शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वाहतूक शाखेचे आता फिरते पथक

By admin | Updated: October 3, 2014 23:57 IST

अहमदनगर : वाहतूक शाखेचे पोलीस आतापर्यंत फक्त चौकामध्येच थांबलेले असायचे. त्यामुळे ट्रिपल सीट फिरणारे चौकाच्या अलीकडे उतरतात आणि चौक ओलांडला की की पुन्हा दुचाकीवर बसून प्रस्थान करतात.

अहमदनगर : वाहतूक शाखेचे पोलीस आतापर्यंत फक्त चौकामध्येच थांबलेले असायचे. त्यामुळे ट्रिपल सीट फिरणारे चौकाच्या अलीकडे उतरतात आणि चौक ओलांडला की की पुन्हा दुचाकीवर बसून प्रस्थान करतात. त्याला आळा घालण्यासाठी पोलीस उपअधीक्षक वाय. डी पाटील यांनी वाहतूक पोलिसांचे एक स्वतंत्र फिरते पथक तयार केले आहे. शहरात कुठेही ट्रिपल सीट आढळल्यास दुचाकीचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.वाहतूक शाखेकडून वाहनचालकांवर केलेल्या कारवाईमध्ये सर्वाधिक कारवाई ट्रिपल सीटधारकांवर करण्यात आली आहे. ट्रिपलसीट धारकांना फक्त चौकातील पोलिसांचीच भीती असते. दंडाची पावती फाडल्यानंतर पुन्हा तिघेजण दुचाकीवरून बसत नियमांची पार वाट लावतात. पोलिसांना चकवा दिला तरी ट्रिपलसीट चालविणे धोक्याचे आहे. यावर दंड करूनही आळा बसत नसल्याने शहराचे पोलीस उपअधीक्षक वाय.डी. पाटील यांनी आता वाहतूक शाखेच्या तीन पोलिसांचे एक स्वतंत्र फिरते पथक तयार केले आहे. ते शहरातील मार्गावरून फिरणार असून ट्रिपल सीट दिसताच जागेवरच कारवाई केली जाणार आहे.पोलिसांचे हे पथक कार्यान्वित करण्यात आले असून त्यांना शासकीय दुचाकी देण्यात आली आहे. ते पथक वाहतूक शाखेऐवजी वाय.डी. पाटील यांच्या अधिपत्याखाली काम करणार आहे. शहरातील तरुणांना ट्रिपलसीटच्या धोक्यापासून वाचविणे, तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन होणार नाही,हाच या पथकाचा हेतू असल्याचे पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)