षकांना तातडीने प्रशिक्षण देण्याची गरज काय ? असा सवाल शिक्षकांमधून उपस्थित करण्यात येत आहे.राज्यातील अन्य जिल्ह्यात ज्या प्रमाणे २० तारखेनंतर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याच दरम्यान, जिल्ह्यातील शिक्षकांना प्रशिक्षण देण्याची मागणी होत आहे.दरम्यान, जिल्ह्यात सर्व तालुक्यात ९ ते १४ जून या कालावधीत देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाचा कालावधी हा सकाळी दहा ते सायंकाळी पाच ठेवण्यात आलेला असताना जामखेडचे गटशिक्षणाधिकारी अंकुश जंजीरे यांनी तालुक्यातील प्रशिक्षणाचा कालावधी सकाळी सात ते सायंकाळी सहा ठेवलेला आहे. हा प्रकार शिक्षकांवर अन्याय करणारा आहे. प्रशिक्षणात ५० टक्के महिला शिक्षक असल्याने सकाळी लवकर आणि सायंकाळी उशिरा त्या कशा जाणार? यामुळे या ठिकाणी वेळ बदलण्याची मागणी करण्यात आली आहे.राज्यात काही ठिकाणी २० जून नंतर तिसरी आणि चौथीच्या सुधारित अभ्यासक्रमाचे शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यापूर्वी शिक्षकांचे प्रमोशन पूर्ण करण्यात येणार आहे. यामुळे जे शिक्षक खऱ्याअर्थाने तिसरी आणि चौथीला अध्यापन करणार आहेत, त्यांनाच प्रशिक्षण मिळाले. यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी या प्रश्नी लक्ष घालावे.-डॉ. संजय कळमकर, शिक्षक नेते.