शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

भीमा कोरेगावची दंगल हा भाजपाने निवडणुकीसाठी घडविलेला ट्रेलर - पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 20:44 IST

निवडणुकीची चाहुल लागताच हिंसाचार, जातीयवाद, दहशत निर्माण करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठीच भीमा कोरेगावची जातीय दंगल हा भाजपाने घडविलेला ट्रेलर होता, असा थेट आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

श्रीगोंदा : जीएसटी व नोटाबंदीमुळे विकासाचा दर मंदावला होता. नरेंद्र व देवेंद्र सरकार विकासाच्या मुद्यावर फेल झाले आहे. निवडणुकीची चाहुल लागताच हिंसाचार, जातीयवाद, दहशत निर्माण करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठीच भीमा कोरेगावची जातीय दंगल हा भाजपाने घडविलेला ट्रेलर होता, असा थेट आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात चव्हाण बोलत होते. यावेळी कृषी प्रदर्शन व नागवडे साखर कारखान्याच्या प्रशासकीय इमारतीचे भूमीपुजन चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.चव्हाण म्हणाले, पिकाला हमीभाव मिळत नाही. शेतक-यांचे कंबरडे मोडले आहे. शेतक-यांची कर्जमाफी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी जाचक अटी घालून शेतक-यांची कुचेष्टा केली आहे. पण उद्योगपतींना २ लाख १२ हजार कोटींची कर्जमाफी दिली. जनतेच्या पैशातून ही कर्जमाफी केली जाणार आहे.कार्यक्रमास विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार राहुल जगताप, माजी मंत्री शंकरराव कोल्हे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, राजेंद्र नागवडे, माजी खासदार दादापाटील शेळके आदी उपस्थित होते.

नगरचं पाणी लयभारी

पुणे जिल्ह्यातील नेत्यांपेक्षा नगर जिल्ह्यातील नेत्यांना आयुष्य जादा आहे. आजही दादापाटील शेळके, शंकरराव कोल्हे, यशवंतराव गडाख यांच्यासारखे जेष्ठ पूर्ण क्षमतेने काम करतात. नगरचं पाणी लयभारी आहे, असा मिस्कील टिपण्णी हर्षवर्धन पाटील यांनी केल्यानंतर सभास्थानी एकच हशा पिकला.

पाचपुतेंनी घेतली नागवडेंची गळाभेट

राजकारणात माजी मंत्री बबनराव पाचपुते व राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांच्यात टोकाचा संघर्ष सर्वस्त्रुत आहे. पण बबनराव पाचपुते यांनी सभास्थानी येऊन नागवडेंची गळाभेट घेतली. दोघांच्या गळाभेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचार