शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

अकोल्यात निवडणुकांची तालीम

By admin | Updated: June 26, 2016 00:36 IST

अकोले : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात सर्वच पक्षांनी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून तयारी सुरू केल्याचे समोर येत आहे

अकोले : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात सर्वच पक्षांनी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून तयारी सुरू केल्याचे समोर येत आहे. कार्यक्रम सामाजिक असले तरी त्याला राजकीय फोडणी ओघाने मिळतेच, हे गेल्या काही दिवसांत स्पष्ट झाले.भाजपचे कार्यकर्ता शिबिर, राष्ट्रवादीचे पुस्तक प्रकाशन, ठाकर समाजाचा मेळावा, तर शेतकरी संघटना, मार्क्सवादी किसान सभेची पाणी परिषद अशा कार्यक्रमांतून शक्तीप्रदर्शन करत निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. २ जूनला भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार चौनसुख संचेती यांनी आदिवासी भागाचा दौरा करुन वातावरण ढवळून काढले. आदिवासींशी हितगूज साधत भविष्यात पाणी टंचाईचा समूळ नायनाट कसा करता येईल? त्या अनुषंगाने प्रयत्न करु, तसेच जेथे चुकीचे काम चालले असेल त्याचा बंदोबस्त करु, असा विश्वास कार्यकर्त्यांना दिला. अशोक भांगरे, जि. प. सदस्या सुनीता भांगरे, जि. प. सदस्य डॉ. किरण लहामटे, पं. स. सदस्य दिलीप भांगरे यांनी यावेळी मतदारसंघातील समस्या त्यांच्यासमोर मांडल्या.४ जूनला माजी मंत्री मधुकर पिचड व आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखाली कांदा व दूध रस्त्यावर ओतून तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने शेती मालाला व दुधाला भाव मिळावा, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी अशा २७ मागण्यांसाठी एल्गार पुकारत रास्ता रोको आंदोलन छेडले.१४ जूनला अकोले शहर व ३२ गाव नळ पाणी पुरवठा योजनेला निधी मिळावा यासाठी आमदार वैभव पिचड यांनी कार्यकर्त्यांसमवेत तहसील कचेरीसमोर लाक्षणिक उपोषण केले. तर याच दिवशी भाजपाने अगस्ती आश्रमात कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर घेतले. त्यात सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू माणून त्यांच्यापर्यंत सरकारच्या जनकल्याणकारी योजना पोहोचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी केले.१५ जूनला मार्क्सवादी किसान सभा व शेतकरी संघटनेने निळवंडे पाणी हक्क संघर्ष समितीच्या माध्यमातून पाणी परिषद घेतली. निळवंडेचे कालवे वितरकांसह जमिनी खालून करा, हक्काचे पाणी द्या अशा अकोलेकरांच्या भावनिक मुद्द्यांना त्यांनी हात घातला. जल अभ्यासक प्रदीप पुरंदरे, किसान सभेचे केंद्रीय सहसचिव कॉम्रेड डॉ. अशोक ढवळे, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष शरद देशमुख, मार्क्सवादी किसान सभेचे प्रदेश सचिव कॉम्रेड डॉ .अजित नवले आदी यावेळी उपस्थित होते. १९ जूनला माजी उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार यांच्या उपस्थितीत तालुक्यातील इंदोरी येथे ‘कथा निळवंडे धरणाची’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. माजी मंत्री मधुकर पिचड, आ. वैभव पिचड, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर आदींच्या उपस्थितीत पवार यांनी आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची चांगली तयारी करा, असा सल्ला दिला. (तालुका प्रतिनिधी)